शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:00 IST

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली.

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली. मरणारी ही माणसे नक्षल्यांचा उघडपणे विरोध करणारी होती. ३७ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव केलेल्या नक्षलवादाचा खरा चेहरा कळून चुकल्याने त्यांना कोणतीही मदत न करण्याचा निर्णय या आदिवासींच्या जीवावर उठला. आजतागायत ४९० हून अधिक आदिवासी नक्षलवाद्यांच्या बंदुकीने मारले गेले. यातील काही प्रकरणात तर हे कृत्य अनवधानाने झाल्याचे मान्य करीत नक्षली या आदिवासींची माफीही मागायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. विकासाची जी स्वप्नं नक्षल्यांनी आजवर आदिवासींना दाखविली मुळात तीच त्यांच्या विकासात बाधक असल्याची जाणीव झाल्याने आदिवासी आता नक्षल विरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. खरं तर ही नक्षलवाद विरुद्ध आदिवासी अशा संघर्षाची सुरुवात असून नक्षलवाद्यांसाठी ही आत्मविनाशक वाटचाल आहे. नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करताना नागरिकांना आता भीती वाटत नाही. उलट नक्षल हल्ल्यात मरणाºया नागरिकांचे स्मारक बांधण्याचे धाडस त्यांच्यात आले आहे. पोलिसांसाठी ही जमेची बाजू आहे. पोलीस आणि आदिवासींमधील दरी गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी भरून काढण्याचे मोठे कार्य या जिल्ह्यात केले आहे. खचलेल्या पोलीस दलात नवचैतन्य निर्माण करण्याची किमया आबांनी करून दाखविली.पोलीस तुमचे शत्रू नसून मित्र आहेत, हेदेखील आबांनी आदिवासींंना पटवून दिले. तेथूनच नक्षलवादाला लागलेली ओहोटी आजही कायम आहे. जमिनीत पेरलेल्या भूसुरूंगाची माहिती वेळेवर मिळू लागली. नक्षल्यांना गावातून मिळणाºया मदतीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आणि याच मुळे नक्षलवाद्यांनी आता नागरिकांना टार्गेट करणे सुरू केले आहे. पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून असले भ्याड हल्ले होत आहेत. पूर्वी पोलिसांचा खब-या असा ठपका ठेवत एखाद्याला भरचौकात मारणारे नक्षली आता अपहरण करून एकांतवासात त्याची हत्या करतात तेव्हा नागरिकांचीही भीती त्यांना असल्याचे स्पष्ट होते. शासकीय आकड्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्याची संख्या फक्त २२० च्या घरात आहे. अर्थात आपण उघडपणे नागरिकांचादेखील सामना करू शकत नाही, ही बाब नक्षल्यांना कळून चुकली आहे. नागरिकांनी नक्षलवादाचा बीमोड करण्याचा संकल्प घेतला आहे, त्याला गरज आहे ती पोलिसांच्या सहकार्याची.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी