शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना मित्र जपावे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:23 IST

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३१५ जागा जिंकल्या व त्याचवेळी त्यांच्या भारतीय जनता पक्षाला

२०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने ३१५ जागा जिंकल्या व त्याचवेळी त्यांच्या भारतीय जनता पक्षाला लोकसभेत काठावरचे का होईना (२८२ एवढे) बहुमत मिळविणे जमले. मध्यंतरी राजस्थान, बिहार व उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभेच्या पोटनिवडणुकांत भाजपला जबर पराभव पाहावा लागल्यामुळे त्या पक्षाचे स्वबळावर मिळविलेले बहुमत संपुष्टात आले. परिणामी त्याला रालोआमधील मित्रपक्षांच्या पाठिंब्याची पूर्वीहून अधिक गरज वाटू लागली. भाजपची ही अडचण मित्रपक्षांनी केवळ ओळखलीच नाही तर तिचा जमेल तेवढा वापर करून घेण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. अशा प्रयत्नात शिवसेना आरंभापासून आघाडीवर होती. आता आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडूंनी रालोआशी असलेले आपले संबंध तोडून घेतले आहे आणि तेवढ्यावर न थांबता मोदी सरकारवर अविश्वासाचा ठराव आणण्याची तयारीही त्यांनी जाहीर केली आहे. तेलंगणच्या के. चंद्रशेखर राव यांनीही रालोआपासून आता फारकत घेतली आहे. पंजाबातील अकाली दलही नव्या मागण्या घेऊन पंतप्रधानांसमोर उभे राहिले आहे. ही स्थिती झाकण्याचा व उसने बळ आणून शिरा ताणण्याचा उद्योग पंतप्रधान व त्यांचा पक्ष कितीही करीत असला तरी त्यामुळे आताचे वास्तव लपणारे नाही. भाजपला नवे मित्र मिळत नाहीत आणि त्याचे जुने मित्र त्याच्यापासून दूर जात आहेत. शिवाय भाजपवर असलेल्या संघाच्या नियंत्रणाचा व विशेषत: संघाच्या अल्पसंख्यकांविषयीच्या द्वेषाचा परिणाम मित्रपक्षांना जाणवू लागला आहे. त्यांना देशातील सर्वच घटकांच्या पाठिंब्याची गरज आहे. परिणामी धर्मग्रस्त पक्षांचेखेरीज भाजपला अन्य मित्रांचाही आता विश्वास वाटेनासा झालेला आहे. जे पक्ष भाजपच्या कुबड्याखेरीज उभेच राहू शकत नाहीत त्यात नितीशकुमार, रामविलास पासवान व अकाली यासारखे पक्ष त्याला चिकटून आहेत आणि त्यांच्या तशा असण्याची गरज भाजपलाही समजणारी आहे. त्यामुळे यापुढे रालोआला आणखी गळती लागू नये याची काळजी भाजपच्या नेत्यांना घ्यावी लागत आहे. त्यासाठी आपल्या जुन्या भूमिका गुंडाळून ठेवण्याची तयारी त्याने चालविली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी नुकतीच ‘आपला पक्ष ३७० वे कलम रद्द करण्याचा आग्रह यापुढे धरणार नाही’ असे म्हटले आहे. या कलमाला भाजपचा व त्याच्या जनसंघ या पूर्वावताराचाही विरोध राहिला आहे. संघ परिवार तर त्याविषयीचा कमालीचा आग्रह धरणारा आहे. मात्र हे कलम पुढे कराल तर आम्हाला आपल्या मैत्रीचाच फेरविचार करावा लागेल असे स्पष्ट शब्दात काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला ऐकविले आहे. या काळात कोणताही एक मित्र वा मित्रपक्ष गमावणे भाजपला न जमणारे आहे कारण त्याच्या सरकारविरुद्ध लोकसभेत अविश्वासाचा ठराव दाखल झाला आहे. देशातील बहुसंख्य पक्ष स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे किंवा सर्वधर्मसमभावाचा आग्रह असल्याचे सांगणारे आहेत. भाजप व अकाली दल वगळता देशातील बहुतेक सर्व पक्षांची भूमिका अशी आहे. या पक्षांना सरळ दूर लोटणे सत्ताधारी पक्षाला व आघाडीला अर्थातच परवडणारे नाही. त्यापेक्षा आपल्या भूमिकांना मुरड घालणे आणि मित्रपक्षांचे न आवडणारे आग्रहही पचवून घेणे त्याला आता भाग आहे. कर्नाटकात त्या पक्षाला त्या राज्यात सत्तारूढ असलेल्या काँग्रेसशी लढत द्यायची आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामैय्या हे स्वत: अतिशय लोकप्रिय नेते असून ते कमालीचे सावध राजकारणी आहेत. त्या राज्यात १७ टक्के एवढ्या संख्येने असलेल्या लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याचा व त्याला राखीव जागा मान्य करण्याचा त्यांचा निर्णय भाजपसमोर एक मोठे आव्हान घेऊन लढत देत आहे. हा काळ मित्र गमावण्याचा नाही. उलट आपल्या भूमिकांचा संकोच करण्याचा व असलेले मित्र जमतील तसे सांभाळण्याचा आहे. राजनाथसिंगांची ३७० वे कलम सोडण्याची तयारी त्यातून आली आहे.