शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

मुंबईत आता घोडेस्वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2019 20:51 IST

मुंबईतील वाढती लोकसंख्या, वाहने, ही दोन कारणे घोडदळ बंद होण्यासाठी पुरेशी होती. असे असताना पुन्हा घोडदळाचा घाट कोणी घातला हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

- विनायक पात्रुडकर

काही वर्षांपूर्वी प्राणी मित्र संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली होती. चौपाट्यांवर व लग्नाच्या वरातीमध्ये वापरल्या जाणाऱ्या घोड्यांवर बंदी आणावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीत अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले होते. मुंबईतील वाहतूक कोंडी, घोड्यांची होणारी दुरवस्था, याचे अनेक दाखल न्यायालयात सादर झाले. याची दखल घेत अखेर न्यायालयाने चौपाट्यांवरील व वरातीमधील घोड्यांवर बंदी आणली. याप्रकरणात मुंबई पोलीसदेखील याचिककार्त्यांच्या बाजूने उभे राहिले होते. मुंबईच्या रस्त्यांवर घोडे चालवण्यास मनाई करावी, अशी भूमिका पोलिसांनी न्यायालयात मांडली होती. आता हेच पोलीस दल मुंबईकरांच्या सेवेसाठी घोडदळ घेऊन येणार आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. इतिहासाच्या पुस्तकात ओझरता उल्लेख मुंबईतील घोडदळाचा आहे. ब्रिटीश काळात १९३२ पर्यंत मुंबई पोलीस दलात घोडदळ होते. पोलीस दलाने हळूहळू कात टाकायला सुरूवात केली आणि घोडदळ हद्दपार झाले. मुंबईतील वाढती लोकसंख्या, वाहने, ही दोन कारणे घोडदळ बंद होण्यासाठी पुरेशी होती. असे असताना पुन्हा घोडदळाचा घाट कोणी घातला हा प्रश्न महत्त्वाचा आहे. घोडदळाचा प्रस्ताव १९९० साली मांडण्यात आला. त्यावर सविस्तर चर्चाही झाली. मुंबईतील वाहतूक कोंडी, वाढती लोकसंख्या हेच दोन मुद्दे प्रामुख्याने चर्चेला आले आणि घोडदळ नको, अशी भूमिका काही सनदी अधिकाऱ्यांनी मांडली. काही अधिकाऱ्यांनी घोडदळाचा हट्ट धरला. त्यासाठी कोट्यवधी रूपयांची तरतूद करून घेतली. त्यामुळे घोडदळाची खरच गरज होती का? की काही अधिकाऱ्यांची आवड म्हणून हा प्रस्ताव मंजूर झाला, असा प्रश्न पडला तर वावगे ठरणार नाही.ज्या पोलिसांनी वाहतूक कोंडीचे कारण देत मुंबईतील घोडे हद्दपार करा, असे म्हटले होते, तेच आता घोडदळ आणणार आहेत. घोडदळ नेमक्या कोणत्या विभागात कार्यरत असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घोडदळ नुसती गस्त घालणार की आरोपींच्या मागे पण धावणार हा मुद्दाही महत्त्वाचा ठरणार आहे. घोडदळावर कोट्यवधी रूपये खर्च केले जाणार आहेत. त्यामुळे घोड्यांची काळजी घेतली जाईल, अशी अपेक्षा करता येईल. मात्र घोडदळ कार्यरत असताना घोड्याला गर्दीचा त्रास झाला किंवा त्याला कोणी त्रास दिला आणि तो सैरभैर झाला तर होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी कोण घेणार हे आताच ठरवायला हवे. कारण घोडा सैरभैर होऊ शकतो, अशी शक्यताही काही तज्ज्ञांनी हा प्रस्ताव नाकारताना व्यक्त करताना केली होती. त्यामुळे घोडदळाचे भवितव्य काय असेल हे येणारा काळच ठरवेल. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीस