शहरं
Join us  
Trending Stories
1
Municipal Corporation Election: विदर्भात महायुतीचे ठरले! चार महापालिकांत शिंदेसेना, तर दोन ठिकाणी अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत
2
खोपोलीत शिंदेसेनेच्या नगरसेविकेच्या पतीची हत्या! मुलाला शाळेत सोडून परत येत असताना केला हल्ला
3
तुमची इंडिगो फ्लाइट रद्द झाली होती का? आजपासून १०,००० रुपयांचे व्हाउचर मिळणार
4
Video : पंतप्रधान मोदींचा कार्यक्रम उरकला अन् शोभेसाठी लावलेल्या झाडाच्या कुंड्या लोकांनी पळवल्या!
5
२७ महापालिकांत कुणाचे किती नगरसेवक? गेल्यावेळी भाजपचे...; ४३९ जागा जिंकून काँग्रेस होती तिसऱ्या क्रमांकावर
6
Stock Markets Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; Sensex १५० अंकांनी घरसला, BEL टॉप गेनर
7
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
8
विकी-कतरिनाच्या लेकाचा पहिला ख्रिसमस, अभिनेत्रीने शेअर केला फोटो; चाहते म्हणाले...
9
Investment Tips For Working Women: नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
10
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
11
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
12
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
13
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
14
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
16
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
17
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
18
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
19
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
20
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलग्रस्त भागात शांततेचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:39 IST

देशासमोर नक्षलवादाच्या रूपाने अंतर्गत दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. केवळ बंदुकीच्या बळावर ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी विधायक आणि कृतिशील पावलेही उचलायला हवीत.

देशासमोर नक्षलवादाच्या रूपाने अंतर्गत दहशतवादाचे मोठे आव्हान आहे. केवळ बंदुकीच्या बळावर ही समस्या सुटणार नाही. त्यासाठी विधायक आणि कृतिशील पावलेही उचलायला हवीत. यासाठी समाजाची भूमिका महत्त्वाची आहे. याच भावनेतून आदर्श मित्र मंडळ या नावाला जागून पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अभिनव उपक्रम सुरू केला आहे. नक्षलग्रस्त भागात सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना रुजविण्यासाठी नवनवीन प्रयोग सुरू केले आहेत. राष्ट्रीय उत्सव साजरे करण्यापुरते मर्यादित न राहता, सामाजिक जाणीव जपण्याचे हे काम महत्त्वाचे आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देताना सामाजिक चळवळ म्हणून या उत्सवातून काम व्हावे, ही अपेक्षाही केली होती. ती अपेक्षा अनेक मंडळांकडून पूर्ण होत आहे. सामाजिक कार्याचा वसा घेऊन सुरुवातीला कैद्यांच्या मुलांना शैक्षणिक साह्य करण्याचे काम हाती घेण्यात आले. धनकवडी येथे सन २००० मध्ये स्थापन झालेल्या या आदर्श मित्र मंडळाने तीन वर्षांपासून नक्षलग्रस्त भागात सामाजिक सलोखा, राष्ट्रीय ऐक्याची भावना रुजविणा-या उपक्रमांच्या माध्यमातून नवनवे प्रयोग सुरू केले. या कार्यात पुण्यातील श्रीकृष्ण तरुण मंडळ, तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मेहुणपुरा मित्र मंडळ, सेवा मित्र मंडळ, रोटरी क्लब यांनी सक्रिय सहभाग घेतला. आदर्श मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष उदय जगताप यांच्या पुढाकाराने गडचिरोलीतील खेड्यापाड्यांत, नक्षलग्रस्त वस्त्यांमध्ये व आत्मसमर्पित नक्षलींच्या गावांत त्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या. पाच ते दहा किलोमीटरचे अंतर पायी जाणाºया विद्यार्थ्यांना गतवर्षी सायकलवाटप करण्यात आले. २५ शाळांना खेळांचे साहित्य वितरित करण्यात आले. तीन ठिकाणी ‘ई-लर्निंग’ शाळा सुरू केली. दरम्यान, या उपक्रमांची दखल घेऊन राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यात १,२०० शाळांमध्ये ‘ई-लर्निंग’ उपक्रमाची घोषणा केली. येथील ३३ पोलीस ठाण्यांमध्ये ग्रंथालये सुरू करण्यात आली. येथील शाळांमध्ये समुपदेशनाचा ‘अग्निपंख’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे नक्षलींचे आत्मसमर्पित होण्याचे प्रमाण वाढले. तीन वर्षांत ५६ नक्षलवाद्यांनी गांधी विचार व तत्त्वज्ञानावर आधारित परीक्षा दिली. त्यांचे मनपरिवर्तन झाल्याने त्यांनी आत्मसमर्पण केले. प्रत्येकाच्या मनात ‘जगा आणि जगू द्या’ ही भावना वृद्धिंगत व्हावी, यादृष्टीने ‘सामाजिक सद्भावना परीक्षा’ हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला. गौतम बुद्ध, महावीर, गुरू नानक, मोहम्मद पैगंबर, येशू ख्रिस्त, संत ज्ञानेश्वर या सर्वांनी अखिल मानवजातीला पे्रम, करुणा, शांततेचा संदेश दिला. आतापर्यंत १३ हजार ५०० जणांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. हाच ‘शांतता संदेश’ नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातून जगभरात पोहोचविण्याचा संकल्प आदर्श मित्र मंडळाने सोडला आहे. त्यादृष्टीने ३ मार्च रोजी सकाळी ९ वाजता गडचिरोली पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शांतता संदेश वाचनाचा जागतिक विक्रम नोंदविण्यात येणार आहे. आत्मसमर्पित नक्षलवादी, पोलीस, नक्षलींच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकाºयांचे कुटुंबीय, स्थानिक नागरिक तसेच डॉक्टर, वकील, चार्टर्ड अकाऊंटंट अशा विविध स्तरांतील सुमारे सात हजार व्यक्तींच्या उपस्थितीत शांतता संदेशाचे सामूहिक वाचन केले जाणार आहे. गडचिरोलीतील उडान फाऊंडेशनने कार्यक्रमांचे संयोजन केले आहे. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याची जागतिक नकाशावर नवी ओळख निर्माण करून देण्यात पुण्यातील सार्वजनिक मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरेल.- विजय बाविस्कर

टॅग्स :naxaliteनक्षलवादी