शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
2
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
3
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
4
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
5
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
6
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
7
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
8
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
9
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
10
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
11
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
12
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
13
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
14
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
15
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
16
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
18
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
19
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
20
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...

मेघदूत अर्थात छत्रीतला सखा...

By चंद्रशेखर कुलकर्णी | Updated: July 26, 2017 12:04 IST

मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसराही नाही.

मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसराही नाही. अर्धी मुंबई चंद्रमौळी झोपड्यांमध्ये राहात असूनही इथं पावसाला कुणी नको नको रे...असं नाही म्हणत!मुंबईत पाऊस बरसायला लागला की एक अनोखं चित्र दिसतं. आभाळात काळ्याकुट्ट ढगांची अन्् जमिनीवरल्या लोंढ्यांच्या डोईवर छत्र्यांची गर्दी. या शहरात सगळ्या प्रकारच्या अभिरूचीला जागा आहे. म्हणूनच तर आषाढाच्या पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली की जसा दादा कोंडकेंच्या ढगाला लागली कळ...ची धून गुणगुणणारा वर्ग आहे, तसाच महाकवी कालिदासाच्या मेघदूताची याद जागवणारा वर्गही कमी नाही. तसं पाहिलं तर बरसू पाहणाऱ्या ढगांचं प्रणयीजनांना वाटणारं आकर्षण नवं नाही. तो परंपरेनं चिंब भिजलेला वारसा आहे. आषाढाची सय आली अन्् पाऊस मुंबईवर अक्षरश: कोसळला. जलमय झालेल्या मुंबईची दृश्यं पाहताना बाहेरच्या माणसाच्या छातीत धस्स होईलही कदाचित पण अस्सल मुंबईकर धबाबा कोसळलेला पाऊसही लीलया अंगावर झेलतो. म्हटलं तर मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसरा पाऊसही नाही. अर्धी मुंबई चंद्रमौळी झोपड्यांमध्ये राहात असूनही इथं पावसाला कुणी नको नको रे...असं नाही म्हणत!आषाढाच्या पहिल्याच दिवशी मेघदूतातल्या कविकल्पनेला जागून पाऊस मुंबापुरीवर बरसला. रविवारच्या सुटीच्या दुलईत लपटलेली मुंबई धो धो कोसळलेल्या पावसानं सुखावली. या शहराचा पर्जन्यमापक अनोखा आहे. २४ तासांत किती मिलीमीटर किंवा किती इंच पाऊस पडला, याच्या खानेसुमारीत मुंबईकरांना फारसा रस नसतो. सायन, दादर टीटी आणि हिंदमाता यासारख्या सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आणि उपनगरांच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे सब वे पाण्यात बुडाले, रेल्वेचे रूळ पाण्यात डुबकी मारून बसले, की मुंबईत पाऊस सुरू झाला असं मानायची पद्धत आहे. मुंबईतल्या पावसाच्या गणिताचं प्रमेय तसं सुटायला अवघडच. कारण नखशिखान्त भिजल्यावर हे शहर अंग आक्रसून घेत नाही. उलट अधिक उन्मादक होतं. रोमॅन्टिसिझमच्या अंगानं आक्रमकही. मुंबईतल्या प्रेमीयुगुलांची चिंब भिजल्यानंतरची अभिव्यक्तीही खाशी असते. ‘त्यांच्या’तल्या तिला पाऊस आवडतो. त्याला कधीमधी नाही आवडत. तिच्यासाठी...पाऊस म्हणजे मोकळं होणं, भरभरून सांगणं, असोशीनं व्यक्त होणं. पण त्याचं काय? कवी सौमित्रच्या शब्दांत सांगायचं तर त्याला वाटतं...पाऊस म्हणजे चिखल, राडा...एक हसं करणारा प्रकार! मुद्दा इतकाच, की पावसाकडे कोण कसं बघेल यातली अनिश्चितता पावसाच्या बेभरवशाच्यापेक्षा जास्त आहे. पण वर्षाकाठी आठ-दहा महिने घामाच्या धारांमध्ये चिंब भिजणारा मुंबईकर चातकासारखी पावसाची वाट बघतो. कमालीच्या जागरूकतेनं मान्सूनच्या आगमनाचा ट्रॅक ठेवतो. मुंबईचा पाऊस बघण्यासाठी समुद्रालगतच्या तारांकित हॉटेलांमध्ये तळ ठोकून राहणाऱ्या अरबांची एके काळी त्यावरून टिंगल केली जायची. पण ते उंटावरचे नव्हे, तर खरेखुरे शहाणे होते, असं उसळलेला अरबी समुद्र प्रेमानं बघणाऱ्या मुंबईकरांना एव्हाना मनोमन पटलंय. रम्य वगैरे नसला, तरी सूर्याला दोन-तीन दिवस औषधालाही फिरकू न देणारा पाऊस मुंबईकरांना आवडतो. रखडलेल्या लोकल, तुंबलेले रस्ते, अर्धीअधिक भिजलेली गर्दी, चिकचिकाट अन्् मुंगीच्या वेगानं नि मुंगळ्याच्या चिकाटीनं चालणारी वाहतूक अशा धबडग्यात रोमँटिक होण्याला जागा मिळावी तरी कशी? पण पावसाची मौज लुटायला इथं मनाई नाही. कंबरेएवढ्या पाण्यात बंद पडलेल्या गाडीला धक्का मारणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल असतं. ‘चले यार धक्का मार’च्या या वरातीत अनोळखी माणसंही सुहास्य वदनानं सामील होतात. भिजून देहाचं धुकं वगैरे करण्याएवढा वेळ मुंबईकरांपाशी नाही. तरीही आता मुंबईचे रंग हमखास बदलणार. छत्र्या-रेनकोटांचे नानाविध प्रकार. बायकांच्या पावसाळी पर्सेस आणिक खूप काही. पाऊस कवितेतून वगैरे व्यक्त न करणारा मुंबईकर पाऊस मन:पूर्वक जगतो. तो पावसाला कुरकुरत नाही. नावं ठेवत नाही. अनोळखी पावसालाही सखा म्हणून छत्रीत घेण्याची दानत हेच या शहराचे महाकाव्य!-चंद्रशेखर कुलकर्णी