शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू
2
MNS Morcha: मनसेचा मोर्चा रोखण्यासाठी पोलिसांची रात्रभर घरात घुसून धरपकड, मीरा भाईंदरमध्ये बंदोबस्त वाढवला
3
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत
4
Stock Market Today: ५५ अंकांच्या घसरणीसह उघडला सेन्सेक्स; या दोन क्षेत्रांवर दबाव, बाजारात तेजी का दिसून येत नाहीये?
5
Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?
6
डॅालर्स नाही लोकल करन्सी… रशियाच्या प्लाननं ट्रम्प यांचा तिळपापड, भारताला होणार का मोठा फायदा?
7
Viral Video: देव न दिसे देवळात, माझे पांडुरंग घरात; वारीतून पतललेल्या बापासाठी लेकीनं केलं असं काही, होतंय कौतुक!
8
बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप
9
मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई
10
तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार
11
अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले...
12
"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
13
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
14
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
15
रशियाचा युक्रेनवर पुन्हा मोठा हल्ला, ११ ठार, ८० हून अधिक जखमी; रशियन मंत्र्याचाही मृत्यू
16
"महाराष्ट्राला आम्ही पोसतोय" म्हणणाऱ्या निशिकांत दुबेंना चिन्मयी सुमीतचं हिंदीतून सडेतोड उत्तर, म्हणाली- "त्या खासदाराला..."
17
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
18
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
19
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
20
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र

अन्वयार्थ- महिला केवळ 'लाभार्थी' नाहीत; देश उभारणीतील साथीदार !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2023 10:27 IST

महिला आरक्षण कायद्यामुळे राजकीय प्रक्रियेतील महिलांचा सहभाग वाढेलच; पण यामुळे अनेक सामाजिक धारणांमध्येदेखील सकारात्मक बदल घडून येतील!

सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये महिलांचा हिस्सा महत्त्वपूर्ण आहे. नारी शक्ती वंदन अधिनियम (महिला आरक्षण विधेयक) हे राजकीय सशक्तीकरण साधण्याचे एक महत्त्वाचे साधन बनेल, यात शंका नाही. गेल्या साडेतीन दशकांपासून प्रतीक्षेत असलेले महिला आरक्षण विधेयक अखेर मंजूर झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला असलेला भरभक्कम पाठिंबा आणि बहुमत यामुळे नारीशक्ती वंदन अभियान विधेयकाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा झाला आहे.

महिला आरक्षणाबाबतचा इतिहास पाहिला, तर नरसिंह राव सरकारने सर्वप्रथम आवश्यक घटनादुरुस्ती केली, त्यानंतर देवेगौडा सरकारने प्रत्यक्षात ते सादर केले, पुढे पंतप्रधान इंदरकुमार गुजराल सरकारनेदेखील आपल्या परीने प्रयत्न केले. पंतप्रधानपदी अटलबिहारी वाजपेयी यांनीही या बिलासाठी सर्वपक्षीय बैठक घेतल्या; पण ते अयशस्वी ठरले. कारण त्यावेळी त्यांच्याकडे पुरेसे बहुमत नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली गेल्या नऊ वर्षांत भारताने 'महिला नेतृत्व विकास' या आदर्शाच्या दिशेने वाटचाल केली आहे. उज्ज्वला योजना, स्वच्छता अभियान, बेटी बचाओ, बेटी पढाओ, मुद्रा योजना, प्रसूती रजा वाढवणे, सशस्त्र दलात महिलांचे कायमस्वरूपी कमिशनिंग यांसारख्या उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरणासाठीचे मोदी सरकारचे प्रयत्न सर्वानाच दिसत आहेत. पीएम मुद्रा योजनेंतर्गत सुमारे ७० टक्के कर्ज महिलांना मंजूर करण्यात आले आहे.

महिलांना सन्मानाचे जीवन सुनिश्चित करणे ही मोदी सरकारसाठी एक अटल वचनबद्धता आहे. हे समर्पण उज्ज्वला योजनेंतर्गत एलपीजी सिलिंडरच्या विस्तारित नियोजनातून स्पष्ट होते, धूरमुक्त स्वयंपाकघरांना प्रोत्साहन देऊन लाखो महिलांना दीर्घकालीन श्वसन विकारांपासून वाचवले जाते आहे, शिवाय स्वच्छ भारत अभियानाच्या यशामुळे असंख्य महिलांना आता त्यांच्या घरात शौचालये उपलब्ध केली आहेत. पंतप्रधान आवास भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये योजनेंतर्गत घरांची संयुक्त मालकी महिलांना मिळाली. निवडून आलेल्या प्रतिनिधीपैकी सुमारे १.४ दशलक्ष म्हणजे२०१४ पासून, तांत्रिक शिक्षणात, विशेषतः औद्योगिक ४६ टक्के महिला आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियम हा प्रशिक्षण संस्थांमध्ये महिलांचा सहभाग दुप्पट झाला ऐतिहासिक कायदा आहे, जो महिला सक्षमीकरणाला आहे. भारतातील पदवीधरांपैकी जवळपास अधिक चालना देईल आणि आपल्या ४३ टक्के महिला आहेत. भारतातील अंराळ शास्त्रज्ञांमध्ये सुमारे एक चतुर्थांश महिला आहेत, त्यांचे समर्पण आणि परिश्रम चंद्रयान, गगनयान आणि मंगळ मिशनसह राष्ट्राच्या प्रमुख अंतराळ मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. नागरी विमान वाहतूक क्षेत्रात सर्वाधिक महिला वैमानिक आहेत आणि भारतीय हवाई दलातील महिला वैमानिक आता लढाऊ विमाने उडवत आहेत. मोदी सरकारने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात महिलांसाठी पदे राखीव ठेवली आहेत आणि प्रीमीयर नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि सैनिक स्कूलमध्ये मुलींना प्रवेश देण्याची परवानगी दिली आहे. महिला सेनानी आता अमृत कालमध्ये अमृत रक्षक म्हणून काम करतात. 

भारतातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून आलेल्या प्रतिनिधींपैकी सुमारे १.४ दशलक्ष म्हणजे ४६ टक्के महिला आहेत. नारी शक्ती वंदन अधिनियम हा ऐतिहासिक कायदा आहे. जो महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देईल आणि आपल्या राजकीय आणि प्रशासन प्रक्रियेस महिलांचा अधिकाधिक सहभाग सक्षम करील. परिवर्तनाचा हा प्रवास सामाजिक धारणांमध्ये देखील बदल घडवून आणणारा आहे. जिथे स्त्रिया यापुढे केवळ लाभार्थी नाहीत तर त्या देशाच्या भविष्य बांधणीत सक्रिय योगदान देणाऱ्या ठरतील. माजी पंतप्रधान पीव्ही राव यांच्या सरकारने पंचायती राज व्यवस्थेत ३३ टक्के आरक्षण आणले आहे, हे मान्य करणे महत्वाचे आहे. या उपक्रमामुळे राजकारणातील महिलांच्या सहभागात वाढ झाली. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेमध्ये महिला प्रतिनिधीचे प्रमाण पाच टक्के होते, ते सध्या सतराव्या लोकसभेमध्ये १५ टक्के आहे.