शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

संगीतातला ‘देव’ हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 06:34 IST

मराठी संगीताच्या सुवर्णकाळात संगीतकार, गीतकार, गायनअशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करतानाच त्यावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या यशवंत देव यांच्या जाण्याने शब्दप्रधान गायकीतील दुवा निखळला आहे.

कोणाकडेही स्वत:हून काम मागायचा यशवंत देवांचा स्वभावच नसला; तरी चित्रपट संगीत, बालगीते, नाट्यसंगीत, सुगमसंगीत, भावगीतावर त्यांनी ठसा उमटवला. संगीताचे प्रयोग केले. गीतलेखन, गायन केले. प्रत्येक क्षेत्राला नवा आयाम दिला.मराठी संगीताच्या सुवर्णकाळात संगीतकार, गीतकार, गायनअशा विविध क्षेत्रांत मुशाफिरी करतानाच त्यावर स्वत:चा अमीट ठसा उमटवणाऱ्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक असलेल्या यशवंत देव यांच्या जाण्याने शब्दप्रधान गायकीतील दुवा निखळला आहे. १९४५ ते १९७५ या काळातील भावगीत, भक्तिगीत, सुगमसंगीत, नाट्यसंगीत आणि चित्रपट संगीताच्या बहराच्या काळात अवीट गोडीचे जे संगीत तयार झाले, त्या साºया क्षेत्रातील यशवंत देव हे उल्लेखनीय नाव. पूर्वीच्या काळी राज्याभिषेकावेळी राजे-महाराजांवर हिरे-मोती-माणिक उधळले जायचे, त्याचप्रमाणे यशवंत देवांनी त्या काळात रसिकजनांवर सुमधुर गाण्यांची मनमुराद उधळण केली. सतार वादनातून आपल्या सांगीतिक कारकिर्दीला सुरुवात करणाºया देव यांच्या प्रतिभेला बहर आला, तो आकाशवाणीत. तेथे मुलांसाठी काम करता करता ते संगीत विभागाशी समरस झाले. वेगवेगळ्या कवींशी संपर्क आला. त्यातून भाषा, गेयता, माधुर्य, चालींशी शब्दांचे नाते यात ते पारंगत झाले. त्या वेळी एखादी कविता किंवा गीत नाकारण्याचा प्रसंग आला, तर ते या नकाराची कारणे तर द्यायचेच; पण चाली लावण्यासाठी पर्यायी गीते-कविताही सुचवायचे. आकाशवाणीचा तो काळ नव्या कल्पना राबवण्याचा, कलावंत घडवण्याचा. त्या वेळी या साºया क्षेत्रात मुशाफिरी करणाºया पु. ल. देशपांडे यांच्या सल्ल्यातून ते गीतकार झाले, संगीतकारही बनले. श्रवणीयता, माधुर्य आणि त्याला तालाची उत्तम जोड देण्याचा त्यांचा अभ्यास यामुळे लवकरच त्यांची स्वत:ची शैली नावारूपास आली. आधी नागपूर, नंतर मुंबई आकाशवाणी केंद्रावर नोकरी करतानाच विविधभारतीत केलेल्या कामातून त्या काळात गाजत असलेल्या हिंदी चित्रपट संगीतांचाही अभ्यास त्यांनी केला. शास्त्रीय संगीताची बैठक असलेल्या आणि त्याचवेळी क्लिष्टतेपेक्षा सहज गुणगुणता येणाºया चालींवर काम करता करता मनोमन त्यांनी प्रसिद्ध संगीतकार अनिल विश्वास यांना गुरूस्थानी मानले. ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे गीतरामायण प्रचंड यशस्वी झाल्यानंतर प्रसिद्ध बॅले नर्तक सचिन शंकर यांनी रामायणावरच नृत्यनाट्याची (बॅले) तयारी केली. त्यासाठी गदिमांकडूनच त्यांनी गाण्यांसहित ‘कथा ही रामजानकीची’ या नावाचे नृत्यनाट्य लिहून घेतले आणि साहजिकच संगीतासाठी ते बाबूजींकडे गेले. पण गीतरामायणाचे कार्यक्रम अखंड सुरू असल्याने काही काळ तरी ‘राम’ या विषयावर नवीन काहीही करणार नसल्याचे बाबूजींनी सचिन शंकर यांना सांगितले. त्याचवेळी त्यांना यशवंत देव यांचे नाव सुचवले. नवा अनुभव म्हणून देवकाकांनीही हे संगीताचे काम केले आणि हे देखणे नृत्यनाट्य आकाराला आले. त्यात काही पूर्ण गाणी होती, काही गाणी अगदी चार-चार ओळींची होती. याबरोबरच रेडिओवर मंगेश पाडगावकरांच्या ‘राधा’ नावाच्या संगीतिकेला उत्तम संगीत देण्याचे श्रेयही यशवंत देव यांच्या खात्यावर जमा आहे. ‘माघाची थंडी माघाची, थंडीची धुंदी थंडीची’ ही त्यांची लावणी आधी रेकॉर्ड न होता लंडन कार्यक्रमात सादर झाली. गाजली आणि नंतर रंजना जोगळेकरांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली. याच लावणीतील ‘अर्ध्या रातीला आता कुठं जाता?’ ही पंचलाइन अलीकडच्या काळात ‘मला जाऊद्या ना घरी, आता वाजले की बारा’ असे हुबेहूब स्वररूप घेऊन अवतरली. चित्रपट संगीतात ते जरी फारसे रमले नसले, तरी भावसंगीताचे ते खºया अर्थाने देवच होते. केवळ शब्दांचे नव्हे, तर श्वासाचेही सुरांशी नाते असते, असे ते कायम सांगत. आयुष्यात धनरेषा नसली तरी चालेल, पण स्मितरेषा हवी, असे सांगत त्यांनी तेवढ्याच ताकदीने केलेली विडंबने रसिकांना आनंद देऊन गेली. नंतरच्या काळात त्यांच्यावर ओशो रजनीश यांच्या विचारांचा प्रभाव पडला. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही आयुष्य बदलू शकत नाही. ते जसे असते तसे स्वीकारायचे असते. आहे तो क्षण जगायचा, स्वीकारायचा हे तत्त्व त्यांनी अखेरपर्यंत पाळले. तीच समाधानी वृत्ती त्यांच्या प्रत्येक संगीतकृतीतून झंकारली. तो निनाद आता फक्त आठवणींच्या रूपातच उरला आहे.

टॅग्स :musicसंगीत