शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

दयनीय व हास्यास्पद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2019 05:46 IST

पंतप्रधान मोदी प्रसिद्धीच्या मागे आहेत. आपले नाव जगभर व्हावे, ही त्यांची इच्छा. गीता मेहता यांच्या पतीच्या प्रकाशन संस्थेने आपले चरित्र प्रकाशित करण्याची त्यांची मनीषा पद्म पुरस्कारामुळे उघड झाली.

गीता मेहता या लेखिकेचे नाव सध्या फारसे चर्चेत नाही. १९४३ मध्ये दिल्लीत जन्माला आलेल्या गीता मेहता या उडिया भाषेतील लेखिका. ओडिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या कन्या आणि आताचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या त्या भगिनी आहेत. यंदाच्या गणराज्य दिनी भारतसरकारने इतरांसोबत त्यांनाही पद्मश्री हा सन्मान दिला, तेव्हा त्यांचे नाव काहीसे चर्चेत आले. पण त्या कोण आणि काय वगैरे चौकशीत कुणी पडले नाही. मात्र पुढे काही दिवसांनी त्यांनी तो किताब सरकारला परत केला. तसे करताना ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य वा लेखन स्वातंत्र्याची गळचेपी’ अशी कोणतीही कारणे त्यांनी सांगितली नाहीत. ‘हा पुरस्कार मला का दिला गेला हेच मला अजून कळत नाही’ असे सांगून त्यांनी तो परत केला आहे.त्याचमुळे त्याची खरी कहाणी ही साऱ्यांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. आता साºयांच्या लक्षात आले ते कुतूहल खरे आहे आणि मनोरंजकही आहे. गीता मेहतांची अनेक पुस्तके आजवर प्रकाशित झाली आहेत. त्यांचे २१ भाषांत भाषांतरही झाले आहे. १९७० ते ७१ या काळात त्यांनी युरोप आणि अमेरिकेसाठी टेलिव्हिजन नेटवर्कवर कामही केले आहे. त्यांचे बहुतेक लिखाण भारतीय पार्श्वभूमीवरचे आणि या क्षेत्राची स्थिती सांगणारे आहे. त्यांचे पती सोनी मेहता हे आॅल्फ्रेड ए नुफ या जगप्रसिद्ध प्रकाशन संस्थेचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या संस्थेने फ्रँकलीन डी रुझवेल्ट, महात्मा गांधी, केनेडी अशा जगविख्यात नेत्यांवर चरित्रात्मक पुस्तके प्रकाशित केली आहेत. ती जगभर खपली आणि वाचलीही जात आहेत. एवढी मोठी पार्श्वभूमी असणाºया गीता मेहता यांना आपल्याला पद्मश्री का दिली गेली हे कळले नसेल, असे समजणे हा खुळेपणा आहे.पंतप्रधान मोदी हे प्रसिद्धीच्या मागे लागलेले पुढारी आहेत आणि त्यांना त्यांचे नाव भारताच्या सीमेबाहेर व जगात जास्तीचे चर्चिले जावे अशी इच्छा आहे. आपले चरित्र गीता मेहता यांच्या पतीच्या प्रकाशन संस्थेने प्रकाशित करून जगात आणावे ही त्यांची मनोमन इच्छा आहे. त्याचसाठी त्यांनी गीता मेहता यांना या पुरस्कार वितरणाआधी दिल्लीला पाचारण केले. त्यांच्याशी त्यांनी दीड तास चर्चा केली. या चर्चेत कोणताही महत्त्वाचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक किंवा वाङ्मयीन विषय नव्हता. आपल्याला का बोलविले आणि आपल्यासाठी देशाचे पंतप्रधान एवढा वेळ का काढतात याचे आकलन गीता मेहता यांनाही तेव्हा झाले नाही. त्या परत गेल्यानंतर त्यांना पद्मश्री जाहीर झाली. तेव्हा त्यांच्या डोक्यात स्वच्छ प्रकाश पडला आणि त्या पद्मश्रीचे व त्यासाठी पंतप्रधानांनी आपल्यासोबत घालविलेल्या दीड तासाचे रहस्य उलगडले. ही पद्मश्री पंतप्रधानांना त्यांच्या प्रसिद्धीसाठी व त्यांच्यावर आपल्या पतीच्या प्रकाशन संस्थेने एक चांगले पुस्तक प्रकाशित करावे या हेतूने दिली गेली हे लक्षात येताच त्या स्वाभिमानी स्त्रीने तो सन्मान तत्काळ परत करण्याचा निर्णय आपल्या पतीच्या संमतीने घेतला.पद्मसारख्या पुरस्कारांतील व्यक्तींची निवड हा याआधीही चर्चेचा विषय बनला होता. अनेकदा तर ज्या क्षेत्रातील कार्याबद्दल पुरस्कार दिले गेले आहेत, त्या क्षेत्रात ज्यांनी आधी भरीव कार्य केले आहे, त्यापेक्षा नवोदितांनाही पुरस्कार दिल्याचे मुद्दे गाजले होते. सध्याच्या सरकारच्या सुरुवातीच्या काळात एका अभिनेत्रीने पुरस्कारासाठी लिफ्ट बंद असताना धापा टाकत जिने चढून कसा प्रयत्न केला होता, याचा रंगतदार किस्सा मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे प्रकाशात आला होता. या सा-या पार्श्वभूमीवर मेहता यांच्या पद्मश्रीची गोष्ट सामाजिक माध्यमांवर सर्वतोमुखी झाली आहे.नेते त्यांच्या प्रसिद्धीसाठी कोणत्या पातळीवर जातात आणि त्यासाठी देशाचे आदरणीय सन्मान वापरायलादेखील ते कसे मागेपुढे पाहात नाहीत हे या घटनेने साºया देशाला व जगालाही कळले. नेत्यांचे नाव व मोठेपण त्यांच्या कामाने अधोरेखित होते. त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांनी वा पुस्तकांनी ते मोठे होत नाही. मात्र प्रसिद्धीसाठी पुढारी अशा मार्गांचा वापर करीत असतील तर ते नाव मोठे होण्याऐवजी दयनीय व हास्यास्पद होते. मोदींनीही त्यांचा हेतू गीता मेहता यांना सांगितला नाही. मात्र त्या जाणकार स्त्रीला तो कळल्यावाचूनही राहिला नाही. त्याची परिणती देशाचा सर्वोच्च पुरस्कार परत करण्यात झाली, ही बाब जेवढी दयनीय, तेवढीच नेत्यांच्या दृष्टीने हास्यास्पद ठरली.

टॅग्स :IndiaभारतGovernmentसरकार