शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
2
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
4
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
5
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
6
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
7
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
8
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
9
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
10
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
11
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
12
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
13
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
14
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
15
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
16
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
17
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलरची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
18
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
19
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
20
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध

ध्यानधारणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 00:13 IST

मन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते !

- प्रा. डॉ. संदीप ताटेवारमन हे चंचल असते. एका क्षणात वर्तमान काळात, दुसऱ्या क्षणात भूतकाळात तर तिस-या क्षणात भविष्यकाळात. आता इथे तर दुस-या क्षणातच सात समुद्रापलीकडे! कधीकधी तर, शत्रू चिंतू नये ते मन चिंतते ! श्रीमद् भगवद् गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात,बन्धूरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जित:।अनात्मान्स्तु शत्रुत्वे वर्ततात्मैव शत्रूवत ।।म्हणजेच ज्याने मन जिंकले आहे. त्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे; परंतु जो असे करण्यामध्ये अपयशी झाला आहे त्यासाठी त्याचे मन हे परम शत्रू आहे. जगतगुरु श्रीशंकराचार्य म्हणतात,जिंत जगत केन। मनो ही येन ।।माणसाच्या मनाचे वैशिष्ट्य म्हणजे सतत विचार करणे हे आहे. आपण शांत बसून असलो तरी आपल्या मेंदूतील काही भाग मात्र शांत होत नाही. तो सतत विचार निर्माण करीत असतो. या मेंदूच्या ठराविक भागाला डिफॉल्ट मोड नेटवर्क म्हणतात. आपल्या मनात सतत येणारे विचार आपल्या मेंदूला थकवतात. आपल्या मनात विचारांची शृंखला चालू असते. मनामध्ये नकारात्मक विचार जास्त असतात, ते आपल्या स्मृती पटलावर नकारात्मक भाव निर्माण करतात, त्यामुळे मेंदूची शक्ती खर्ची पडते. मग चिडचिड होते, मानिसक तणाव निर्माण होतो, शरीरातले हार्मोन्स असंतुलित होतात व त्याचे रूपांतर मधुमेह, रक्तदाब, थॉयराईडसारखे आजार निर्माण करतात. ध्यानामध्ये आपण आपले लक्ष श्वासावर, हृदयावर, प्रकाश ज्योतीवर, भगवंताच्या नामस्मरणावर केंद्रित करतो त्यामुळे मेंदूमधील इन्सुला नावाचा भाग सक्रि य होतो व सतत विचार करणारा मेंदूतील डिफॉल्ट मोड नेटवर्क भाग शांत होतो. त्यामुळे त्याला विश्रांती मिळते व आपले मन शांत होते, आपल्याला ताजेतवाने वाटते, मनाची एकाग्रता वाढते व आत्मिक बळ मिळते.जेव्हा तुम्ही ध्यान संपून उठता तेव्हा तुम्हाला अगदी प्रगाढ निद्रेने मिळालेली विश्रांती लाभलेली असते. ध्यानाच्या तीन अवस्था आहेत. पहिल्या अवस्थेला ‘धारणा’ असे म्हणतात. दुसºया अवस्थेला ‘ध्यान’ म्हणतात.तिसºया अवस्थेला ‘समाधी’ असे म्हणतात. आज समाजात प्रत्येक जण ताणतणावात दिसत आहे. त्यामुळेच दिवसातून काही वेळ ध्यानधारणा करणे हिताचे ठरते. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा मानवी जीवनात ध्यानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. म्हणूनच अध्यात्मामध्ये ध्यानधारणेला अत्यंत महत्त्व आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्याMeditationसाधना