शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

माझा मुलगा भलता गोडय ना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 02:09 IST

(अब्राहम लिंकनच्या पत्राचा कविवर्य वसंत बापट यांनी केलेला अनुवाद त्या काळात योग्य होता. आजच्या काळात तो असा हवा. त्या दोघांची क्षमा मागून हा अनुवाद)

(अब्राहम लिंकनच्या पत्राचा कविवर्य वसंत बापट यांनी केलेला अनुवाद त्या काळात योग्य होता. आजच्या काळात तो असा हवा. त्या दोघांची क्षमा मागून हा अनुवाद)

प्रिय सर,सगळीच माणसं घोटाळेबाज असतात,नसतात सगळीच तत्त्वनिष्ठ...हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी...मात्र त्याला हे देखील शिकवा... की,प्रत्येक घोटाळ्यामागे राजकीय हात असतोच.आणि साधूसारखा वाटणारा गुंडदेखील...!राजकारणी स्वार्थीच असतात देशात,आणि असतात सगळं आयुष्य ‘स्व’साठीजगणारे नेतेही पुष्कळ...!वेळ आली की सूड घेणारे मित्रफक्त राजकारणातच असतात.मला हे देखील माहिती आहे की, सगळेघोटाळे त्याला पटापट नाही करता येणार...!तरीही जमलं तर त्याच्या मनावर हेच ठसवा...की, आजच्या जगात घाम घाळूनकमाई करण्यापेक्षा घोटाळे करूनकमाई करण्यातच शहाणपण आहे...!कितीही बदनामी झाली तरी,हसत हसत सामोरं कसं जायचं हे देखीलत्याला शिकवा... आणि शिकवा वरकमाईकशी मार्गी लावायची ते...!हे सगळं शिकवताना काही गोष्टी त्यालातुम्हीच सांगा, जसे की, रोज रात्री ट्रायडंटमध्येजाऊन छटाक आनंद कसा साजरा करायचा?पहाटे उठून कुणाला काही कळायच्या आतशासकीय बंगल्यावर कसे गुपचूप यायचे,तेही शिकवा त्याला, कारण ही कलाआलीच पाहिजे त्याला, यशस्वी होण्यासाठी.गुंडांना भीत जाऊ नको असंही सांगा त्याला,त्यांच्याशी दोस्ती कशी करायची, हे शिकवा!उगाच त्याला पुस्तकं,ग्रंथभांडारं दाखवत बसू नका...त्यापेक्षा, सूड कसा घ्यावा याचा विचारकरण्यासाठी त्याच्या मनाला निवांतपणाकसा मिळेल हे सांगा...!सृष्टीचं शाश्वत सांैदर्य अनुभवण्यापेक्षा, आणिपक्ष्यांची अस्मानभरारी पाहत बसण्यापेक्षाहे दिवस भौतिक सुखाचे आहेत, हे त्यालापक्के ठसवून द्या...हिरव्यागार डोंगरावरची फुलं पाहण्यापेक्षा,ते डोंगर कापून त्याचा पैसा कसा करायचा,ते आधी त्याला शिकवा,कारण तेच कामी येणार आहे...!शाळेत त्याला हा धडा मिळू दे...की फसवून मिळालेलं यशचसगळ्यात श्रेयस्कर असतं.आपल्या कल्पना, आपले विचार याच्यावरचदृढविश्वास ठेवत जा, असं त्याला सांगा...उगाच सत्य आणि न्याय वाटते म्हणूनलढण्याचे दिवस संपलेत, हेही शिकवा...सरकार कोणतही असो, घोटाळ्यांमधूनतावून-सुलाखून निघाल्याशिवायत्याला आणखी मोठे घोटाळेकसे करता येणार सर...उगाच धीर धरण्याच्या गोष्टी नका शिकवू...त्यापेक्षा मनात आलं की कसं मिळवायचंहे त्याला सांगा...!मानवजातीवर उदात्त श्रद्धा बाळगण्याचे दिवसकधीच संपलेत सर, हे त्याला आवर्जून सांगा.माफ करा सर, मी फार बोललो, पण हेतुम्हाला करावंच लागेल...नाही तर तो कसा टिकणार या स्पर्धेत...?कारण तीच काळाची गरज आहे बरं का...माझा मुलगा, भलताच गोड आहे ना सर...?(तिरकस)

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र