शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

म्हाडाचे स्वागतार्ह पाऊल़

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 04:49 IST

म्हाडाने अत्यल्प उत्पन्न गटासाठी मुंबईत ४०० घरे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे स्वागत करायला हवे़ कष्टकरी सर्वसामान्य, निम्म मध्यमवर्गीयांसाठी म्हाडाने केलेली ही चांगली सोय

म्हाडाने अत्यल्प उत्पन्न गटासाठी मुंबईत ४०० घरे उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे़ याचे स्वागत करायला हवे़ कष्टकरी सर्वसामान्य, निम्म मध्यमवर्गीयांसाठी म्हाडाने केलेली ही चांगली सोय आहे़ मुंबईसारख्या शहरात राहण्यासाठी जितका खर्च करावा लागतो तितका कुठल्याही शहरात नसेल़ त्यामुळेच अनधिकृत झोपडपट्टयांचा विळखा या महानगराला बसला आहे़ गेल्या वर्षी काढण्यात आलेल्या घरांच्या लॉटरीत अत्यल्प गटासाठी एकही घर नव्हते़ त्यामुळे म्हाडावर मोठी टीका झाली होती़ आता म्हाडाने थेट ४०० घरे उपलब्ध केली आहेत़ मराठी माणूस, विशेषत: सर्वसामान्य माणसे मुंबईतून हद्दपार होत आहेत़ कारण येथे निर्माण होणारी घरे या सर्वसामान्याला परवडणारी राहिलेली नाहीत़ खासगी बांधकाम व्यावसायिकांद्वारे निर्माण होणारी घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात़ त्यांना परवडणारी घरे निर्माण करण्यासाठी म्हाडाची निर्मिती झाली़ खासगी बांधकाम व्यावसायिकांशी स्पर्धा करताना, गेल्या काही वर्षांत म्हाडानेही घरांचे आकार वाढविले़ आकार वाढल्याने म्हाडाच्या घरांच्या किमतीही वाढल्या़ मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बांधकाम व्यावसायिकांच्या घरांच्या किमतीपेक्षा कमी असल्या, तरी त्या सर्वसामान्यांना परवडण्यासारख्या राहिलेल्या नाहीत़ गेल्या वर्षीच्या लॉटरीत लोअर परळ येथील म्हाडाचे घर सव्वाकोटी रुपयांचे होते़ त्यामुळे आता म्हाडाने सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे, या संस्थेला झोपेतून जाग आल्यासारखेच आहे़यातील ३०० घरे अँटॉप हिल परिसरात असणार आहेत़ मुंबईतील कामगार वर्ग लालबाग, परळप्रमाणे वडाळा व अँटॉप हिल परिसरातही काही प्रमाणात होता़ म्हाडाने गिरणी कामगारांसाठी घरे बांधली़ मात्र, काही गिरणी कामगारांनी ही घरे विकली, तर काही जण ही घरे भाड्याने देऊन मुंबईबाहेर राहण्यासाठी गेले़ पुन्हा अशी चूक होणार नाही, याची काळजी म्हाडाने घ्यायला हवी़ बीडीडी चाळींचा पुनर्विकास करताना नायगांव, वरळी, शिवडी व ना़ म़ जोशी मार्ग येथे म्हाडा सर्वसामान्यांसाठी घरे उपलब्ध करणार आहे़ ही घरे उपलब्ध करताना म्हाडाने अत्यल्प उत्पन्न गटाचाही विचार करायला हवा़ या परिसरात अत्यल्प उत्पन्न गटासाठी अधिक घरे उपलब्ध बांधायला हवीत़ ही घरे घेणारे तेथेच राहतील़, हे घर भाड्याने देणार नाहीत किंवा त्याची विक्री करणार नाहीत, याचीही तरतूद म्हाडाने करायला हवी़ मुंबई कष्टकऱ्यांची आहे़ हातावर पोट असणारे हे झोपडपट्टीत किंवा चाळीत राहतात़ पायाभूत सुविधा कशाही मिळोत, त्यात आयुष्य जगत असतात़ अशा सर्वसामान्यांचा विचार यापुढे म्हाडाने करायला हवा़