शहरं
Join us  
Trending Stories
1
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
4
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
5
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
6
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
7
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
8
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
9
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
10
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
11
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
12
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
13
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
14
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
15
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
16
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
17
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
18
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
19
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
20
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...

खासदार नित्यानंद रायसारख्या वाचाळवीरांना आवरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:22 IST

नरेंद्र मोदींवर बोट रोखाल तर हातच तोडू, असे तेजस्वी वक्तव्य भाजपच्या बिहार शाखेचे अध्यक्ष व खासदार नित्यानंद राय यांनी केले आहे.

नरेंद्र मोदींवर बोट रोखाल तर हातच तोडू, असे तेजस्वी वक्तव्य भाजपच्या बिहार शाखेचे अध्यक्ष व खासदार नित्यानंद राय यांनी केले आहे. भाजपच्या काही पुढा-यांनी एवढ्यात संयम गमावला असल्याचे व गुजरात विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी त्यांची भाषा जास्तीची वाचाळ होऊ लागल्याचे हे लक्षण आहे. मोदींनी आपले पूर्वायुष्य फार कष्टातून काढले आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका कराल तर खबरदार असे या नित्यानंदाने म्हटले आहे. मोदींहून अधिक खडतर आयुष्य काढलेली शास्त्रीजींसारखी माणसे देशाच्या पंतप्रधानपदावर याआधी आली आणि त्यांनाही टीकेला तोंड द्यावे लागले. मात्र त्यांच्या कोण्या झेंडेक-याने अशी भाषा आजवर वापरल्याचे दिसले नाही. पण आताचा काळ या भाषेवर न थांबता तशी प्रत्यक्ष कृती करण्याचा आहे. आता माणसे मारलीच जातात, त्यांना बांधून मारहाण होते, घरे जाळली जातात आणि वस्त्या पेटविल्या जातात. यातले गुन्हेगार सापडत नाहीत आणि मरणारे मरत असतात. आपल्या राजकीय व सामाजिक भूमिकांसाठी मारल्या गेलेल्या माणसांविषयीची श्वेतपत्रिका तात्काळ निघावी अशी आजची स्थिती आहे. दलित आणि अल्पसंख्याकांचे बळीही या पत्रिकेत सांगितले गेले पाहिजेत. बिहारमधल्या एका साध्या समाज मेळाव्यात बोलताना या नित्यानंदाला चढलेला पक्षज्वर पाहून तेथे उपस्थित असलेले भाजपचे अनेक नेतेच हादरल्याचे दिसले. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे त्या वक्तव्याविषयी बोलताना म्हणाले, की बोटे वा हात तोडण्याची भाषा त्यांनी पक्षाचा अभिमान म्हणून वापरली. ते त्यांच्या मनातले विधान मानण्याचे कारण नाही. एका राज्याच्या पक्षाध्यक्षाला सुशील मोदीसारखा उपमुख्यमंत्री हा वकील म्हणून लागतो ही मुळातच मोठ्या शरमेची गोष्ट आहे. मात्र हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर नितीशकुमारसारखे एकेकाळचे विवेकी व संयमी नेते आहेत. त्यांनीही या प्रकाराची दखल घेतली असणार. शिवाय अशा वक्तव्यांचा जनतेवर जो विपरत परिणाम होतो त्याचीही काळजी पक्षाच्या पुढाºयांना वाटलीच असणार. त्यामुळे अशी बाष्कळ विधाने करणाºया पुढाºयांना संयम शिकविण्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग घेण्याचा निर्णय भाजपच्या बिहार शाखेनेच आता घेतला आहे. हा वर्ग केवळ नेत्यांसाठी नसावा ही अपेक्षा येथे नोंदवणे आवश्यक आहे. भाजपने नेमलेले प्रचारी ट्रोलधारक आणि त्यांच्यावतीने सोशल मीडियावर राष्ट्रीय नेत्यांविषयी अत्यंत घाणेरडी भाषा लिहिणारे लोकही या वर्गात आणून बसवले पाहिजेत. वास्तविक नित्यानंद राय हे संघाचे कार्यकर्ते आहेत. या माणसाने आयुष्यभर संघातली बौद्धिके ऐकली असणार. मात्र ही सारी बौद्धिके किती परिणामशून्य असतात आणि ती ऐकून बाहेर पडलेली माणसे केवढी सडकछाप भाषा बोलू शकतात हे या प्रकरणातून प्रगट झाले आहे. लोकशाही ही विवेकाची शाळा आहे असे म्हटले जाते. प्रत्यक्ष विरोधकांविषयीही संयमाने व आदराने बोलण्याची शिकवण या शाळेत दिली जाते. परवा राहुल गांधी म्हणाले, आम्ही मोदींवर टीका करू पण पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे कधी बोलणार नाही. जी गोष्ट राहुलसारख्या तरुण नेत्याला समजते ती या नित्यानंदासारख्या प्रौढाला कळू नये हे लोकशाहीचा संस्कार न स्वीकारल्याचेच खरे लक्षण आहे. जगातील प्रतिष्ठित देशांत निवडणुकांचा होणारा प्रचार समोरासमोरच्या वादविवादातून होतो. बरोबरीचे नेते त्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. पण ते कधी संयम सोडत नाहीत. आपल्या पुढाºयांनीही त्यांच्यापासून काही चांगले शिकले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी