शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

माझ्या मना बन दगड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 16:47 IST

धरणफुटीत २४ जण बेपत्ता... भिंत खचून १६ लोक ठार...अशा बातम्या वाचून मन विषण्ण होते

मिलिंद कुलकर्णीधरणफुटीत २४ जण बेपत्ता... भिंत खचून १६ लोक ठार...अशा बातम्या वाचून मन विषण्ण होते. ही नैसर्गिक आपत्ती म्हणून राज्य शासन आर्थिक मदत जाहीर करते. चौकशीच्या घोषणा होतात. पण पुढे काय होते या सगळ्या गोष्टींचे हे आपल्याला माहित आहे. मुळात ही नैसर्गिक आपत्ती आहे काय? तिवरे धरणाची दुरुस्ती ३४ दिवसांपूर्वी केली होती, हे धरण १९ वर्षांपूर्वी बांधले गेले, दुरुस्ती आमदारांच्या कंपनीने केली असे तपशील आता बाहेर येत आहेत. दुर्घटना घडल्याने हे तपशील सामान्य माणसाला कळत आहेत, अन्यथा या बाबींवर प्रकाश कधीच पडला नसता. संरक्षक भिंत कोसळली. दुर्घटना घडल्या, त्याठिकाणी नियमभंग आढळून आला. प्रश्न असा निर्माण होतो, की नियम सरकारने किंवा सरकारने जबाबदारी दिलेल्या संस्थांनी बनविलेले आहेत. नियम बनविण्याचे कारणदेखील सुरक्षितता, शिस्त, नियोजन हेच असते. नियम न पाळल्यास कारवाईची तरतूद असते. नियम भंग होणार नाही, याची काळजी घेण्यासाठी कायद्यात तरतुदी आणि नियामक यंत्रणा असते. तरीही हे घडते, याचे कारण भ्रष्टाचार हेच एकमेव आहे. अत्र तत्र सर्वत्र भ्रष्टाचार बोकाळला असल्याने नियम धाब्यावर बसवून कामे केली जातात आणि त्याचा बळी शेवटी सामान्य माणूस ठरतो. त्याचा काहीही दोष नसताना हकनाक जीव जातो. दोन वर्षांपूर्वी पुण्याजवळ ढगफूटी झाली, डोंगरावरील वस्ती वाहून गेली. गेल्या वर्षी कोकणाकडे जाणारा पूल कोसळला, बसमधील प्रवासी वाहून गेले. मुंबईत स्काय वॉक कोसळण्याचा घटना वर्षातून एकदा घडतात. राजकीय मंडळी निर्ढावली आहे. ‘बडे बडे शहरोमे ऐसे छोटे, छोटे हादसे होते ही रहते है’ अशा शब्दात ही मंडळी असंवेदनशीलतेचे दर्शन घडविते. प्रशासकीय यंत्रणा देखील पंचनामा, चौकशी, मदत, अनुदान, नुकसानभरपाई या प्रक्रियेत एवढा कालापव्यय करते की, दोषी व्यक्तीला पुरेसा कालावधी मिळतो. सामान्य जनता ही घटना विसरुन जाते. जणू काही घडलेच नाही, असे समजून पुन्हा ये रे माझ्या मागल्या सुरु होते.ज्यांच्या घरातील व्यक्ती अशा दुर्घटनेत गमावली जाते, त्याचे दु:ख आम्ही कधी समजून घेणार आहोत. आर्थिक मदत, अनुकंपा तत्त्वावरील नोकरी याद्वारे तुम्ही दु:खावर फुंकर घालाल, पण गेलेली व्यक्ती तुम्ही परत येणार नाही.विशेष म्हणजे, अशा दुर्घटना घडल्यावर सर्व यंत्रणा दोषींना वाचविण्यासाठी अभूतपूर्व युती करताना दिसून येतात. एकमेकांना कसे वाचवता येईल, यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न होतात. दोषींची गय करणार नाही, असे तोंडदेखले आश्वासन एकीकडे राज्यकर्ते आणि प्रशासकीय यंत्रणा देत असली तरी अंधारात संबंधितांना वाचविण्यासाठी खल सुरु असतो. ३०-३२ वर्षांपूर्वी ‘जाने भी दो यारो’ नावाचा हिंदी चित्रपट आला होता. शफी इनामदार, भक्ती बर्वे यांनी अभिनित केलेल्या या चित्रपटात मुंबईतील बांधकाम व्यवसाय, राज्यकर्ते, पत्रकारिता या क्षेत्रातील कुप्रवृत्तींवर प्रकाशझोत टाकला होता. तत्कालीन परिस्थितीशी वर्तमानाची तुलना केली तर काहीही बदल झालेला नाही. अधिक निर्ढावलेपण आले आहे. आपले कोणीही वाकडे करु शकत नाही, अशा बेमुर्वतखोरीने माणसे वागताना दिसत आहे.लोकशाही व्यवस्थेत काही स्तंभांना दिलेल्या अमर्याद अधिकारांचा दुरुपयोग होताना दिसत आहे. त्यांच्यातील अभद्र युती विकासाला मारक तर ठरत आहेच, पण सामान्य माणसाच्या जीवावर उठली आहे. पुन्हा लोक आम्हाला निवडून देतात, आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत, असे पालुपद लावायला मोकळे होतात. पण, अशी कामे करायला लोक तुम्हाला निवडून देतात का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. कधी नव्हे तेवढा सामान्य माणूस हताश, हतबल, दिनवाणा झाला असून यंत्रणा प्रबळ, शक्तीवान झाल्याचे दिसून येत आहे. ‘माझ्या मना बन दगड’ अशी समजूत घालून उघड्या डोळ्यांनी जे घडते ते बघणे त्याच्या हाती उरले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव