शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

मुत्सद्दी शरदकाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:31 IST

कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली.

- अतुल कुलकर्णीदेवावर गाढा विश्वास असणाऱ्या कुमारची ही गोष्ट. ३५ टक्के गुण मिळवलेल्या कुमारला त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुलांचा पाठिंबा असतानाही, गुरु जींनी दुसºयाच मुलाला मॉनिटर करायचा निर्णय घेतला होता. का तर म्हणे त्याला १०० गुण मिळाले...! हे काय कारण झाले? कुमार चिंतेत होता. गुरु जींचे वागणे त्याला खटकत होते. पण गुरु जींवर संस्थाचालकांचा वरदहस्त होता. त्यामुळे त्यांना कुणी काही बोलले तर संस्था अध्यक्षांना राग यायचा. विचार करत करत कुमारने एक आयडिया केली. तो गेला त्याच्या विरोधात असणाºया सिद्धूकडे. त्यालाही गुरु जींच्या वागण्याचा रागच आला होता. दोघे एकत्र आले आणि दोघांनी मिळून गुरु जींच्या निर्णयाच्या विरोधात गावातल्या पाटलांकडे जायचे ठरवले. गावातले पाटीलही गुरु जींवर कातावलेले होते. संस्थाचालकांच्या मनमानीमुळे पाटलांचा त्या संस्थाचालकांवर तसाही राग होताच.कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली. एका मॉनिटरमुळे आपल्या बाकीच्या शाळा अडचणीत येतील म्हणून संस्थाचालकही विचारात पडले होते. इकडे गुरु जी तर बोलून बसले होते. त्यामुळे व्यवहारात येडा पण पुस्तकात हुशार असणाºया त्या मुलाला मॉनिटर नाही केले तर आपली पंचाईत होणार म्हणूनगुरु जी परेशान झाले होते. अखेर त्या शाळेशी आणि गावाशी काडीचा संबंध नसणारे शेजारच्या गावातले एक शरदकाका सगळ्यांच्या मदतीला आले. ते तसे कुणाचे मित्र आणि कुणाचे शत्रू हे त्यांच्या मित्रांना आणि शत्रूंनाही कळत नसे.संस्थाचालकांची प्रतिष्ठा राखली जाईल, असे त्यांना वाटत पाहिजे. आपला शब्द वाया जाऊ नये, असे गुरुजींना वाटत होते. कुमार मॉनिटर झाला पाहिजे, असं त्याच्या वडिलांना वाटत होते, आणि हे सगळं करताना कुमारला मदत करणारा सिद्धूदेखील जे घडलं ते शरदकाकांमुळे घडलं, ते नसते तर सगळं कठीण झालं असतं, असं त्यांच्या दिल्लीच्या राहुलदादाला सांगण्यासाठी गेला पाहिजे, अशी खेळी खेळायचे शरदकाकांनी ठरवले. त्यांनी संस्थाचालकांना गाठले, त्यांच्या कानात काही तरी सांगितले... आणि काय आश्चर्य, त्या हुशार मुलाने वर्गात जाऊन सांगितले, मला नाही मॉनिटर व्हायचे, मला अजून खूप अभ्यास करायचाय, आणि त्याबरोबर सगळे प्रश्न सुटले...!गुरु जी खूश, संस्थाचालक खूश, सिद्धूचे दिल्लीतले नातेवाईक खूश... सगळे शरदकाकाचे नाव घेऊ लागले...! मात्र आपण या गावचेच नाही असे म्हणत शरदकाका पुढच्या कामाला निघून गेले.ही बातमी कळताच गोवा, मणिपूर आणि मेघालयमधील शाळेत असेच प्रकार घडले. पण त्यावेळी कुणी कसे लक्ष दिले नाही, अशा बातम्या सुरू झाल्या. मात्र त्यावेळी शरदकाका गप्प होते की कुणी त्यांच्याकडे मदत मागायलाच गेले नव्हते की दिल्लीत राहणाºया त्या संस्थाचालकांनी त्यावेळी शरदकाकांना गप्प बसायची विनंती केली होती की त्यावेळी काकांनाच ठरवून गप्प बसायचे होते, यावर आता चर्चा सुरू झालीय. त्या संस्थाचालकांच्या शाळांबद्दल कधी, किती व कुणी बोलायचे याचे वर्ग आता शरदकाका सुरू करणार आहेत, अशीही एक पुडी कुणी तरी सोडल्याचे ऐकीवात आहे... किती लक्ष द्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे...!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस