शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

गौप्यस्फोटामागील अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:43 IST

- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे. नंदुरबार पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या पाच वर्षात शहरात पालिकेतर्फे मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात ...

- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे. नंदुरबार पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या पाच वर्षात शहरात पालिकेतर्फे मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात आल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. रस्ते विकास प्रकल्प, भूमिगत गटार, वाढीव पाणीपुरवठा, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन अशी अनेक सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचा त्यात समावेश आहे. अर्थातच गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. सत्ताधारी काँग्रेसने विकासकामे केल्याचा दावा करीत त्या आधारावर मते मागितली तर भाजपने विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आले होते. त्यांनीही आपल्या भाषणात जाहीरपणे सत्ता आल्यास सर्वप्रथम नंदुरबार पालिकेतील भ्रष्टाचार उघड करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. अर्थात निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. मात्र निवडणुकीनंतर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होऊन कारवाई होईल का? हा प्रश्न मात्र भाजप समर्थकांमध्ये कायम होता. दरम्यानच्या काळात पालिकेचे सत्तास्थानी केंद्रित असलेल्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मुलाचे लग्न इंदूरला झाले. मुख्यमंत्री विशेष विमानाने खास विवाह सोहळ्याला आले होते. या उपस्थितीने नंदुरबारकरांच्या भुवया उंचावल्या. राजकारणापलिकडे मैत्री जपण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे अर्थ मात्र वेगवेगळे लावले गेले. रघुवंशींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन आता पाळले जाईल काय, असा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न होता तर दुसरीकडे आमदार रघुवंशी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने मुख्यमंत्री लग्नाला आल्याची चर्चा सुरू झाली. या सर्व चर्चांना विराम मिळाला असताना सोमवारी भाजपचे गटनेते रवींद्र चौधरी व जिल्हाध्यक्षा खासदार डॉ.हीना गावीत यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेत २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप केला. या अपहाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याचेही सांगितले. त्याबाबतचे पत्रही देण्यात आले. हे पत्र एप्रिल महिन्यातील असून त्याचा गौप्यस्फोट दोन महिन्यानंतर का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. येत्या चार महिन्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याने ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पालिकेला अर्थात आमदार रघुवंशींना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात चर्चा काहीही असल्या तरी अपहाराच्या आरोपांच्या चौकशीत काय निष्पन्न होते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव