शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
3
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
4
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
5
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
6
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
7
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
8
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
9
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
10
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
11
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
12
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
13
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
14
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
15
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
16
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
17
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
18
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
19
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
20
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...

मोदी, संस्कृत आणि भारताची धर्मनिरपेक्षता

By admin | Updated: October 3, 2015 10:13 IST

आयर्लंडमध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी संस्कृत गीत गाणाऱ्या छोट्या मुला-मुलींचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं, परंतु त्यानंतर त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हटलं ते अत्यंत तिरकस होतं

डॉ. रुपा कुळकर्णी (संस्कृत भाषेच्या अभ्यासक)आयर्लंडमध्ये प्रधानमंत्री मोदी यांच्या स्वागतासाठी संस्कृत गीत गाणाऱ्या छोट्या मुला-मुलींचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं, परंतु त्यानंतर त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला जे म्हटलं ते अत्यंत तिरकस होतं व तसं बोलण्याची, विशेषत: परदेशात जाऊन बोलण्याची काहीच गरज नव्हती. ते म्हणाले, ‘मेहमानोंका संस्कृत गीत से स्वागत यहा आयर्लंडमेही संभव है. ऐसा स्वागत यदि हिंदुस्थान मे करते तो? तो हमारे सारे धर्मनिरपेक्षतावादी न जाने क्या हंगामा करते. हिंदुस्थान में यह कतई संभव नही.’ भाषणाच्या भरात मग त्यांनी आधीची एक आठवण जागी करताना, अमेरिकेच्या पहिल्या भेटीत अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना भगवद्गीता दिल्यावर याच लोकांनी (पुरोगामी) आपल्याला धारेवर धरलं होतं, असे सांगितले. मात्र दरवेळी ते भारताचा उल्लेख जाणून बुजून ‘हिंदुस्थान’ असाच करीत होते! जे संस्कृत गीत तिथल्या मुलामुलींनी म्हटलं ते ‘सर्वेऽत्र सुखिन: सन्तु’ हे होतं. ती एक प्रार्थना आहे, प्रत्येकच धर्मात अशी मंगल कामना केली जाते. ‘सब्बे सत्ता सुखी होन्तु’ ही पाली भाषेतील प्रार्थनादेखील हुबेहूब संस्कृत सारखीच आहे. भाजपाला एकहाती सत्ता मिळाली तेव्हाच, दोन गोष्टींचं आता महत्त्व वाढणार हे ठरून गेलं होतं. एक म्हणजे देशाचं हिंदुस्थान हे नाव व दुसरं म्हणजे संस्कृत. संस्कृत ही सर्व भारतीय भाषांची जननी असल्याचा चुकीचा प्रचार करून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्या कुळातील साऱ्या परिवाराने हिंदू धर्माशी आणि हिंदुत्वाशी संस्कृत भाषेचा अतूट संबंध जोडून ‘संस्कृत फक्त हिंदूंची’ असा शिक्का मारला आहे. याला बळकटी येण्यास कारणीभूत ठरले आहेत ते हिंदूंचे धर्मग्रंथ. चारही वेद, प्रत्येक वेदाचे ब्राह्मणग्रंथ, आरण्यके, उपनिषदे व त्यावरची भाष्ये, तसेच शेकडो पुराणग्रंथ, रामायण व महाभारत ही आर्षमहाकाव्ये, कालिदासादी महाकवींची महाकाव्ये व नाटके आणि मुख्य म्हणजे स्फूट स्वरूपातली देवदेवतांची हजारो संस्कृत स्तोत्रे, यावर हिंदू धर्म आधारित होता व आजही आहे. हिंदूंचं तत्त्वज्ञान, ज्याला ब्राह्मणी धर्मात षड्दर्शने म्हणतात, ती वैदिक दर्शने आहेत. त्यांची सूत्रे व त्यावरील भाष्ये ही समजण्यास दुर्बोध अशा संस्कृत भाषेतच लिहिली आहेत. शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्काचार्य, वल्लभाचार्य असे त्या त्या संप्रदायाचे धुरीण आचार्य होऊन गेले ज्यांनी ८ व्या शतकापासून १६ व्या शतकापर्यंत ही प्रचंड संस्कृत भाष्यरचना केली. वास्तविक त्यापूर्वी बौद्ध, जैन व चार्वाक तत्त्वज्ञांनी तत्त्वज्ञानावरील फार महत्त्वाचे ग्रंथ संस्कृतातच लिहिले होते. परंतु ती अवैदिक दर्शने असल्यामुळे आपल्या देशात त्यांची व त्यांच्या श्रमणसंस्कृतीची घोर उपेक्षा करण्यात आली. त्यांना नास्तिक म्हणून बहिष्कृत करण्यात आले व संस्कृत भाषेत ग्रंथरचना करूनही संस्कृतच्या क्षेत्रातून डावलण्यात आले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचारांचा आणि संस्कृतचा संबंध तुटला. खरं तर इतर भारतीय भाषांनाही संस्कृतच्या बरोबरीने संवैधानिक दर्जा मिळालेला आहे. संस्कृत इतक्याच पाली आणि अरेबिक उर्दू देखील अभिजात भाषा आहेत. परंतु संस्कृतची महती वाढविण्यात आली ती त्या भाषेतील प्राचीन ब्राह्मणी धर्मग्रंथांमुळे. धर्मपुस्तकं संस्कृतात नसती तर तिला हे विशेष स्थान या लोकांनी दिलं असतं कां? ‘मंगलं भगवान् विष्णु: मंगलं गरुडध्वज:।मंगलं पुण्डरीकाक्षो मंगलायतनं हरि:।।’यासारख्या श्लोकांच्या मोठमोठ्याने केलेल्या पठणासह केलेले होमहवन पूजा-अर्चा, दान-दक्षिणा, महाप्रसाद यालाच धर्म म्हणतात! परंतु सामान्यांना यात, खोटं का असेना, जे समाधान मिळतं, ते पाहून धर्मनिरपेक्षतेच्या समर्थकांनी या प्रकारांना कधीच विरोध केला नाही. मी तर आमच्या भवन्सच्या शाळेत मुस्लीम, ख्रिश्चन व बौद्ध पालकांना देखील चक्क ‘ओम् सहनाववतु, सह नौ भुनक्तु, सहवीर्यं करवावहै’ हा संस्कृत मंत्र शाळेच्या प्रांगणात हिंदू पालकांसह मोठ्याने म्हणताना पाहिले आहे, ऐकलं आहे. ते कधीही या प्रार्थनेला विरोध करताना दिसले नाहीत. देशपातळीवर व राज्यपातळीवर होणाऱ्या मोठमोठ्या सभा संमेलनांची व परिषदांची उद्घाटने संस्कृत सरस्वती वंदनेने किंवा गणरायाच्या स्तवनानी सर्रास पार पाडताना दिसतात. शाळांच्या गॅदरिंग्स्ची सुरुवातही ‘वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं’ बुद्धिप्रदांं शारदाम्’ अशी संस्कृतातील शारदा स्तवनाने केली जाते. टी.व्ही. वरील शास्त्रीय नृत्याचे सर्वच कार्यक्रम विविध हिंदू देवी-देवतांच्या पौराणिक आख्यानांवरच बेतलेले असतात. इतर धर्मांमधील महापुरुष म्हणजे येशू, मुहम्मद, बुद्ध किंवा झरतृष्ट हे या शास्त्रीय नृत्यांचे विषय होताना माझ्या एकदाही पाहण्यात आले नाहीत. उलट बडे गुलाम अली खाँ साहेबांनी ‘ओम तत् सत्’ हे भजन नागपुरात गाऊन रसिकांची वाहवा मिळविली होती, तर मोहम्मद रफी साहेबांनी ‘मन तडपत हरी दरसन को आज’ हे भजन आपल्या दर्दभऱ्या आवाजात अजरामर केलं आहे.येथील धर्मनिरपेक्षतावाद्यांचा आक्षेप संस्कृत भाषेला नसून संस्कृतच्या ‘सनातनी वृत्ती’ला आहे. धर्मनिरपेक्षतेचे समर्थक त्या कट्टरपंथी विचारसरणीचा निषेध करतात, जी भगवद्गीता या केवळ हिंदूंना वंदनीय असणाऱ्या धर्मग्रंथाला भारताचा राष्ट्रीयग्रंथ म्हणून घोषित करण्याची ‘अनधिकार-चेष्टा’ करते. सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांनी १९४६ मध्ये लिहिलेल्या व मराठीत भाषांतरित झालेल्या ‘आम्ही’ या पुस्तकात एक गंभीर समज येथील अल्पसंख्यांकांना दिली होती. ती अशी की, या हिंदू राष्ट्रात राहणाऱ्या अन्य सर्व धर्मीय बांधवांनी हिंदूंची विचारसरणी आणि संस्कृती यांचे अनुसरण व स्वीकार केला पाहिजे. अन्यथा त्यांना या राष्ट्रात राहण्याचा हक्क नाही. रा.स्व. संघाच्या प्रमुखांनी ७० वर्षांपूर्वी दिलेली ही चेतावणी सध्याचे सरकार प्रत्यक्षात आणू पाहात आहे, आणि भारताच्या धर्मनिरपेक्षतेवर गदा आणू पाहात आहे. अंतर्गत कारस्थाने करीत राहण्याचा संघपरिवाराचा उपद्व्याप सतत चालू असतो. त्याचाच एक दृश्य परिणाम म्हणजे मोदींचे आयर्लंडमधील उद्गार होते. ही सर्व वस्तुस्थिती सामान्य जनतेला कळावी व खरी धर्मनिरपेक्षता लक्षात यावी या हेतूने हे सर्व लिहिले.शेवटी एकच लक्षात घेतलं पाहिजे की ‘भारत’ हे आपल्या देशाचं नाव ‘भरत’ या पराक्रमी चक्रवर्ती सम्राटावरून पडलं आहे. शकुंतला आणि दुष्यंत राजा यांचा तो मुलगा होता. या शब्दाला कोणत्याही विशिष्ट धर्माचा संदर्भ नाही. पूर्वी ‘भारतवर्ष’ म्हणत असत. आज आपण भारत म्हणतो एवढाच काय तो फरक! परंतु हाच शब्द संविधानाने स्वीकारला आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने तो स्वीकारला पाहिजे, आपल्या देशाच्या पंतप्रधानानेसुद्धा!