शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

मुत्सद्दी शरदकाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 01:31 IST

कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली.

- अतुल कुलकर्णीदेवावर गाढा विश्वास असणाऱ्या कुमारची ही गोष्ट. ३५ टक्के गुण मिळवलेल्या कुमारला त्याच्या वर्गातल्या सगळ्या मुलांचा पाठिंबा असतानाही, गुरु जींनी दुसºयाच मुलाला मॉनिटर करायचा निर्णय घेतला होता. का तर म्हणे त्याला १०० गुण मिळाले...! हे काय कारण झाले? कुमार चिंतेत होता. गुरु जींचे वागणे त्याला खटकत होते. पण गुरु जींवर संस्थाचालकांचा वरदहस्त होता. त्यामुळे त्यांना कुणी काही बोलले तर संस्था अध्यक्षांना राग यायचा. विचार करत करत कुमारने एक आयडिया केली. तो गेला त्याच्या विरोधात असणाºया सिद्धूकडे. त्यालाही गुरु जींच्या वागण्याचा रागच आला होता. दोघे एकत्र आले आणि दोघांनी मिळून गुरु जींच्या निर्णयाच्या विरोधात गावातल्या पाटलांकडे जायचे ठरवले. गावातले पाटीलही गुरु जींवर कातावलेले होते. संस्थाचालकांच्या मनमानीमुळे पाटलांचा त्या संस्थाचालकांवर तसाही राग होताच.कुमारला मॉनिटर केले नाही तर तुमच्या सगळ्या शाळांचे वीज-पाणी बंद करून टाकीन, अशी धमकीच पाटलांनी दिली. एका मॉनिटरमुळे आपल्या बाकीच्या शाळा अडचणीत येतील म्हणून संस्थाचालकही विचारात पडले होते. इकडे गुरु जी तर बोलून बसले होते. त्यामुळे व्यवहारात येडा पण पुस्तकात हुशार असणाºया त्या मुलाला मॉनिटर नाही केले तर आपली पंचाईत होणार म्हणूनगुरु जी परेशान झाले होते. अखेर त्या शाळेशी आणि गावाशी काडीचा संबंध नसणारे शेजारच्या गावातले एक शरदकाका सगळ्यांच्या मदतीला आले. ते तसे कुणाचे मित्र आणि कुणाचे शत्रू हे त्यांच्या मित्रांना आणि शत्रूंनाही कळत नसे.संस्थाचालकांची प्रतिष्ठा राखली जाईल, असे त्यांना वाटत पाहिजे. आपला शब्द वाया जाऊ नये, असे गुरुजींना वाटत होते. कुमार मॉनिटर झाला पाहिजे, असं त्याच्या वडिलांना वाटत होते, आणि हे सगळं करताना कुमारला मदत करणारा सिद्धूदेखील जे घडलं ते शरदकाकांमुळे घडलं, ते नसते तर सगळं कठीण झालं असतं, असं त्यांच्या दिल्लीच्या राहुलदादाला सांगण्यासाठी गेला पाहिजे, अशी खेळी खेळायचे शरदकाकांनी ठरवले. त्यांनी संस्थाचालकांना गाठले, त्यांच्या कानात काही तरी सांगितले... आणि काय आश्चर्य, त्या हुशार मुलाने वर्गात जाऊन सांगितले, मला नाही मॉनिटर व्हायचे, मला अजून खूप अभ्यास करायचाय, आणि त्याबरोबर सगळे प्रश्न सुटले...!गुरु जी खूश, संस्थाचालक खूश, सिद्धूचे दिल्लीतले नातेवाईक खूश... सगळे शरदकाकाचे नाव घेऊ लागले...! मात्र आपण या गावचेच नाही असे म्हणत शरदकाका पुढच्या कामाला निघून गेले.ही बातमी कळताच गोवा, मणिपूर आणि मेघालयमधील शाळेत असेच प्रकार घडले. पण त्यावेळी कुणी कसे लक्ष दिले नाही, अशा बातम्या सुरू झाल्या. मात्र त्यावेळी शरदकाका गप्प होते की कुणी त्यांच्याकडे मदत मागायलाच गेले नव्हते की दिल्लीत राहणाºया त्या संस्थाचालकांनी त्यावेळी शरदकाकांना गप्प बसायची विनंती केली होती की त्यावेळी काकांनाच ठरवून गप्प बसायचे होते, यावर आता चर्चा सुरू झालीय. त्या संस्थाचालकांच्या शाळांबद्दल कधी, किती व कुणी बोलायचे याचे वर्ग आता शरदकाका सुरू करणार आहेत, अशीही एक पुडी कुणी तरी सोडल्याचे ऐकीवात आहे... किती लक्ष द्यायचे ते ज्याचे त्याने ठरवावे...!

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस