शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ही तर राजेशाहीच; पक्षांतर हा भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 02:54 IST

पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही.

पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही. अमेरिकेच्या लोकशाहीलाही ३०० वर्षे होत आली, पण त्याही देशात कोणत्या मोठ्या नेत्याने पक्षांतर केले, असे कधी दिसले नाही. त्या दोन देशांतील पक्ष विचारसरणीवर आधारले आहेत आणि विचारात होणारे भेद वादविवाद, चर्चा व संवाद या मार्गाने मिटविणारी व्यासपीठेही त्या देशात आहेत, शिवाय तेथे पक्षांतर्गत लोकशाही आहे. प्रत्येकच निवडणुकीत, मग ती अध्यक्षांची असो, सिनेटरांची वा मेयरच्या पदाची, तेथील उमेदवारांना त्यांची लोकप्रियता प्रतिस्पर्धी उमेदवारांशी जाहीर वादविवाद करून जनतेत सिद्ध करावी लागते. नेत्याने तिकिटे द्यायची आणि लोकांनी मते द्यायची, हा हिंदुस्थानी प्रकार तेथे नाही. भारतातले पक्ष जात व धर्मासारख्या जन्मदत्त श्रद्धांवर उभे आहेत. येथे एकेक जातीचे पक्ष आहेत, तर काही जातींच्या बेरजा करून तयार झाले आहेत. त्यामुळे भारतात पक्षांतर म्हणजे जात्यंतर किंवा धर्मांतर होते व ईश्वरी अपराध होतो. म्हणून पक्षाचे पुढारी सांगतील तिकडे पाहणे व ते नेतील तिकडे जाणे, यातच पक्षनिष्ठा आहे असा समज आहे. या समजाला धक्का तेव्हा बसतो, जेव्हा त्यातल्या एखाद्याचे व्यक्तिगत हितसंबंध दुखावले जातात. हा धक्का वैचारिक मतभेदातून येत नाही, तो खासगी स्वार्थातून येतो. शरद पवारांपासून विजयसिंह मोहिते पाटलांनी पुत्रासह दूर जाणे किंवा काँग्रेसचे विधानसभेतील नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवाने भाजपाच्या तिकिटावर उभे राहणे यात वैचारिक परिवर्तन वा हृदयपरिवर्तन नाही. जुना नेता तिकीट देत नाही, हा राग आहे किंवा ‘त्यांनी आम्हाला नेहमीच मागे ठेवले’ हा रोष आहे. दोन-दोन आणि तीन-तीन पिढ्या सत्ता भोगलेल्या घराण्यांतली माणसे असे वागताना पाहिली की, मग या प्रकारात जात्यंधतेहून घराणेशाहीचा स्वार्थच बळकट झाला असल्याचे दिसते. साऱ्या देशाचे चित्र असे आहे. लालूप्रसाद, रामविलास पासवान, करुणानिधी, विजयाराजे शिंदे किंवा मुलायम सिंग यांच्या घरातली किती माणसे त्यांच्या पक्षात सर्वोच्च जागी व सत्तेत आहेत? हा प्रकार आता संघप्रणीत भाजपानेही अनुसरायला सुरुवात केली आहे. फडणवीस, खडसे, मेघे, अडवाणी, जोशी किंवा त्यांच्या पक्षांच्या किती खासदार व आमदारांची पिले त्या पक्षाने विधिमंडळ व संसदेते पाठविली आहेत? एकट्या नेहरू-गांधी कुटुंबावर टीका करणारी माणसे या पक्षांच्या घराणेशाहीविषयी बोलत नाहीत, तेव्हा ती कुणाची फसवणूक करीत असतात? त्या मौनामागे ही घराणेशाही मान्य असल्याचे कारण आहे. पवारांच्या घरातली व नात्यातली किती माणसे सत्तेवर आहेत आणि प्रत्यक्ष सत्तापद घेत नसतील, तरी ठाकरे कुटुंबाच्या नियंत्रणात किती सत्तापदे आहेत? साधे तिकीट मिळाले की, घरातल्या इतरांची सोय करायला धडपणारी ही माणसे पक्षांतर्गत लोकशाही कशी आणतील? आणि पक्षांतर्गत लोकशाहीवाचून देशातील लोकशाही कशी उभी होईल? अमेरिकेत जॉन केनेडींच्या तिसºया भावाने सिनेटची निवडणूक लढविली, तेव्हा ‘देशात केनेडींची साथ सुरू झाली’ अशी टीका तेथे झाली. जोवर राजकीय पक्ष, विचार, कार्यक्रम आणि तत्त्वज्ञान यावर उभे होत नाहीत, तोवर आपल्या राजकारणातील घराणेशाही, जातीयता व धर्मांधता अशीच राहणार आहेत. त्यातूनच विचारांहून मोदी मोठे होतात आणि त्यांचे भक्त म्हणवून घेणाऱ्यांनाही आपला अभिमान वाटू लागतो. हीच गोष्ट राहुल गांधींची, ममता बॅनर्जींची, लालूंची, पवारांची आणि ठाकरेंचीही. कदाचित, जुनी राजेशाही व बादशाही वृत्ती आपण अजून टाकली नसावी आणि परंपरागत चालत आलेली सरंजामी वृत्ती श्रीमंतांसह गरिबांनी अजून तशीच जपली असावी, असे वाटायला लावणारे हे चित्र आहे. हे नेमके कशाचे द्योतक आहे? जुनी मानसिकता आपण अद्याप का झटकू शकत नाही? कदाचित, साध्या, सामान्य व बुद्धिमान नेतृत्वाहून आम्हाला राजांचे किंवा राजांसारखे असणा-यांचे नेतृत्वच अधिक भावत असावे!

 

टॅग्स :Electionनिवडणूक