शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
2
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
3
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
4
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
5
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
6
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
7
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
8
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
9
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
10
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
11
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
12
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
13
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
14
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
15
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
16
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
17
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
18
Shrejal Guleria : अभिमानास्पद! वडील सैन्यात सुभेदार, लेक बनली फ्लाइंग ऑफिसर; तिसरी पिढी देशसेवेसाठी सज्ज
19
Video: आरारारा... खतरनाक! जेसन होल्डरने टाकला अजब-गजब चेंडू, क्रिकेटविश्वात रंगलीये चर्चा
20
सूडाची भावना! खांबाला बांधलं, केसाला धरुन फरफटत नेलं; लव्हमॅरेज केल्यावर जावयाला मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ध्यानधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते !

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते ! श्रीमद् भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात,बन्धूरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित:।अनात्मान्स्तु शत्रुत्वे वर्ततात्मैव शत्रूवत ।।म्हणजेच ज्याने मन जिंकले आहे. त्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे; परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू आहे. जगतगुरु श्रीशंकराचार्य म्हणतात,जिंत जगत केन। मनो ही येन ।।माणसाच्या मनाचे वैशिष्ट्य म्हणजे सतत विचार करणे हे आहे. आपण शांत बसून असलो तरी आपल्या मेंदूतील काही भाग मात्र शांत होत नाही. तो सतत विचार निर्माण करीत असतो. या मेंदूच्या ठराविक भागाला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. आपल्या मनात सतत येणारे विचार आपल्या मेंदूला थकवतात. आपल्या मनात विचारांची शृंखला चालू असते. मनामध्ये नकारात्मक विचार जास्त असतात, ते आपल्या स्मृती पटलावर नकारात्मक भाव निर्माण करतात, त्यामुळे मेंदूची शक्ती खर्ची पडते. मग चिडचिड होते, मानिसक तणाव निर्माण होतो, शरीरातले हार्मोन्स असंतुलित होतात व त्याचे रूपांतर मधुमेह, रक्तदाब, थॉयराईडसारखे आजार निर्माण करतात. ध्यानामध्ये आपण आपले लक्ष श्वासावर, हृदयावर, प्रकाश ज्योतीवर, भगवंताच्या नामस्मरणावर केंद्रित करतो त्यामुळे मेंदूमधील इन्सुला नावाचा भाग सक्रि य होतो व सतत विचार करणारा मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क भाग शांत होतो. त्यामुळे त्याला विश्रांती मिळते व आपले मन शांत होते, आपल्याला ताजेतवाने वाटते, मनाची एकाग्रता वाढते व आत्मिक बळ मिळते.जेव्हा तुम्ही ध्यान संपून उठता तेव्हा तुम्हाला अगदी प्रगाढ निद्रेने मिळालेली विश्रांती लाभलेली असते. ध्यानाच्या तीन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेला ‘धारणा’ असे म्हणतात. दुसºया अवस्थेला ‘ध्यान’ म्हणतात.तिसºया अवस्थेला ‘समाधी’ असे म्हणतात. आज समाजात प्रत्येक जण ताणतणावात दिसत आहे. त्यामुळेच दिवसातून काही वेळ ध्यानधारणा करणे हिताचे ठरते. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा मानवी जीवनात ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणूनच अध्यात्मामध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्याMeditationसाधना