शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
3
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
4
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
5
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
6
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
7
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
8
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
9
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
10
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
11
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
12
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
13
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
14
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
15
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
16
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
17
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
18
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
19
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
20
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...

‘माय बॉडी माय राईट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 00:10 IST

‘माय बॉडी माय राईट’ही चळवळ जागतिक पातळीवर फार पूर्वीच सुरू झाली असली तरी भारतात तिचा फारसा प्रभाव पडू शकला नव्हता.

‘माय बॉडी माय राईट’ही चळवळ जागतिक पातळीवर फार पूर्वीच सुरू झाली असली तरी भारतात तिचा फारसा प्रभाव पडू शकला नव्हता. कालांतराने ती मागेही पडली. परंतु अलीकडेच ‘माय बॉडी माय चॉईस’ या अभिनेत्री दीपिका पदुकोणच्या व्हिडिओने मात्र विविध समाज माध्यमांमधून स्त्रीच्या तिच्या शरीरावरील अधिकाराबाबत चर्चा सुरू झाली आणि यानिमित्ताने शरीरावरील अधिकार म्हणजे काय? याचाही उहापोह झाला. स्त्रियांनी यशाची अनेक क्षेत्रे पादाक्रांत केली असली तरी, तिचे शरीर म्हणजे निव्वळ उपभोगाची वस्तू असल्याचा ‘गैर’समज आजही आपल्या या पुरुषप्रधान समाजात दृढ आहे. आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे, हे सत्य असले तरी स्त्रियांच्या बाबतीत मात्र अजूनही त्याला मान्यता मिळालेली नाही अथवा तिच्यासंदर्भात वेगळा नियम लावला जातो असेही म्हणता येईल. खुद्द स्त्रीलासुद्धा आपला हा हक्क राखता आला नाही, हेही तेवढेच खरे. आपल्या संस्कृतीत जिथे स्त्रियांची वेशभूषा, तिचे वागणे, बोलणे, फिरणे इथपासून तर अगदी लहानसहान गोष्टींचे निर्णय तिच्या कुटुंबातील पुरुष अथवा समाज घेत असतो तिथे तिने आपल्या शरीरावर हक्क सांगणे म्हणजे दिवास्वप्नच म्हणायचे. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयामुळे हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वैवाहिक बलात्कार हा फौजदारी गुन्हा ठरत नसल्याचे धक्कादायक आणि स्त्रीचा तिच्या शरीरावरील अधिकार अमान्य करणारे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे. वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या मर्जीविरुद्ध केलेले लैंगिक कृत्य कायद्यानुसार बलात्काराच्या गुन्ह्याचा भाग असावे का, यावर सर्वंकष चर्चा झाली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने उपरोक्त मत मांडताना स्पष्ट केले आहे, हे विशेष! आपल्या या मतातून एकाअर्थी लग्नानंतर स्त्रीचा तिच्या शरीरावर अधिकार राहत नाही, असेच सर्वोच्च न्यायालयाला विशद करायचे आहे काय? महिलांसाठी कार्यरत संघटना यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागून आहे. कारण स्त्रियांना ज्या लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागतो त्यातील हा एक भीषण प्रकार असल्याचे निदर्शनास आले आहे. लैंगिक गरज भागविणे हा विवाहामागील एक उद्देश असला तरी, स्त्रीच्या सहमतीशिवाय असे करणे हा खरे तर तिच्यावरील अन्यायच ठरतो. पण आपल्या या समाजात लग्न हाच स्त्री समोरील आयुष्य जगण्याचा एकमेव पर्याय मानला जात असल्याने आणि यावरूनच तिचे चरित्र ठरत असल्याने बरेचदा तिला ही घुसमट सहन करावी लागते.