शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

पुरुषी दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:48 IST

मुलगी झाल्याने पती आपणास नांदवणारच नाही, म्हणून नवजात अर्भकाला जिवंतपणे मातीत पुरण्याचा निर्णय घेणा-या मातेचे काळीज कसले असेल? असा प्रश्न आपणास पडू शकतो.

मुलगी झाल्याने पती आपणास नांदवणारच नाही, म्हणून नवजात अर्भकाला जिवंतपणे मातीत पुरण्याचा निर्णय घेणा-या मातेचे काळीज कसले असेल? असा प्रश्न आपणास पडू शकतो. मात्र, मुलगी झाल्याने पतीची दहशत इतकी वाढणार आहे की, तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, नांदवणार नाही, संपूर्ण आयुष्य परितक्त्या म्हणून जीवन कंठावे लागेल या भीतीने गर्भगळीत झालेली माता स्वत:च्या पोटच्या पोराचा जीव घेण्याचा निर्णय घेते. कोल्हापूरजवळ गडमुडशिंगी येथे ही घटना घडली. लखन मोरे नावाच्या सेंट्रिंगचे काम करणाºया महापुरुषाला मुलगा हवा आहे. त्याचा हा दुसरा विवाह आहे. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्या आहेत. एक या दो बस, असा प्रचार करणाºया आपल्या समाजात मुलगाच हवा यासाठी चार मुलींना जन्म दिला गेला. त्या पहिल्या पत्नीचाही त्यासाठी छळ करण्यात आला. तिच्याकडून आपल्याला मुलीच होणार असा समज करून घेऊन दुसरे लग्न केले. तिच्याकडून मुलाचीच अपेक्षा होती. वास्तविक मुलगा किंवा मुलगी होण्यास पुरुषाचीच जनुके जबाबदार असतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. सारिका मोरे हिलासुद्धा मुलगीच होते, कारण लखन मोरेची जनुके त्या प्रकारची आहेत. मात्र, आजही स्त्रियांना मुलगी होण्याने आरोपीच्या पिंजºयात उभे केले जाते. या देशातील पुरुषांची ही दहशत मोडून काढण्यासाठी त्याचा जन्म कसा झाला, याची शिकवण द्यायला हवी. आपण एकविसाव्या शतकातही मुलगा किंवा मुलगी कशी होते, याचे साधे ज्ञान सर्वसामान्य लोकांना देऊ शकत नाही. मुळात मुलगा किंवा मुलगी हा भेद करायला नको आहे. त्यातून संपूर्ण समाजाचा नैसर्गिक समतोलच बिघडत चालला आहे. स्त्रियांना देवी, माता, भगिनी वगैरे वगैरे मानणाºया या पुरुषांची ही दहशत मोडून काढायला हवी. सारिका मोरे हिला माहीत होते की, त्याने आपल्याशी केलेला विवाह केवळ मुलगा जन्माला घालावा यासाठीच आहे. तोच उद्देश साध्य झाला नाही तर या विवाहाची गरज नाही म्हणून त्याने २६ वर्षांच्या सारिकाला सोडून दिले असते. वास्तविक पहिला विवाह आणि चार मुली असताना हा विवाहच व्हायला नको होता. हा दुसरा विवाह कायदेशीर आहे का याचीच खातरजमा करून एक पत्नी असताना त्याने दुसरे लग्न केले असेल किंवा तिच्यापासून रीतसर घटस्फोट न घेता हे लग्न केले असेल, तर त्यासाठीही लखन मोरे याला आरोपीच्या पिंजºयात उभे केले पाहिजे. इतके कौटुंबिक कायदे असतानाही हा नादान पुरुष केवळ मुलगा हवा यासाठी ही दहशत निर्माण करतो आहे.