शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

मोर्णा की बात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:50 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जगभरातील विभिन्न संस्कृतींची मुहूर्तमेढ नद्यांच्या काठीच रोवल्या गेली. मनुष्य जातीच्या पालनपोषणात नद्यांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात अकोला शहरातील मोर्णा नदी स्वच्छता अभियानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. जगभरातील विभिन्न संस्कृतींची मुहूर्तमेढ नद्यांच्या काठीच रोवल्या गेली. मनुष्य जातीच्या पालनपोषणात नद्यांनी खूप मोठी भूमिका अदा केली आहे. त्यामुळेच नद्यांना जीवनदायिनी म्हणून संबोधले जाते. भारतीय संस्कृतीत तर नद्यांना मातेचा दर्जा देण्यात आला आहे; पण दुर्दैवाने तो केवळ संबोधनापुरताच उरला आहे. प्रत्यक्षात आम्ही नद्यांची एवढी अवहेलना केली आहे, की त्यांना अक्षरश: गटारांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जिथे गंगेसारख्या नदीची आम्ही पुरती वासलात लावली आहे, तिथे मोर्णेचा काय पाड? काही वर्षांपूर्वीपर्यंत मोर्णा बारमाही होती. तत्कालीन ब्रिटिश अधिकाºयांनी अकोल्यात मोर्णेवर बंधारा बांधून जलतरण आणि नौकानयनाची सुविधा करून घेतली होती. याचा अर्थ त्या काळी मोर्णा नक्कीच एवढी स्वच्छ होती, की ती ब्रिटिशांसाठी एक विरंगुळ्याचे ठिकाण बनली होती. त्याच मोर्णेच्या काठी आज नाकाला रुमाल लावल्याशिवाय उभे राहता येत नाही, एवढी ती घाणेरडी झाली आहे. अकोल्याचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने आता लोकसहभागातून मोर्णेच्या स्वच्छतेसाठी अभियान सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात नदीत बोकाळलेली जलकुंभी हटविण्याचे काम सुरू आहे. पुढे नदीत वाहत येणाºया शहरातील गटारांना प्रतिबंध घालून, दोन्ही तिरांचे सौंदर्यीकरण करण्याचा घाट घालण्यात आला आहे. मनोदय निश्चितपणे चांगला आहे; पण तो शेवटावर जाणार का, हा खरा प्रश्न आहे. आम्ही भारतीय आरंभशूर आहोत. कोणत्याही कामास हिरीरीने प्रारंभ करायचा आणि ते शेवटास मात्र न्यायचे नाही, हे आमचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मोर्णा स्वच्छता अभियानाचे तसे होऊ नये, ही प्रत्येक जागरूक अकोलेकराची इच्छा आहे. वस्तुत: शहराच्या मधोमध वाहणारी नदी ही शहराचे वैभव असते. युरोपातील कोणत्याही शहरातून वाहणाºया नदीकडे बघितल्यास त्याची प्रचिती येते; पण त्यासाठी नदीला नदीच ठेवावे लागते, तिचे गटार होऊ देऊन चालत नाही. दुर्दैवाने आमच्या दृष्टीने शहरातून वाहणारी नदी ही घाण, कचरा वाहून नेण्यासाठी निसर्गाने बहाल केलेली सोय आहे. जोपर्यंत ही मानसिकता बदलण्यात यश येणार नाही, तोपर्यंत कितीही स्वच्छता अभियाने राबविली तरी नद्या स्वच्छ होऊ शकणार नाहीत. जर नद्यांमध्ये गटारे सोडून देणे आणि कचरा टाकणे बंद केले, तर कोणतीही नदी तिच्या स्वच्छतेची काळजी स्वत:च घेते. प्रत्येक नागरिकाने हे ध्यानी घेतले, तर नद्यांच्या स्वच्छतेसाठी अभियानांची गरजच भासणार नाही.

टॅग्स :Morna Riverमोरणा नदीMorna Swachata Missionमोरणा स्वछता मोहीमMan ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी