शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

मुक्ताईनगरातून गेला नव्या सत्तासमीकरणाचा संदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 21:35 IST

मिलिंद कुलकर्णी ! भाजप-शिवसेनेची युती तूर्त फिस्कटली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन घोडे अडले आणि गेली १५ दिवस सुरु असलेले दोषारोप पुन्हा ...

मिलिंद कुलकर्णी !भाजप-शिवसेनेची युती तूर्त फिस्कटली आहे. मुख्यमंत्रिपदावरुन घोडे अडले आणि गेली १५ दिवस सुरु असलेले दोषारोप पुन्हा केले गेले. देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री राहतील, हे स्पष्ट झाले. आणि त्यानंतर शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस, शिवसेना नेत्यांच्या बैठकांचा सपाटा सुरु झाला आहे. भाजपवगळून तिन्ही पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. थोडा मागोवा घेतला तर याची सुरुवात मुक्ताईनगरातून झाली, असे ठामपणे म्हणता येईल.एकनाथराव खडसे आणि भाजप नेतृत्व यांच्यात गेल्या साडेतीन वर्षांपासून संघर्ष सुरु आहे, हे उभा महाराष्टÑ पहात आहे. दोन्ही बाजूने टोकाची भूमिका घेतली गेली. खडसे हे माझा गुन्हा काय असा सवाल करीत पक्षश्रेष्ठींना दरवेळी कोंडीत पकडत राहिले आणि पक्षश्रेष्ठी त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत राहिले. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खडसे यांच्या तिकिटावरुन तीन दिवसीय नाटक रंगले. पुढे खडसेंनी केलेल्या खुलाशावरुन अनेक गोष्टी उघड झाल्या. दोन महिन्यांपूर्वीच पक्षश्रेष्ठींनी खडसे यांना उमेदवारी मिळणार नाही, याची कल्पना दिली होती. तरीही खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मुक्ताईनगरातील निवासस्थानी समर्थकांचा बोलावून दबावतंत्राचा प्रयत्न झाला. महामार्ग अडविणे, आत्मदहन असे गंभीर प्रकारदेखील घडले. परंतु, तरीही पक्षश्रेष्ठी नमले नाही. अखेर खडसे यांनाच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी जाहीर करावे लागले की, पक्ष माझ्याऐवजी कन्या रोहिणी यांना तिकीट देत आहे, असे जाहीर करावे लागले.भाजपची कठोर भूमिका या प्रकरणातून समोर आली. हीच भूमिका आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भातही दिसून आली. हरयाणात सत्तास्थापनेसाठी पुढाकार घेणारे राष्टÑीय अध्यक्ष अमित शहा महाराष्टÑासंदर्भात १५ दिवस चकार बोलत नाही, यामागे मोठा अर्थ दडला आहे. खडसे यांना तिकीट द्यायचे नाही, हे जसे दोन महिन्यांपूर्वी ठरले होते, तसेच सेनेला मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही, हे निवडणुकीपूर्वीच शहा आणि भाजपने ठरविलेले होते. त्यादृष्टीने १५ दिवस रणनिती आखली गेली. दिवाळीनिमित्त पत्रकारांशी अनौपचारीक चर्चा वगळता फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद, युती यासंदर्भात कोणतेही विधान केले नाही. शहा यांचे निष्ठावंत चंद्रकांत पाटील आणि ज्येष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावरच पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी देण्यात आली. फडणवीस यांचे संकटमोचक गिरीश महाजन आणि निष्ठावंत सहकारी आशीष शेलार हे या दोघांच्या सहायकांच्या भूमिकेत होते. ही ठरलेली रणनीती पक्षातील अंतर्गत बदलदेखील सूचवत आहे. या सगळ्या घडामोडीत मुक्ताईनगरचे खडसे मात्र बाजूला होते. युतीसंबंधी मध्यस्थी करण्याएवढा मी मोठा राहिलेलो नाही, हे शिर्डीत त्यांनी केलेले विधान हे भाजपमधील नव्या कार्यपध्दतीकडे अंगुलीनिर्देश करते.२०१४ मध्ये युती तोडण्याचा निर्णय तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांनी जाहीर केला होता. त्यामुळे ते शिवसेनेचे क्रमांक एकचे शत्रू झाले होते. जसे आता देवेंद्र फडणवीस आहे. (पूर्वी कधी तरी छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक होते वा आहेत). त्यांच्याविरुध्द शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी आणि संपूर्ण बळ देण्यात आले. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वत: दोन सभा त्या मतदारसंघात घेतल्या, यावरुन ही लढत सेनेने किती प्रतिष्ठेची केली होती, हे लक्षात येईल. त्यावेळीदेखील राष्टÑवादी काँग्रेसने उमेदवार दिला होता, पण ऐन निवडणुकीत राष्टÑवादीचे बळ सेनेकडे वळविण्यात आले. राष्टÑवादीचे उमेदवार माजी आमदार अरुण पांडुरंग पाटील यांच्या जप्त झालेल्या अनामतीने सेना-राष्टÑवादीची छुपी युती उघड झाली. आणि फक्त आठ हजाराने खडसे निवडून आले होते.जुलै २०१८ मध्ये झालेल्या मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीत उघडपणे शिवसेना व राष्टÑवादीची युती झाली. खडसेंना विरोध हा युती होण्याचे एकमेव कारण होते. या युतीचे केवळ ३ नगरसेवक निवडून आले. सत्ता भाजपची आली. काँग्रेस पक्ष मात्र या दोघांपासून दूर होता आणि त्यांनी लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी स्वत:चा उमेदवार दिला होता. दोन्ही पक्ष उघडपणे एकत्र येण्याची नांदी या निवडणुकीने दिली.यंदाही खडसे किंवा त्यांच्या कन्येला उमेदवारी मिळेल, हे गृहित धरुन चंद्रकांत पाटील हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. खडसे यांचे पक्षांतर्गत विरोधक गिरीश महाजन यांच्या संपर्कात पाटील राहिले. रावेरचे भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा उमेदवारी अर्ज भरायला गिरीश महाजन यांच्या गाडीतून चंद्रकांत पाटील आले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राष्टÑवादीने जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व विनोद तराळ यांना माघार घ्यायला लावून चंद्रकांत पाटील यांना समर्थन जाहीर केले. पुन्हा एकदा ही युती उघडपणे समोर आली. यंदा काँग्रेसने देखील पाटील यांचे समर्थन केले. अर्थात पाटील यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देण्याची काळजी घेतली होतीच. राष्टÑवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी तेथे घेतलेली सभा ही राष्टÑवादीने या जागेला किती गांभीर्याने घेतले आहे, हे स्पष्ट झाले.मुक्ताईनगरात तयार झालेले हे सत्तासमीकरण आता मुंबईत जुळण्याची शक्यता दिसून येत आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव