शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

चित्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:41 IST

कोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते.

- डॉ. रामचंद्र देखणेकोणत्याही कर्मात, अभ्यासात, साधनेत चित्त एकाग्र होणे हे महत्त्वाचे असते. कर्मात चित्त ओतले की, प्रत्येक कर्म हे विकर्म होते. चित्ताची एकाग्रता ही जशी योग्याला आवश्यक असते तशीच ती प्रत्येक कर्मयोग्यालाही आवश्यक असते. कोणत्याही कामात एकरूप झालेल्या सामान्य माणसालाही ही कर्माशी जोडलेली चित्ताची एकाग्रता अनुभवायला येते.भक्ती म्हणजे परमात्म्याशी होणारी एकाग्रता होय. तुकाराममहाराज देवाजवळ मागणी करतात,‘‘तुज पाहता सामोरीदृष्टी न फिरे माघारीमाझे चित्त तुझे पायामिठी पडली पंढरीराया’’देवा माझे चित्त आणि तुझे पाय याची एकरूपता होऊ दे या एकरूपतेने माझे चित्त आणि दृष्टी पुन्हा माघारी फिरणार नाही. चित्ताची एकाग्रता म्हणजेच ध्यान होय. चित्ताच्या एकंदर पाच भूमिका किंवा पायºया आहेत. १) मूढ, २) क्षिप्त, ३) विक्षिप्त, ४) एकाग्र ५) निरुद्ध अशा त्या पाच पायºया आहेत.मूढ, क्षिप्त आणि विक्षिप्त अवस्थेत चित्त हे बºयाच वेळा अस्थिर तर कधीतरी स्थिर होते पण एकाग्र आणि निरुद्ध अवस्थेत मात्र ते स्थिर आणि आत्यंतिक एकरूपाला पावलेले असते. चित्त हे सत्व आणि तम या दोन गुणात स्थिर होते परंतु तमोगुणात ते परतंत्र होऊन स्थिर होते.तर सत्वगुणात ज्ञानामुळे स्थिर होते. तमोगुणात चित्त स्थिरावणे ही ‘मूढ’ अवस्था आहे. क्षिप्त म्हणजे खेपा घालणे, येरझारा करणे, विषय भोगात ते चित्त ‘क्षिप्त’ असते. काही वेळा ते स्थिर तर काही वेळा ते चंचल असते. ही चित्ताची अवस्था ‘विक्षिप्त’ होय. पण जेव्हा सत्वगुणाची वाढ होऊन ते ध्यानमग्न होते तेव्हा ते ‘एकाग्र’ या अवस्थेला तर एकाग्रतेतून जेव्हा ते कुठेही बाजूला जात नाही तेव्हा ‘निरुद्ध’ या अवस्थेला गेलेले असते. मग योग्याची अवस्था प्राप्त होते. भगवान पतंजलीने योगाची व्याख्या करताना म्हटले आहे की,‘‘योगश्चित्तवृत्तिनिरोध :’’ म्हणजे जीवन व्यवहारातील साध्या साध्या आणि सामान्य क्रियेपासून तो थेट योगावस्थेपर्यंत चित्ताचा प्रवास होत असतो. आणि एकेका टप्प्यातून चित्ताची प्रग्लभता वाढत जाऊन माणूस भोगी अवस्था सांडून भोगी ते योगी या अवस्थेपर्यंत जातो.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र