शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ममतांचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 00:27 IST

पश्चिम बंगाल राज्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत त्याचे प्रतिबिंब उमटत राहते.

पश्चिम बंगाल राज्याची अनेक वैशिष्ट्ये आहेत. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, सांस्कृतिक आदी क्षेत्रांत त्याचे प्रतिबिंब उमटत राहते. याच ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे स्वातंत्र्य लढ्यातही बंगालने वेगळा ठसा उमटवला होता. आतासुद्धा बंगालचे राजकारण वेगळ्याच वाटेने चालत आहे. गेली चार दशके या राज्याने डाव्या पक्षांच्या आघाडीला सत्तेवर बसविले होते. या राज्यातून काँग्रेस पक्ष १९७७ पासून ४० वर्षे सत्तेपासून दूर आहे. आता याच पक्षातून तयार झालेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. २०११ मध्ये २९४ सदस्यीय विधानसभेत १७६ जागा जिंकून ३४ वर्षांची डाव्या आघाडीची भक्कम ताकद भेदली होती. जे अखिल भारतीय काँग्रेस पक्षाला जमले नव्हते ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने केले होते. गतवर्षी (२०१६) या पक्षाने परत एकदा २११ जागा जिंकत पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला लढत देणारी कोणतीही शक्ती नसल्याचेच स्पष्ट केले होते. चार दिवसांपूर्वी राज्यातील सात महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये १४८ प्रभाग होते. त्यापैकी तब्बल १४० प्रभाग एकट्या तृणमूल काँग्रेसने जिंकत पश्चिम बंगालमध्ये त्याला शह देणारी दुसरी शक्तीच नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. भाजपला सहा प्रभागात, डाव्या आघाडीला आणि अपक्षाला केवळ एका प्रभागात यश मिळाले. पश्चिम बंगालमध्ये एकेकाळी डावी आघाडी विरुद्ध काँग्रेस असा सामना होत होता. त्या डाव्या आघाडीच्या प्रभावाला काँग्रेस पक्षाने यशस्वी टक्कर कधी दिलीच नाही. डाव्या आघाडीला तृणमूल काँग्रेसने आव्हान दिले. डाव्या आघाडीची मुख्य विरोधी पक्षाची भूमिकाही संपते आणि भारतीय जनता पक्ष या राज्याला एक स्पर्धक ठरू शकतो का? असे वातावरण तयार होते आहे ! भाजपला या मोठ्या राज्यात शिरकाव करायचा आहे. डाव्या आघाडीला पुन्हा उभारी मिळेल, असे वातावरण नाही. काँग्रेसचीसुद्धा हीच अवस्था आहे. अशा परिस्थितीत भाजपने जोर लावायचा असे ठरविले आहे, पण सध्या तरी तृणमूल काँग्रेसचा दबदबा कमी होताना दिसत नाही.