शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

खासदार नित्यानंद रायसारख्या वाचाळवीरांना आवरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:22 IST

नरेंद्र मोदींवर बोट रोखाल तर हातच तोडू, असे तेजस्वी वक्तव्य भाजपच्या बिहार शाखेचे अध्यक्ष व खासदार नित्यानंद राय यांनी केले आहे.

नरेंद्र मोदींवर बोट रोखाल तर हातच तोडू, असे तेजस्वी वक्तव्य भाजपच्या बिहार शाखेचे अध्यक्ष व खासदार नित्यानंद राय यांनी केले आहे. भाजपच्या काही पुढा-यांनी एवढ्यात संयम गमावला असल्याचे व गुजरात विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येते तसतशी त्यांची भाषा जास्तीची वाचाळ होऊ लागल्याचे हे लक्षण आहे. मोदींनी आपले पूर्वायुष्य फार कष्टातून काढले आहे, त्यामुळे त्यांच्यावर टीका कराल तर खबरदार असे या नित्यानंदाने म्हटले आहे. मोदींहून अधिक खडतर आयुष्य काढलेली शास्त्रीजींसारखी माणसे देशाच्या पंतप्रधानपदावर याआधी आली आणि त्यांनाही टीकेला तोंड द्यावे लागले. मात्र त्यांच्या कोण्या झेंडेक-याने अशी भाषा आजवर वापरल्याचे दिसले नाही. पण आताचा काळ या भाषेवर न थांबता तशी प्रत्यक्ष कृती करण्याचा आहे. आता माणसे मारलीच जातात, त्यांना बांधून मारहाण होते, घरे जाळली जातात आणि वस्त्या पेटविल्या जातात. यातले गुन्हेगार सापडत नाहीत आणि मरणारे मरत असतात. आपल्या राजकीय व सामाजिक भूमिकांसाठी मारल्या गेलेल्या माणसांविषयीची श्वेतपत्रिका तात्काळ निघावी अशी आजची स्थिती आहे. दलित आणि अल्पसंख्याकांचे बळीही या पत्रिकेत सांगितले गेले पाहिजेत. बिहारमधल्या एका साध्या समाज मेळाव्यात बोलताना या नित्यानंदाला चढलेला पक्षज्वर पाहून तेथे उपस्थित असलेले भाजपचे अनेक नेतेच हादरल्याचे दिसले. त्या राज्याचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी हे त्या वक्तव्याविषयी बोलताना म्हणाले, की बोटे वा हात तोडण्याची भाषा त्यांनी पक्षाचा अभिमान म्हणून वापरली. ते त्यांच्या मनातले विधान मानण्याचे कारण नाही. एका राज्याच्या पक्षाध्यक्षाला सुशील मोदीसारखा उपमुख्यमंत्री हा वकील म्हणून लागतो ही मुळातच मोठ्या शरमेची गोष्ट आहे. मात्र हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही. बिहारच्या मुख्यमंत्रिपदावर नितीशकुमारसारखे एकेकाळचे विवेकी व संयमी नेते आहेत. त्यांनीही या प्रकाराची दखल घेतली असणार. शिवाय अशा वक्तव्यांचा जनतेवर जो विपरत परिणाम होतो त्याचीही काळजी पक्षाच्या पुढाºयांना वाटलीच असणार. त्यामुळे अशी बाष्कळ विधाने करणाºया पुढाºयांना संयम शिकविण्यासाठी एक प्रशिक्षण वर्ग घेण्याचा निर्णय भाजपच्या बिहार शाखेनेच आता घेतला आहे. हा वर्ग केवळ नेत्यांसाठी नसावा ही अपेक्षा येथे नोंदवणे आवश्यक आहे. भाजपने नेमलेले प्रचारी ट्रोलधारक आणि त्यांच्यावतीने सोशल मीडियावर राष्ट्रीय नेत्यांविषयी अत्यंत घाणेरडी भाषा लिहिणारे लोकही या वर्गात आणून बसवले पाहिजेत. वास्तविक नित्यानंद राय हे संघाचे कार्यकर्ते आहेत. या माणसाने आयुष्यभर संघातली बौद्धिके ऐकली असणार. मात्र ही सारी बौद्धिके किती परिणामशून्य असतात आणि ती ऐकून बाहेर पडलेली माणसे केवढी सडकछाप भाषा बोलू शकतात हे या प्रकरणातून प्रगट झाले आहे. लोकशाही ही विवेकाची शाळा आहे असे म्हटले जाते. प्रत्यक्ष विरोधकांविषयीही संयमाने व आदराने बोलण्याची शिकवण या शाळेत दिली जाते. परवा राहुल गांधी म्हणाले, आम्ही मोदींवर टीका करू पण पंतप्रधानपदाच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल असे कधी बोलणार नाही. जी गोष्ट राहुलसारख्या तरुण नेत्याला समजते ती या नित्यानंदासारख्या प्रौढाला कळू नये हे लोकशाहीचा संस्कार न स्वीकारल्याचेच खरे लक्षण आहे. जगातील प्रतिष्ठित देशांत निवडणुकांचा होणारा प्रचार समोरासमोरच्या वादविवादातून होतो. बरोबरीचे नेते त्यात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतात. पण ते कधी संयम सोडत नाहीत. आपल्या पुढाºयांनीही त्यांच्यापासून काही चांगले शिकले पाहिजे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी