शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:41 IST

कोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते.

- डॉ. रामचंद्र देखणेकोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते. कोणत्याही कामात एकरूप झालेल्या सामान्य माणसालाही ही कर्माशी जोडलेली चित्ताची एकाग्रता अनुभवायला येते.भक्ती म्हणजे परमात्म्याशी होणारी एकाग्रता होय. तुकाराममहाराज देवाजवळ मागणी करतात,‘‘तुज पाहता सामोरीदृष्टी न फिरे माघारीमाझे चित्त तुझे पायामिठी पडली पंढरीराया’’देवा माझे चित्त आणि तुझे पाय याची एकरूपता होऊ दे या एकरूपतेने माझे चित्त आणि दृष्टी पुन्हा माघारी फिरणार नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजेच ध्यान होय. चित्ताच्या एकंदर पाच भूमिका किंवा पायºया आहेत. १) मूढ, २) क्षिप्त, ३) विक्षिप्त, ४) एकाग्र ५) निरुद्ध अशा त्या पाच पायºया आहेत.मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त अवस्थेत चित्त हे बºयाच वेळा अस्थिर तर कधीतरी स्थिर होते पण एकाग्र आणि निरुद्ध अवस्थेत मात्र ते स्थिर आणि आत्यंतिक एकरूपाला पावलेले असते. चित्त हे सत्व आणि तम या दोन गुणात स्थिर होते परंतु तमोगुणात ते परतंत्र होऊन स्थिर होते.तर सत्वगुणात ज्ञानामुळे स्थिर होते. तमोगुणात चित्त स्थिरावणे ही ‘मूढ’ अवस्था आहे. क्षिप्त म्हणजे खेपा घालणे, येरझारा करणे, विषय भोगात ते चित्त ‘क्षिप्त’ असते. काही वेळा ते स्थिर तर काही वेळा ते चंचल असते. ही चित्ताची अवस्था ‘विक्षिप्त’ होय. पण जेव्हा सत्वगुणाची वाढ होऊन ते ध्यानमग्न होते तेव्हा ते ‘एकाग्र’ या अवस्थेला तर एकाग्रतेतून जेव्हा ते कुठेही बाजूला जात नाही तेव्हा ‘निरुद्ध’ या अवस्थेला गेलेले असते. मग योग्याची अवस्था प्राप्त होते. भगवान पतंजलीने योगाची व्याख्या करताना म्हटले आहे की,‘‘योगश्चित्तवृत्तिनिरोध :’’ म्हणजे जीवन व्यवहारातील साध्या साध्या आणि सामान्य क्रियेपासून तो थेट योगावस्थेपर्यंत चित्ताचा प्रवास होत असतो. आणि एकेका टप्प्यातून चित्ताची प्रग्लभता वाढत जाऊन माणूस भोगी अवस्था सांडून भोगी ते योगी या अवस्थेपर्यंत जातो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र