शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

‘तिसऱ्या’ सभागृहातला राडा; विधानभवनाची पायरी ही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 06:56 IST

विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की ही अत्यंत चिंतेची आणि सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करावी अशी घटना आहे.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की ही अत्यंत चिंतेची आणि सर्वच राजकीय पक्षांनी आत्मचिंतन करावी अशी घटना आहे. हल्लीचे राजकारण राडेबाजीचे झाले असून आमदारांचे तारतम्य सुटत असल्याचे हे लक्षण आहे. अशी धक्काबुक्की, हाणामाऱ्या करण्यासाठी हा काही कुस्तीचा आखाडा नाही. लोकहिताचे कायदे करण्यासाठी आणि लोकाभिमुख निर्णय करण्यासाठीच लोकशाहीचे हे पवित्र मंदिर घटनाकारांनी उभारले आहे. विधानभवनाची पायरी ही एकमेकांच्या अंगावर धावून जाण्यासाठी नाही. आपली संसदीय जबाबदारी विसरत चाललेले आमदार आणि ते तसे भरकटत असताना त्यांना रोखण्यात अपयश येत असलेले नेते या दोघांनाही अशा प्रसंगांसाठी जबाबदार धरले पाहिजे.

विधानसभा वा विधान परिषदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी गेल्या काही वर्षांत एक तिसरे सभागृह भरलेले असते आणि ते म्हणजे विधानभवनाच्या पायऱ्यांवरील सभागृह. रोज कोणत्या ना कोणत्या विषयावर नारेबाजी करायची, एकमेकांना डिवचायचे असे  प्रकार चाललेले असतात. मागे आदित्य ठाकरे तेथून जात असताना विचित्र आवाज काढले गेले. परवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या पायऱ्यांवरून जाताना त्यांना डिवचणाऱ्या घोषणा दिल्या गेल्या.

आदित्य यांच्या विरोधातील घोषणेचे राजकीय उट्टे नितेश राणेंवर काढले गेले, परवा हा अनुभव माजी मंत्री धनंजय मुंडे यांना आला. बाहेरच्या राजकारणाचे ‘हिशेब’ करण्यासाठी विधानभवनाचा वापर करण्याचे हे वाढते  प्रकार तातडीने थांबले पाहिजेत. सभागृहात कोंडी करण्याचे बुद्धिकौशल्य नाही म्हणून पायऱ्यांवर हुल्लडबाजी करायची हा नवीन पायंडा तातडीने मोडायला हवा. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून राजकारण अक्षरश: हातघाईवर आले आहे. राजकारणाच्या माध्यमातून चांगले बदल करण्याऐवजी एकमेकांचे बदले घेण्यातच धन्यता मानणारे उथळ नेते राज्याच्या राजकारणाचा संयमी चेहरा विद्रुप करायला निघाले आहेत.

विरोधकांवर कुरघोडी करीत असल्याचा आनंद त्यातून सध्याच्या नेत्यांना मिळत असेल; पण एकमेकांना पाहून घेण्याच्या नादात महाराष्ट्राच्या नेतृत्वाने आजवर जपलेले शहाणपण आपण घालवत आहोत हे लक्षात आले तर बरे होईल. सध्या हमरीतुमरी, एकमेकांचा हिशेब करण्याच्या राडा संस्कृतीने महाराष्ट्रात डोके वर काढले आहे. ‘सगळ्यांचा कच्चा-चिठ्ठा माझ्याकडे आहे’ ही नाक्यावरची धमकी सभागृहात द्यावी याचे समर्थन कसे करणार? अर्थात, गेली अडीच वर्षे सत्तेत असलेल्यांनी पण विरोधकांना धमक्या देताना एखादाच अवयव सोडला असेल. केवळ राजकारण्यांचाच नाही तर आजच्या अवमूल्यनात माध्यमांचाही दोष आहेच. आम्ही सभागृहात तासभर बोललो तरी त्याची चार ओळींची बातमी येत नाही; पण गोंधळ घातला की लगेच बातमी येते अशी काही आमदारांची माध्यमांबद्दलची नाराजी आहे. माध्यमांनी या नाराजीवर आत्मचिंतन करत गोंधळी आमदारांऐवजी अभ्यासू आमदारांना प्रसिद्धी देण्याचे भान राखले तर चमकोगिरी करणाऱ्या आमदारांना चाप बसू शकेल. विधिमंडळाची अत्यंत आदर्श परंपरा निर्माण करण्यात यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब भारदे, प्र. के. अत्रे, एस. एम. जोशी, रामभाऊ म्हाळगी, बाळासाहेब चौधरी, उत्तमराव पाटील, विठ्ठलराव हांडे अशा अनेक दिग्गजांचे अमूल्य योगदान राहिले आहे; मात्र आता त्याच विधानभवनाच्या पायऱ्यांवरील धक्काबुक्की आणि विधिमंडळातील चर्चेचा एकूणच घसरलेला दर्जा बघून ते स्वर्गात अश्रूच ढाळत असतील.

कष्टकरी, शेतकऱ्यांच्या  प्रश्नांवर विधानसभागृह अनेकदा दणाणून सोडत सरकारला जाब विचारणारे आणि अनेक वर्षे आमदार राहिलेले केशवराव धोंडगे यांच्या वयाला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा गौरव करण्याचा ठराव विधानसभेत मांडण्याच्या काही तास आधी  आमदारांनी पायऱ्यांवर केलेले गैरवर्तन अधिकच व्यथित करणारे आहे. महाराष्ट्राच्या विधिमंडळाने देशाला अनेक योजना दिल्या, कायदे दिले. अनेक विषयांवरील अत्यंत दर्जेदार चर्चेचे हे विधिमंडळ साक्षीदार राहिले आहे. आपली ही आदर्श ओळख आपण आपल्याच बेताल वागण्याने घालवणार असू तर आपल्यासारखे नतद्रष्ट आणखी कोण असणार? आमदारांसाठी सभागृह व विधानभवन परिसरात आचारसंहिता असावी, तिचे कठोर पालन व्हावे अशी व्यवस्था तातडीने तयार करायला हवी. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षात निकोप संसदीय लोकशाहीचे अवमूल्यन आमदार, राज्यकर्ते आणि विरोधकांकडून होऊ नये एवढी तरी बूज राखली जायला हवी.

टॅग्स :Politicsराजकारण