शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

वैद्यकीय इच्छापत्र : कुणी आणि का करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 06:08 IST

वैद्यकीय इच्छापत्र करू इच्छिणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक व्यवस्था उपलब्ध करण्याचे निर्देश नुकतेच उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. त्यानिमित्ताने...

मेधा कुळकर्णी, संस्थापक, संपर्क

‘मौत का भी इलाज हो शायद

जिंदगी का कोई इलाज नहीं’

असं फिराक गोरखपुरींनी म्हटलंय. खरोखरच, म्हातारपणाची स्थिती अनुभवताना, त्यातही एखाद्या आजाराने त्रासलेलं असताना हे जाणवतं. जगण्याचे नियम पाळावेच लागतात. अलीकडे वृद्धावस्थेतल्या फिटनेसबरोबरच मृत्युपत्र, इच्छापत्र वगैरे मुद्द्यांची चर्चाही बरीच चालते. सधन वर्गातले वृद्ध नागरिक याबाबत विशेष जागरूक असतात. आम्ही चालवत असलेल्या ‘वृद्धांचं पालकत्व’ या फेसबुक ग्रुपवर आठवड्यातून दोन-चारदा तरी विचारणा इच्छापत्राबाबत होत असतात. मृत्युपत्राइतकंच इच्छापत्र, लिव्हिंग विलही महत्त्वाचं असतं, याची जाणीव अनेकांना आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींमुळे खरोखरच मृत्यू लांबवता येऊ शकतो. एखादा जीवघेणा आजार, चिवट आजार झाला. तो औषधाने बरा होऊ शकणार नाही. अशा स्थितीत उपचार करायचे की नाही, किती मर्यादेपर्यंत करायचे, याबाबतचे निर्णय घेण्याच्या अवस्थेत आपण नसू तर आपल्या वतीने हे निर्णय कुणी घ्यायचे... हे सारं संबंधित व्यक्तीनेच लिहून ठेवलेलं बरं असतं. आधुनिक तंत्रज्ञानामुळे माणूस अत्यंत आजारी अवस्थेतही कृत्रिम पद्धतींनी (व्हेंटिलेटर, लाइफ सपोर्ट) जगवला जाऊ शकतो. पण काही वेळा हे ‘जगणं’ म्हणजे फक्त ‘जिवंत असणं’ इतकंच असतं. अशावेळी आपल्या आयुष्याचे निर्णय कोण घेणार? डॉक्टर? कुटुंबीय? की आपण स्वतः? लिव्हिंग विलमध्ये याबाबतच्या आपल्या इच्छांचे निर्देश मांडून ठेवता येऊ शकतात. तो कायदेशीर दस्तऐवज असल्याने त्यात लिहिलेलं पाळणं, अंमलात आणलं जाणं बंधनकारक असतं.

उदाहरणार्थ, आपल्या अंतिम आजारी अवस्थेत (Terminal Illness) किंवा कोमात असताना लाइफ सपोर्ट, व्हेंटिलेटर, डायलिसिस, कृत्रिम अन्ननलिका यासारखा लाइफ सपोर्ट स्वीकारायचा की नाही?  हृदय बंद पडल्यावर पुन्हा जिवंत करण्याचा प्रयत्न करावा का? शेवटच्या काळात फक्त वेदना कमी करणाऱ्या उपचारांवर (Palliative Care) भर द्यावा का,  याची अर्थिक बाजू कशी सांभाळावी वगैरे.

एक डॉक्टर सांगत होते : एका पेशंटचे दोन मुलगे होते. ब्रेन स्ट्रोकचं निमित्त झालं आणि मुंबईतल्या मुलाने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्या मुलाशी चर्चा करून उपचारांची दिशा ठरवली. नंतर त्यांचा दुसरा मुलगा अमेरिकेहून आला. त्याला आधी ठरवलेली उपचारांची दिशा पटली नाही. त्याने त्यावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली. अशाने डॉक्टर आणि पेशंट, नातलग यांच्यातला परस्पर विश्वास ढळू शकतो. आपल्या आजारपणात उपचारांबाबत नेमके कुणी निर्णय घ्यायचे, हे त्या पेशंटने लिव्हिंग विल करून नमूद केलं असतं तर असा गोंधळ झाला नसता. डॉक्टर आणि कुटुंबीय यांच्यात उपचारांच्या बाबतीत मतभेद होऊ नयेत. 

पेशंट जगण्याची शक्यता नसताना अखेरच्या दिवसांत तिने / त्याने अवयवदान केल्याच्या बातम्या हल्ली येतात. मृत्यू अटळ असला तरी जगाचा निरोप घेताना आपण कुणाच्या तरी उपयोगी पडणं ही सार्थकतेची भावना आहे. तसं लिव्हिंग विलमध्ये लिहून ठेवता येतं. अवयवदानासाठी नोंदणीही करून ठेवता येते. अचानक ब्रेन स्ट्रोक होतो किंवा हार्ट अटॅक येतो. कुटुंबीय जवळ नसतं. लिव्हिंग विलमध्ये संभाव्य उपचारांबाबत स्पष्ट लिहून ठेवलेलं असलं की, मदत करणाऱ्यांना निर्णय घेणं सोपं जातं. 

भारतीय राज्यघटनेने जगण्याबरोबरच सन्मानाने मरण्याचा (Right to Die with Dignity) हक्कही दिला आहे. (अनुच्छेद क्र २१). मरणाची वाट बघत विद्रुप, निरर्थक आयुष्य जगत राहण्यापेक्षा मृत्यूची वाट धरता यावी, यासाठी इच्छामरणाचा कायदा व्हावा, असे प्रयत्न आपल्याकडे सुरू आहेतच. पण मृत्यूआधीच्या, मृत्यूपर्यंतच्या जगण्याबाबतही आपली मतं, आपलं म्हणणं आपण लिहून ठेवणं चांगलं. हे आपण निरोगी असतानाच करायचं आहे. आपल्या शरीरावर आपला हक्क असायला हवा, असं वाटत असेल तर लिव्हिंग विल करणं हा उत्तम मार्ग. कायदेतज्ज्ञांच्या मदतीने ते करता येईल. आपल्या इच्छेनुसार यात वेळोवेळी बदल करणंही शक्य असतं. 

                medha@sampark.net.in