शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

महानगरांचे प्रदूषण जिवावर

By admin | Updated: December 21, 2014 00:26 IST

महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहराचा गळा घोटत आहे. स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो.

महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहराचा गळा घोटत आहे. स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो. मुंबई असे एकच शहर नाही, तर राज्यात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक महानगरे दिवसेंदिवस प्रदूषणात भर घालत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून महानगरांसह आसपासच्या गावांचा श्वास कोंडला जात आहे.भारतात कोलकाता हे सर्वात प्रदूषित महानगर असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. उष्ण कटिबंधीय आठ आशियाई देशांत ज्या महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली, त्यात कोलकाता शहरात ती सर्वाधिक होती असे निष्पन्न झाले. लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, भारत व जपान या आठ देशांत कार्बनी प्रदूषकांची पातळी मोजण्यात आली होती.व्वाशे वर्षांपूर्वीच्या राजपत्रात मुंबईचे तापमान २२ ते २५ अंश असल्याचे नमूद केले आहे. आज मात्र ते कधी कधी ४० अंशांपेक्षाही जास्त होते आहे व नेहमीच ३० ते ३५ अंशांच्या आसपास असते. त्यामुळे एकेकाळी थंड हवेचे ठिकाण असलेल्या मुंबईत रोज होणाऱ्या चार हजार मेगावॅट वीज वापरापैकी १ हजार ४०० मेगावॅट वीज वापर एसी म्हणजे वातानुकूलन यंत्राद्वारे होतो. मुंबई असे एकच शहर नाही, तर महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक महानगरे दिवसेंदिवस प्रदूषणात भर घालत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून महानगरांसह आसपासच्या गावांचा श्वास कोंडला जात आहे. त्याचे जिवंत उदाहारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी डोंबिवली येथे पडलेला हिरवा पाऊस होय.गारपीट असो वा अवकाळी पाऊस, ही सगळी तापमान वाढीची फलितं आहेत. जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक तापमानवाढ यांचा एकमेकांशी दुरान्वये संबंध नाही, असे म्हटले जात असले, तरी स्थानिक तापमानवाढ हीदेखील हानिकारकच आहे. महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहरांचा गळा घोटत आहे. हे आता चटकन लक्षात आले नाही, तरी त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. एकट्या मुंबईचा विचार केला तरी शहरातून दररोज जमा होणाऱ्या सुमारे ७ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात महानगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. महानगरांमध्ये महिनाभरात आलेल्या निम्म्या तक्रारींचे देखील निवारण होत नाही. कालांतराने स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो. गोदावरी नदी अगोदरच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, विविध ठिकाणांहून गोदाकाठावर वाहने धुण्यासाठी आलेले, येणारे प्रदूषणात आणखी भर घालत आहेत. वाहनांना लागलेली घाण, वंगण पाण्यात मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे. दुसरीकडे चिपळूण येथील रासायनिक कारखान्यांमुळे तेथील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी रोजगार गमावला आहे. मात्र याची नोंद कुठेही नाही, हे दुर्दैवी आहे.(लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)1400 कोटी रुपये महापालिका प्रशासन घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करते. मुंबईकर महापालिका प्रशासनाकडे दरवर्षी कचऱ्याच्या संदर्भात सरासरी ६ हजार ५६२ जण तक्रारी करतात. मुंबई वगळता उर्वरित महानगरांमध्ये देखील थोड्याफार फरकाने हीच अवस्था असते, बदलतात ते केवळ आकडे.तापमानवाढीला शहरीकरण कारणीभूत आहे. अनेक शहरे प्रदूषणाने ग्रस्त आहेत. आता यावर विचित्र उपाय केले जाण्याचा संभव आहे.विशिष्ट रसायनांचा, संयुगांचा वातावरणात मारा करून कार्बन डायआॅक्साइडचे रूपांतर करण्याचा विचार केला जात आहे.गणिती आकडेमोडीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न दिसतो, पण हा विज्ञानाच्या बैठकीचा दोष आहे. रासायनिक प्रक्रिया व गणिती आकडेमोड यात फरक आहे. रासायनिक प्रक्रियेत दोन अधिक दोनचे उत्तर काहीही येऊ शकते.मुळात हवा किंवा वातावरण हे फक्त कार्बन डायआॅक्साइडचे बनलेले नाही. त्यात मिथेन, क्लोरोफ्लुरो कार्बन, नायट्रोजन आॅक्साइड, सल्फर डायआॅक्साइड तसेच इतर अनेक वायू व संयुगे यांचा समावेश होतो.उष्णता, थंडी, आर्द्रता, सूर्यप्रकाश अशा अनेकविध घटकांचा रासायनिक प्रक्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा प्रकार घडू शकतो.संजय शिंगे