शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

बहु झाला कल्लोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 18:03 IST

अत्र-तत्र-सर्वत्र कसा आनंद भरुन वाहतोय. गुजरातमध्ये वेडा झालेला विकास महाराष्टÑात आल्यावर एकदम हुश्शार झालाय. अगदी त्याची बुध्दिमत्ता मापन चाचणी घेतली तर अनेक समुपदेशकांनी तोंडात पाची बोटे घातली.

मिलिंद कुलकर्णीअत्र-तत्र-सर्वत्र कसा आनंद भरुन वाहतोय. गुजरातमध्ये वेडा झालेला विकास महाराष्टÑात आल्यावर एकदम हुश्शार झालाय. अगदी त्याची बुध्दिमत्ता मापन चाचणी घेतली तर अनेक समुपदेशकांनी तोंडात पाची बोटे घातली. विकासासाठी किती हा आटापिटा, खटाटोप...किती ही मेहनत, परिश्रम..अधिकारी म्हणू नका, पदाधिकारी म्हणू नका, लोकप्रतिनिधी म्हणू नका...सगळे खपतायत विकासासाठी...अर्जुनाचे सारे लक्ष्य केवळ आणि केवळ माशाच्या डोळ्याकडे होते, अगदी तसेच सगळ्यांचे लक्ष्य केवळ २०१९ या आकड्याकडे आहे.महाराष्टÑ प्रांतीचा जळगाव हा सुभा तसा सुपीक. शतप्रतिशतची मात्रा यशस्वी. विकास याठिकाणी सौख्यभरे नांदतोय. विकासपुरुष, संकटमोचक, आरोग्यदूतांची मोठी परंपरा लाभलेली आहे. विकासपुरुषांना सध्या पक्षाने अल्पकाळ (?) विश्रांतीचा सल्ला दिला आहे. चाळीस वर्षांपासून अथकपणे हे विकासपुरुष कार्यरत आहेत. पक्ष म्हणू नका, मतदारसंघ म्हणू नका, जिल्हा म्हणू नका, खान्देश म्हणू नका, पुन्हा समाज म्हणू नका...कुणाचा विकास त्यांनी केला नाही. नव्या दमाचा सारथी लाभल्यावर विकासपुरुषांना पक्षाने ‘युक्तीच्या चार गोष्टी’ सांगण्याच्या भूमिकेत स्थापित केले. पक्षाच्या या निर्णयाचा आदर करीत विकासपुरुषांनी पक्षवाढीसाठी, कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी, कुटुंबातील सदस्यांऐवजी कार्यकर्त्यांना सत्तास्थाने देण्यासाठी, खान्देश आणि अर्थात जळगावची राहिलेली छोटी-छोटी विकास कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न, परिश्रम आणि मार्गदर्शन सुरु केले आहे. दोन-अडीच वर्षात सत्तास्थानी नसल्याचा खेद, दु:ख एवढेच काय अन्याय तर दूर राहिला, अंतमर््ानी व्यक्त केला नाही. जाहीरपणे व्यक्त करण्याची शक्यता तर केवळ असंभव. कायम पक्षाविषयी अभिमान, कौतुक आणि पक्षाने दिलेल्या मान सन्मानाविषयी कृतज्ञतेची भाषा..किती थोर विचार आणि किती थोर कृती...राहिले ते आमचे संकटमोचक. जळगाव जिल्ह्यात सर्वत्र आबादीआबाद आहे. सिंचनाची सगळी कामे झाली आहेत. दुष्काळातही सगळी धरणे धो-धो वाहत आहे. कालवे, बंधाऱ्यांमध्ये खळखळ पाणी नाचत आहे. शेती, बांधापर्यंत पाणी पोहोचले आहे. शेतकºयाला प्रधानसेवकांच्या संकल्पनेनुसार दुप्पट नफा होत आहे. ‘मेडिकल हब’ साकारले आहे. जळगावकरांना एखादा जरी आजार झाला तरी तो ‘हब’मध्ये जातो आणि कोणती पॅथी निवडावी,असा क्षणभर विचार करतो, लगेच ‘आरोग्यदूतां’ची फौज धावत येते. अ‍ॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, युनानी,नॅचरोपॅथी असे कोणत्या पॅथीचे उपचार घ्यायचे याविषयी मौलिक मार्गदर्शन केले जाते. सगळे उपचार, शस्त्रक्रिया, नंतरच्या सुविधा सगळ्याच एका छताखाली मिळत आहेत. सगळे प्रश्न सुटले आहेत. शतप्रतिशत झाले आहे. जनतेवर, पक्षावर कोणतेही संकट राहिले नसल्याने संकटमोचकांकडे मग श्रेष्ठींनी इतर सुभ्यांची जबाबदारी सोपविली आहे. कधी पालघर, कधी पारनेर, कधी नाशिक, कधी धुळे...एवढंच काय मोर्चा, उपोषण, आंदोलन असे काहीही असो...सगळ्यांवर एकच उपाय..संकटमोचक.तिसरे नेतृत्त्व तर अचाट, अफाट आणि विस्मयकारी असे आहेत. कधी काळी जळगावात सायकलवर फिरुन संघटनात्मक कार्य करणाºया या नेत्याने समाज, पक्ष, कार्यकर्ते आणि जनतेला वैचारिक, बौध्दिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक एवढी उंची गाठून दिली आहे की, हे नेते येतात रेल्वेने आणि जातात विमानाने. वेळ म्हणून विचारु नका. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर कार्यालय थाटून हे जनहिताच्या फाईलींचा निपटारा करतात. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर त्यांच्या समर्थकांना २०१९ चे मुख्यमंत्री त्यांच्यात दिसून येतात, असे हेच सांगतात. करवीर ते जळगाव व्हाया मुंबई असे कष्ट घेतलेल्या नेत्याला बक्षीस मिळायला नको.इतके प्रगल्भ, समजूतदार, द्रष्टे नेतृत्व लाभलेल्या जिल्ह्याला प्रशासकीय अधिकारीदेखील त्याच उंचीचे मिळणार हे स्वाभाविक. शासकीय सेवेचा मिळालेला कालावधी जळगावसाठी परिपूर्णपणे खर्च करुन आता या मंडळींना लपंडाव खेळायची लहर आली तर काय हरकत आहे. सतरा मजलीत ११ महिने घालविलेल्या आणि ‘जीव गुंतला’सारखी स्थिती झाल्याने पुन्हा एकदा तिकडे जावे का, असे द्वंद्व ब्रिटिशकालीन इमारतीतील सेवकाला वाटले तर त्याचे नवल काय? मुंबईला तर सगळेच जातात, पण अदलाबदल करायला काय हरकत आहे? आणि जोवर ‘पालकां’चा हात डोक्यावर आहे तोवर, कोणत्याठिकाणी काय व्हायला हवे, हे आम्ही सांगणार हे पालकत्वाच्या भावनेतून आहे, हे समजून घ्या. जर नाही समजून घेतले तर खेळण्यातली मोटार आणि चार तासांचे साखळी उपोषणाचे हत्यार हाती आहेच की हो...सोडू का..असा सगळा कल्लोळ माजलेला असताना आपण ‘आनंद’ घ्यायचा दुसरे काय?

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव