शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पुरुषी दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 04:48 IST

मुलगी झाल्याने पती आपणास नांदवणारच नाही, म्हणून नवजात अर्भकाला जिवंतपणे मातीत पुरण्याचा निर्णय घेणा-या मातेचे काळीज कसले असेल? असा प्रश्न आपणास पडू शकतो.

मुलगी झाल्याने पती आपणास नांदवणारच नाही, म्हणून नवजात अर्भकाला जिवंतपणे मातीत पुरण्याचा निर्णय घेणा-या मातेचे काळीज कसले असेल? असा प्रश्न आपणास पडू शकतो. मात्र, मुलगी झाल्याने पतीची दहशत इतकी वाढणार आहे की, तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो, नांदवणार नाही, संपूर्ण आयुष्य परितक्त्या म्हणून जीवन कंठावे लागेल या भीतीने गर्भगळीत झालेली माता स्वत:च्या पोटच्या पोराचा जीव घेण्याचा निर्णय घेते. कोल्हापूरजवळ गडमुडशिंगी येथे ही घटना घडली. लखन मोरे नावाच्या सेंट्रिंगचे काम करणाºया महापुरुषाला मुलगा हवा आहे. त्याचा हा दुसरा विवाह आहे. पहिल्या पत्नीपासून चार मुली झाल्या आहेत. एक या दो बस, असा प्रचार करणाºया आपल्या समाजात मुलगाच हवा यासाठी चार मुलींना जन्म दिला गेला. त्या पहिल्या पत्नीचाही त्यासाठी छळ करण्यात आला. तिच्याकडून आपल्याला मुलीच होणार असा समज करून घेऊन दुसरे लग्न केले. तिच्याकडून मुलाचीच अपेक्षा होती. वास्तविक मुलगा किंवा मुलगी होण्यास पुरुषाचीच जनुके जबाबदार असतात, हे वैज्ञानिक सत्य आहे. सारिका मोरे हिलासुद्धा मुलगीच होते, कारण लखन मोरेची जनुके त्या प्रकारची आहेत. मात्र, आजही स्त्रियांना मुलगी होण्याने आरोपीच्या पिंजºयात उभे केले जाते. या देशातील पुरुषांची ही दहशत मोडून काढण्यासाठी त्याचा जन्म कसा झाला, याची शिकवण द्यायला हवी. आपण एकविसाव्या शतकातही मुलगा किंवा मुलगी कशी होते, याचे साधे ज्ञान सर्वसामान्य लोकांना देऊ शकत नाही. मुळात मुलगा किंवा मुलगी हा भेद करायला नको आहे. त्यातून संपूर्ण समाजाचा नैसर्गिक समतोलच बिघडत चालला आहे. स्त्रियांना देवी, माता, भगिनी वगैरे वगैरे मानणाºया या पुरुषांची ही दहशत मोडून काढायला हवी. सारिका मोरे हिला माहीत होते की, त्याने आपल्याशी केलेला विवाह केवळ मुलगा जन्माला घालावा यासाठीच आहे. तोच उद्देश साध्य झाला नाही तर या विवाहाची गरज नाही म्हणून त्याने २६ वर्षांच्या सारिकाला सोडून दिले असते. वास्तविक पहिला विवाह आणि चार मुली असताना हा विवाहच व्हायला नको होता. हा दुसरा विवाह कायदेशीर आहे का याचीच खातरजमा करून एक पत्नी असताना त्याने दुसरे लग्न केले असेल किंवा तिच्यापासून रीतसर घटस्फोट न घेता हे लग्न केले असेल, तर त्यासाठीही लखन मोरे याला आरोपीच्या पिंजºयात उभे केले पाहिजे. इतके कौटुंबिक कायदे असतानाही हा नादान पुरुष केवळ मुलगा हवा यासाठी ही दहशत निर्माण करतो आहे.