शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

ममतांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:27 IST

पश्चिम बंगाल राज्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत त्याचे प्रतिबिंब उमटत राहते.

पश्चिम बंगाल राज्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत त्याचे प्रतिबिंब उमटत राहते. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे स्वातंत्र्य लढ्यातही बंगालने वेगळा ठसा उमटवला होता. आतासुद्धा बंगालचे राजकारण वेगळ्याच वाटेने चालत आहे. गेली चार दशके या राज्याने डाव्या पक्षांच्या आघाडीला सत्तेवर बसविले होते. या राज्यातून काँग्रेस पक्ष १९७७ पासून ४० वर्षे सत्तेपासून दूर आहे. आता याच पक्षातून तयार झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. २०११ मध्ये २९४ सदस्यीय विधानसभेत १७६ जागा जिंकून ३४ वर्षांची डाव्या आघाडीची भक्कम ताकद भेदली होती. जे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला जमले नव्हते ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने केले होते. गतवर्षी (२०१६) या पक्षाने परत एकदा २११ जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला लढत देणारी कोणतीही शक्ती नसल्याचेच स्पष्ट केले होते. चार दिवसांपूर्वी राज्यातील सात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये १४८ प्रभाग होते. त्यापैकी तब्बल १४० प्रभाग एकट्या तृणमूल काँग्रेसने जिंकत पश्चिम बंगालमध्ये त्याला शह देणारी दुसरी शक्तीच नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. भाजपला सहा प्रभागात, डाव्या आघाडीला आणि अपक्षाला केवळ एका प्रभागात यश मिळाले. पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी डावी आघाडी विरुद्ध काँग्रेस असा सामना होत होता. त्या डाव्या आघाडीच्या प्रभावाला काँग्रेस पक्षाने यशस्वी टक्कर कधी दिलीच नाही. डाव्या आघाडीला तृणमूल काँग्रेसने आव्हान दिले. डाव्या आघाडीची मुख्य विरोधी पक्षाची भूमिकाही संपते आणि भारतीय जनता पक्ष या राज्याला एक स्पर्धक ठरू शकतो का? असे वातावरण तयार होते आहे ! भाजपला या मोठ्या राज्यात शिरकाव करायचा आहे. डाव्या आघाडीला पुन्हा उभारी मिळेल, असे वातावरण नाही. काँग्रेसचीसुद्धा हीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत भाजपने जोर लावायचा असे ठरविले आहे, पण सध्या तरी तृणमूल काँग्रेसचा दबदबा कमी होताना दिसत नाही.