शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

महानगरांचे प्रदूषण जिवावर

By admin | Updated: December 21, 2014 00:26 IST

महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहराचा गळा घोटत आहे. स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो.

महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहराचा गळा घोटत आहे. स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो. मुंबई असे एकच शहर नाही, तर राज्यात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक महानगरे दिवसेंदिवस प्रदूषणात भर घालत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून महानगरांसह आसपासच्या गावांचा श्वास कोंडला जात आहे.भारतात कोलकाता हे सर्वात प्रदूषित महानगर असल्याचे एका अभ्यास अहवालात म्हटले आहे. उष्ण कटिबंधीय आठ आशियाई देशांत ज्या महानगरांमध्ये प्रदूषणाची पातळी मोजण्यात आली, त्यात कोलकाता शहरात ती सर्वाधिक होती असे निष्पन्न झाले. लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, थायलंड, फिलिपिन्स, इंडोनेशिया, मलेशिया, भारत व जपान या आठ देशांत कार्बनी प्रदूषकांची पातळी मोजण्यात आली होती.व्वाशे वर्षांपूर्वीच्या राजपत्रात मुंबईचे तापमान २२ ते २५ अंश असल्याचे नमूद केले आहे. आज मात्र ते कधी कधी ४० अंशांपेक्षाही जास्त होते आहे व नेहमीच ३० ते ३५ अंशांच्या आसपास असते. त्यामुळे एकेकाळी थंड हवेचे ठिकाण असलेल्या मुंबईत रोज होणाऱ्या चार हजार मेगावॅट वीज वापरापैकी १ हजार ४०० मेगावॅट वीज वापर एसी म्हणजे वातानुकूलन यंत्राद्वारे होतो. मुंबई असे एकच शहर नाही, तर महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक महानगरे दिवसेंदिवस प्रदूषणात भर घालत आहेत आणि त्याचा विपरीत परिणाम म्हणून महानगरांसह आसपासच्या गावांचा श्वास कोंडला जात आहे. त्याचे जिवंत उदाहारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी डोंबिवली येथे पडलेला हिरवा पाऊस होय.गारपीट असो वा अवकाळी पाऊस, ही सगळी तापमान वाढीची फलितं आहेत. जागतिक तापमानवाढ आणि स्थानिक तापमानवाढ यांचा एकमेकांशी दुरान्वये संबंध नाही, असे म्हटले जात असले, तरी स्थानिक तापमानवाढ हीदेखील हानिकारकच आहे. महानगरांंमधून होणारे प्रदूषण त्या त्या शहरांचा गळा घोटत आहे. हे आता चटकन लक्षात आले नाही, तरी त्याचे दूरगामी परिणाम भोगावे लागतील. एकट्या मुंबईचा विचार केला तरी शहरातून दररोज जमा होणाऱ्या सुमारे ७ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यात महानगरपालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. महानगरांमध्ये महिनाभरात आलेल्या निम्म्या तक्रारींचे देखील निवारण होत नाही. कालांतराने स्थानिक तापमानवाढीसह झालेल्या प्रदूषणाचा फटका जैविक विविधतेला बसतो. गोदावरी नदी अगोदरच प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, विविध ठिकाणांहून गोदाकाठावर वाहने धुण्यासाठी आलेले, येणारे प्रदूषणात आणखी भर घालत आहेत. वाहनांना लागलेली घाण, वंगण पाण्यात मिसळत असल्याने पाणी दूषित होत आहे. दुसरीकडे चिपळूण येथील रासायनिक कारखान्यांमुळे तेथील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. परिणामी अनेकांनी रोजगार गमावला आहे. मात्र याची नोंद कुठेही नाही, हे दुर्दैवी आहे.(लेखक पर्यावरण तज्ज्ञ आहेत.)1400 कोटी रुपये महापालिका प्रशासन घनकचरा व्यवस्थापनावर खर्च करते. मुंबईकर महापालिका प्रशासनाकडे दरवर्षी कचऱ्याच्या संदर्भात सरासरी ६ हजार ५६२ जण तक्रारी करतात. मुंबई वगळता उर्वरित महानगरांमध्ये देखील थोड्याफार फरकाने हीच अवस्था असते, बदलतात ते केवळ आकडे.तापमानवाढीला शहरीकरण कारणीभूत आहे. अनेक शहरे प्रदूषणाने ग्रस्त आहेत. आता यावर विचित्र उपाय केले जाण्याचा संभव आहे.विशिष्ट रसायनांचा, संयुगांचा वातावरणात मारा करून कार्बन डायआॅक्साइडचे रूपांतर करण्याचा विचार केला जात आहे.गणिती आकडेमोडीने प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न दिसतो, पण हा विज्ञानाच्या बैठकीचा दोष आहे. रासायनिक प्रक्रिया व गणिती आकडेमोड यात फरक आहे. रासायनिक प्रक्रियेत दोन अधिक दोनचे उत्तर काहीही येऊ शकते.मुळात हवा किंवा वातावरण हे फक्त कार्बन डायआॅक्साइडचे बनलेले नाही. त्यात मिथेन, क्लोरोफ्लुरो कार्बन, नायट्रोजन आॅक्साइड, सल्फर डायआॅक्साइड तसेच इतर अनेक वायू व संयुगे यांचा समावेश होतो.उष्णता, थंडी, आर्द्रता, सूर्यप्रकाश अशा अनेकविध घटकांचा रासायनिक प्रक्रियांवर परिणाम होतो. त्यामुळे करायला गेलो एक आणि झाले भलतेच, असा प्रकार घडू शकतो.संजय शिंगे