शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

नक्षलवाद्यांच्या बंदुकीने ४९०हून अधिक आदिवासींचा घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:00 IST

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली.

मागील चार दिवसात नक्षलवाद्यांनी निष्पाप आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात तिघांचा बळी घेतला तर जैनी परसा ही महिला थोडक्यात बचावली. मरणारी ही माणसे नक्षल्यांचा उघडपणे विरोध करणारी होती. ३७ वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात शिरकाव केलेल्या नक्षलवादाचा खरा चेहरा कळून चुकल्याने त्यांना कोणतीही मदत न करण्याचा निर्णय या आदिवासींच्या जीवावर उठला. आजतागायत ४९० हून अधिक आदिवासी नक्षलवाद्यांच्या बंदुकीने मारले गेले. यातील काही प्रकरणात तर हे कृत्य अनवधानाने झाल्याचे मान्य करीत नक्षली या आदिवासींची माफीही मागायचे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. विकासाची जी स्वप्नं नक्षल्यांनी आजवर आदिवासींना दाखविली मुळात तीच त्यांच्या विकासात बाधक असल्याची जाणीव झाल्याने आदिवासी आता नक्षल विरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. खरं तर ही नक्षलवाद विरुद्ध आदिवासी अशा संघर्षाची सुरुवात असून नक्षलवाद्यांसाठी ही आत्मविनाशक वाटचाल आहे. नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त करताना नागरिकांना आता भीती वाटत नाही. उलट नक्षल हल्ल्यात मरणाºया नागरिकांचे स्मारक बांधण्याचे धाडस त्यांच्यात आले आहे. पोलिसांसाठी ही जमेची बाजू आहे. पोलीस आणि आदिवासींमधील दरी गडचिरोलीचे तत्कालीन पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी भरून काढण्याचे मोठे कार्य या जिल्ह्यात केले आहे. खचलेल्या पोलीस दलात नवचैतन्य निर्माण करण्याची किमया आबांनी करून दाखविली.पोलीस तुमचे शत्रू नसून मित्र आहेत, हेदेखील आबांनी आदिवासींंना पटवून दिले. तेथूनच नक्षलवादाला लागलेली ओहोटी आजही कायम आहे. जमिनीत पेरलेल्या भूसुरूंगाची माहिती वेळेवर मिळू लागली. नक्षल्यांना गावातून मिळणाºया मदतीचे प्रमाण अत्यंत कमी झाले आणि याच मुळे नक्षलवाद्यांनी आता नागरिकांना टार्गेट करणे सुरू केले आहे. पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्याच्या प्रयत्नातून असले भ्याड हल्ले होत आहेत. पूर्वी पोलिसांचा खब-या असा ठपका ठेवत एखाद्याला भरचौकात मारणारे नक्षली आता अपहरण करून एकांतवासात त्याची हत्या करतात तेव्हा नागरिकांचीही भीती त्यांना असल्याचे स्पष्ट होते. शासकीय आकड्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात नक्षल्याची संख्या फक्त २२० च्या घरात आहे. अर्थात आपण उघडपणे नागरिकांचादेखील सामना करू शकत नाही, ही बाब नक्षल्यांना कळून चुकली आहे. नागरिकांनी नक्षलवादाचा बीमोड करण्याचा संकल्प घेतला आहे, त्याला गरज आहे ती पोलिसांच्या सहकार्याची.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी