शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

चित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:41 IST

कोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते.

- डॉ. रामचंद्र देखणेकोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते. कोणत्याही कामात एकरूप झालेल्या सामान्य माणसालाही ही कर्माशी जोडलेली चित्ताची एकाग्रता अनुभवायला येते.भक्ती म्हणजे परमात्म्याशी होणारी एकाग्रता होय. तुकाराममहाराज देवाजवळ मागणी करतात,‘‘तुज पाहता सामोरीदृष्टी न फिरे माघारीमाझे चित्त तुझे पायामिठी पडली पंढरीराया’’देवा माझे चित्त आणि तुझे पाय याची एकरूपता होऊ दे या एकरूपतेने माझे चित्त आणि दृष्टी पुन्हा माघारी फिरणार नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजेच ध्यान होय. चित्ताच्या एकंदर पाच भूमिका किंवा पायºया आहेत. १) मूढ, २) क्षिप्त, ३) विक्षिप्त, ४) एकाग्र ५) निरुद्ध अशा त्या पाच पायºया आहेत.मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त अवस्थेत चित्त हे बºयाच वेळा अस्थिर तर कधीतरी स्थिर होते पण एकाग्र आणि निरुद्ध अवस्थेत मात्र ते स्थिर आणि आत्यंतिक एकरूपाला पावलेले असते. चित्त हे सत्व आणि तम या दोन गुणात स्थिर होते परंतु तमोगुणात ते परतंत्र होऊन स्थिर होते.तर सत्वगुणात ज्ञानामुळे स्थिर होते. तमोगुणात चित्त स्थिरावणे ही ‘मूढ’ अवस्था आहे. क्षिप्त म्हणजे खेपा घालणे, येरझारा करणे, विषय भोगात ते चित्त ‘क्षिप्त’ असते. काही वेळा ते स्थिर तर काही वेळा ते चंचल असते. ही चित्ताची अवस्था ‘विक्षिप्त’ होय. पण जेव्हा सत्वगुणाची वाढ होऊन ते ध्यानमग्न होते तेव्हा ते ‘एकाग्र’ या अवस्थेला तर एकाग्रतेतून जेव्हा ते कुठेही बाजूला जात नाही तेव्हा ‘निरुद्ध’ या अवस्थेला गेलेले असते. मग योग्याची अवस्था प्राप्त होते. भगवान पतंजलीने योगाची व्याख्या करताना म्हटले आहे की,‘‘योगश्चित्तवृत्तिनिरोध :’’ म्हणजे जीवन व्यवहारातील साध्या साध्या आणि सामान्य क्रियेपासून तो थेट योगावस्थेपर्यंत चित्ताचा प्रवास होत असतो. आणि एकेका टप्प्यातून चित्ताची प्रग्लभता वाढत जाऊन माणूस भोगी अवस्था सांडून भोगी ते योगी या अवस्थेपर्यंत जातो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र