शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

मेघदूत अर्थात छत्रीतला सखा...

By चंद्रशेखर कुलकर्णी | Updated: July 26, 2017 12:04 IST

मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसराही नाही.

मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसराही नाही. अर्धी मुंबई चंद्रमौळी झोपड्यांमध्ये राहात असूनही इथं पावसाला कुणी नको नको रे...असं नाही म्हणत!मुंबईत पाऊस बरसायला लागला की एक अनोखं चित्र दिसतं. आभाळात काळ्याकुट्ट ढगांची अन्् जमिनीवरल्या लोंढ्यांच्या डोईवर छत्र्यांची गर्दी. या शहरात सगळ्या प्रकारच्या अभिरूचीला जागा आहे. म्हणूनच तर आषाढाच्या पहिल्याच दिवशी पावसानं हजेरी लावली की जसा दादा कोंडकेंच्या ढगाला लागली कळ...ची धून गुणगुणणारा वर्ग आहे, तसाच महाकवी कालिदासाच्या मेघदूताची याद जागवणारा वर्गही कमी नाही. तसं पाहिलं तर बरसू पाहणाऱ्या ढगांचं प्रणयीजनांना वाटणारं आकर्षण नवं नाही. तो परंपरेनं चिंब भिजलेला वारसा आहे. आषाढाची सय आली अन्् पाऊस मुंबईवर अक्षरश: कोसळला. जलमय झालेल्या मुंबईची दृश्यं पाहताना बाहेरच्या माणसाच्या छातीत धस्स होईलही कदाचित पण अस्सल मुंबईकर धबाबा कोसळलेला पाऊसही लीलया अंगावर झेलतो. म्हटलं तर मुंबईचा पाऊस ही काही चेरापुंजीची ढगफुटी नव्हे. रम्य वगैरे सदरात मोडावा असा महाबळेश्वरसारखा तो भिजरा आणि हसरा पाऊसही नाही. अर्धी मुंबई चंद्रमौळी झोपड्यांमध्ये राहात असूनही इथं पावसाला कुणी नको नको रे...असं नाही म्हणत!आषाढाच्या पहिल्याच दिवशी मेघदूतातल्या कविकल्पनेला जागून पाऊस मुंबापुरीवर बरसला. रविवारच्या सुटीच्या दुलईत लपटलेली मुंबई धो धो कोसळलेल्या पावसानं सुखावली. या शहराचा पर्जन्यमापक अनोखा आहे. २४ तासांत किती मिलीमीटर किंवा किती इंच पाऊस पडला, याच्या खानेसुमारीत मुंबईकरांना फारसा रस नसतो. सायन, दादर टीटी आणि हिंदमाता यासारख्या सखल भागात गुडघाभर पाणी साचलं आणि उपनगरांच्या पूर्व-पश्चिम भागांना जोडणारे सब वे पाण्यात बुडाले, रेल्वेचे रूळ पाण्यात डुबकी मारून बसले, की मुंबईत पाऊस सुरू झाला असं मानायची पद्धत आहे. मुंबईतल्या पावसाच्या गणिताचं प्रमेय तसं सुटायला अवघडच. कारण नखशिखान्त भिजल्यावर हे शहर अंग आक्रसून घेत नाही. उलट अधिक उन्मादक होतं. रोमॅन्टिसिझमच्या अंगानं आक्रमकही. मुंबईतल्या प्रेमीयुगुलांची चिंब भिजल्यानंतरची अभिव्यक्तीही खाशी असते. ‘त्यांच्या’तल्या तिला पाऊस आवडतो. त्याला कधीमधी नाही आवडत. तिच्यासाठी...पाऊस म्हणजे मोकळं होणं, भरभरून सांगणं, असोशीनं व्यक्त होणं. पण त्याचं काय? कवी सौमित्रच्या शब्दांत सांगायचं तर त्याला वाटतं...पाऊस म्हणजे चिखल, राडा...एक हसं करणारा प्रकार! मुद्दा इतकाच, की पावसाकडे कोण कसं बघेल यातली अनिश्चितता पावसाच्या बेभरवशाच्यापेक्षा जास्त आहे. पण वर्षाकाठी आठ-दहा महिने घामाच्या धारांमध्ये चिंब भिजणारा मुंबईकर चातकासारखी पावसाची वाट बघतो. कमालीच्या जागरूकतेनं मान्सूनच्या आगमनाचा ट्रॅक ठेवतो. मुंबईचा पाऊस बघण्यासाठी समुद्रालगतच्या तारांकित हॉटेलांमध्ये तळ ठोकून राहणाऱ्या अरबांची एके काळी त्यावरून टिंगल केली जायची. पण ते उंटावरचे नव्हे, तर खरेखुरे शहाणे होते, असं उसळलेला अरबी समुद्र प्रेमानं बघणाऱ्या मुंबईकरांना एव्हाना मनोमन पटलंय. रम्य वगैरे नसला, तरी सूर्याला दोन-तीन दिवस औषधालाही फिरकू न देणारा पाऊस मुंबईकरांना आवडतो. रखडलेल्या लोकल, तुंबलेले रस्ते, अर्धीअधिक भिजलेली गर्दी, चिकचिकाट अन्् मुंगीच्या वेगानं नि मुंगळ्याच्या चिकाटीनं चालणारी वाहतूक अशा धबडग्यात रोमँटिक होण्याला जागा मिळावी तरी कशी? पण पावसाची मौज लुटायला इथं मनाई नाही. कंबरेएवढ्या पाण्यात बंद पडलेल्या गाडीला धक्का मारणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावर स्माईल असतं. ‘चले यार धक्का मार’च्या या वरातीत अनोळखी माणसंही सुहास्य वदनानं सामील होतात. भिजून देहाचं धुकं वगैरे करण्याएवढा वेळ मुंबईकरांपाशी नाही. तरीही आता मुंबईचे रंग हमखास बदलणार. छत्र्या-रेनकोटांचे नानाविध प्रकार. बायकांच्या पावसाळी पर्सेस आणिक खूप काही. पाऊस कवितेतून वगैरे व्यक्त न करणारा मुंबईकर पाऊस मन:पूर्वक जगतो. तो पावसाला कुरकुरत नाही. नावं ठेवत नाही. अनोळखी पावसालाही सखा म्हणून छत्रीत घेण्याची दानत हेच या शहराचे महाकाव्य!-चंद्रशेखर कुलकर्णी