शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

ही तर राजेशाहीच; पक्षांतर हा भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2019 02:54 IST

पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही.

पक्षांतर हा साऱ्या जगात एकट्या भारतीय लोकशाहीचा दुर्गुणविशेष आहे. इंग्लंडमध्ये गेली ७०० वर्षे लोकशाही विकसित होत आली आहे, पण चर्चिलने केलेल्या पक्षांतराखेरीज त्या देशात तसे दुसरे मोठे उदाहरण नाही. अमेरिकेच्या लोकशाहीलाही ३०० वर्षे होत आली, पण त्याही देशात कोणत्या मोठ्या नेत्याने पक्षांतर केले, असे कधी दिसले नाही. त्या दोन देशांतील पक्ष विचारसरणीवर आधारले आहेत आणि विचारात होणारे भेद वादविवाद, चर्चा व संवाद या मार्गाने मिटविणारी व्यासपीठेही त्या देशात आहेत, शिवाय तेथे पक्षांतर्गत लोकशाही आहे. प्रत्येकच निवडणुकीत, मग ती अध्यक्षांची असो, सिनेटरांची वा मेयरच्या पदाची, तेथील उमेदवारांना त्यांची लोकप्रियता प्रतिस्पर्धी उमेदवारांशी जाहीर वादविवाद करून जनतेत सिद्ध करावी लागते. नेत्याने तिकिटे द्यायची आणि लोकांनी मते द्यायची, हा हिंदुस्थानी प्रकार तेथे नाही. भारतातले पक्ष जात व धर्मासारख्या जन्मदत्त श्रद्धांवर उभे आहेत. येथे एकेक जातीचे पक्ष आहेत, तर काही जातींच्या बेरजा करून तयार झाले आहेत. त्यामुळे भारतात पक्षांतर म्हणजे जात्यंतर किंवा धर्मांतर होते व ईश्वरी अपराध होतो. म्हणून पक्षाचे पुढारी सांगतील तिकडे पाहणे व ते नेतील तिकडे जाणे, यातच पक्षनिष्ठा आहे असा समज आहे. या समजाला धक्का तेव्हा बसतो, जेव्हा त्यातल्या एखाद्याचे व्यक्तिगत हितसंबंध दुखावले जातात. हा धक्का वैचारिक मतभेदातून येत नाही, तो खासगी स्वार्थातून येतो. शरद पवारांपासून विजयसिंह मोहिते पाटलांनी पुत्रासह दूर जाणे किंवा काँग्रेसचे विधानसभेतील नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चिरंजीवाने भाजपाच्या तिकिटावर उभे राहणे यात वैचारिक परिवर्तन वा हृदयपरिवर्तन नाही. जुना नेता तिकीट देत नाही, हा राग आहे किंवा ‘त्यांनी आम्हाला नेहमीच मागे ठेवले’ हा रोष आहे. दोन-दोन आणि तीन-तीन पिढ्या सत्ता भोगलेल्या घराण्यांतली माणसे असे वागताना पाहिली की, मग या प्रकारात जात्यंधतेहून घराणेशाहीचा स्वार्थच बळकट झाला असल्याचे दिसते. साऱ्या देशाचे चित्र असे आहे. लालूप्रसाद, रामविलास पासवान, करुणानिधी, विजयाराजे शिंदे किंवा मुलायम सिंग यांच्या घरातली किती माणसे त्यांच्या पक्षात सर्वोच्च जागी व सत्तेत आहेत? हा प्रकार आता संघप्रणीत भाजपानेही अनुसरायला सुरुवात केली आहे. फडणवीस, खडसे, मेघे, अडवाणी, जोशी किंवा त्यांच्या पक्षांच्या किती खासदार व आमदारांची पिले त्या पक्षाने विधिमंडळ व संसदेते पाठविली आहेत? एकट्या नेहरू-गांधी कुटुंबावर टीका करणारी माणसे या पक्षांच्या घराणेशाहीविषयी बोलत नाहीत, तेव्हा ती कुणाची फसवणूक करीत असतात? त्या मौनामागे ही घराणेशाही मान्य असल्याचे कारण आहे. पवारांच्या घरातली व नात्यातली किती माणसे सत्तेवर आहेत आणि प्रत्यक्ष सत्तापद घेत नसतील, तरी ठाकरे कुटुंबाच्या नियंत्रणात किती सत्तापदे आहेत? साधे तिकीट मिळाले की, घरातल्या इतरांची सोय करायला धडपणारी ही माणसे पक्षांतर्गत लोकशाही कशी आणतील? आणि पक्षांतर्गत लोकशाहीवाचून देशातील लोकशाही कशी उभी होईल? अमेरिकेत जॉन केनेडींच्या तिसºया भावाने सिनेटची निवडणूक लढविली, तेव्हा ‘देशात केनेडींची साथ सुरू झाली’ अशी टीका तेथे झाली. जोवर राजकीय पक्ष, विचार, कार्यक्रम आणि तत्त्वज्ञान यावर उभे होत नाहीत, तोवर आपल्या राजकारणातील घराणेशाही, जातीयता व धर्मांधता अशीच राहणार आहेत. त्यातूनच विचारांहून मोदी मोठे होतात आणि त्यांचे भक्त म्हणवून घेणाऱ्यांनाही आपला अभिमान वाटू लागतो. हीच गोष्ट राहुल गांधींची, ममता बॅनर्जींची, लालूंची, पवारांची आणि ठाकरेंचीही. कदाचित, जुनी राजेशाही व बादशाही वृत्ती आपण अजून टाकली नसावी आणि परंपरागत चालत आलेली सरंजामी वृत्ती श्रीमंतांसह गरिबांनी अजून तशीच जपली असावी, असे वाटायला लावणारे हे चित्र आहे. हे नेमके कशाचे द्योतक आहे? जुनी मानसिकता आपण अद्याप का झटकू शकत नाही? कदाचित, साध्या, सामान्य व बुद्धिमान नेतृत्वाहून आम्हाला राजांचे किंवा राजांसारखे असणा-यांचे नेतृत्वच अधिक भावत असावे!

 

टॅग्स :Electionनिवडणूक