शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

मनोमन

By admin | Updated: July 4, 2016 05:37 IST

मन काय आहे? म्हटलं तर सर्व काही नाही तर काहीच नाही म्हणून ते आकार, रंगहीन असतं म्हणतात.

मनाच्या डोहात । टाकला मी खडाएकही शिंतोडा । उडेचिनामनावर अशी । कोरली पापणीतरी कसे पाणी । वाहेचिनामनावर कशी । दाटू लागे सायतरी कशी माय । दिसेचिनाआता कसे आले । आटलासे डोहतरंगांचे मोह । खुळ्यालागीमन काय आहे? म्हटलं तर सर्व काही नाही तर काहीच नाही म्हणून ते आकार, रंगहीन असतं म्हणतात. ते उचलून दाखविता येत नाही. ते हवेसारखं न दिसता जाणवतही नाही. पण तरी आपण जखमी झालो की मनही जखमी होतं. आपल्याला राग येतो, कंटाळा येतो आणि हे सारं आपण मनापासून होतं, असं म्हणतो. पण मनापासून म्हणजे कुठून? त्याला आदि, मध्य, अंत आहे? सगळेच हवेत हवेमधून बोलत राहाणार. मनाची आकृती काढताना त्यात इद, इगो, सुपरइगो शास्त्रीय पद्धतीने दाखविता येतो. तरीही प्रश्न उरतोच मन म्हणजे काय?मन अथांग, अनावर डोह वरवर प्रगाढ शांत असलेला, परंतु आत प्रचंड खळबळ असलेला. डोह म्हटलं की खोली आली. त्या खोलीत काय काय साठवलंय कळत नाही, पण एक खरं ह्या डोहात उतरावसं वाटतंच. नव्हे नव्हे आपण उतरतोच. डुबकी मारतो. बुडून जातो. त्यात सूर मारावासा वाटतो. कधी कुणाला त्यात सूर गवसतो म्हणतात. मनात, मनापासून, मनावर, मन लागणे, मन उडणे ह्या सगळ्या मनाच्या प्रत्ययांना कृतीचे अर्थ असतीलही, परंतु कोरड्या ठक्क कृतींचा शेवटही अंतिमत: मनाशी येऊन थांबतो. मग तुम्ही मनात खडा टाकला तरी शिंतोडा उडायचा नाही. मनावर पापणी कोरली तरी पाणी वाहणार नाही. मनावर साय दाटून आली तरी माय दिसणार नाही. कारण हा भरगच्च डोह कधी आटतो कळत नाही मग आपण वेडे खुळे ह्या कोरड्या डोहात तरंगांची वाट पाहातो. लाटा उसळण्याची वाट पाहातो आणि उसळण्याच्या आभासात हेलकावत राहतो. हा प्रवास वेडं लागण्यापासून खुळं होण्यापर्यंतचा असतो. म्हणून संत म्हणतात, ‘वेड लागले वेड लागले । ह्या जनासी वेड लागले.’ ह्या वेडाचं मनाकार होत जाण्याचा आरंभबिंदू मनाला आकार देणं हा आहे! मनाच्या खोड्या अगणित. ते असते आणि नसतेही. मानावे तर मन नाही तर जगण्याचे घण. आपण आपल्याला कितीही खरवडले, उगारले, ताडित केले, कुस्करले वा पुकारले तरी मन सतत हुलकावणी देतच राहते. ते लपंडाव खेळते. वाकुल्या दाखवून आधी जखमी करते आणि नंतर फुंकर घालते.मी मनाशी बोलतो म्हणजे कुणाशी? माझ्याशी? माझ्यातल्या तिच्याशी? समाजाशी? स्वत:शी? की परात्पर भावनातीत अस्तित्वाशी? तुम्ही त्याला निर्गुण निराकार म्हणा वा सगुण साकार मन त्यांच्या बेचकीतून बाहेर पडते आणि सतत संत, योगी, कवींपासून विचारवंतांना कोडे बनून राहते. म्हणूनच तर स्वत:ला खोदत बोलत राहायचे मनाबद्दल, मनाशी, मनावर!-किशोर पाठक