शहरं
Join us  
Trending Stories
1
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
2
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
3
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
4
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
5
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
6
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
7
ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
8
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
9
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
10
Decision Making: निर्णय घेताना द्विधा मनःस्थिती होते? सद्गुरु सांगतात, 'या' पाच मार्गाने घ्या मनाचा कौल!
11
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
12
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
13
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
14
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
15
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
16
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
17
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
18
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
19
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
20
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!

गौप्यस्फोटामागील अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 12:43 IST

- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे. नंदुरबार पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या पाच वर्षात शहरात पालिकेतर्फे मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात ...

- रमाकांत पाटीलराजकारणातील डावपेच हे सर्वसामान्यांच्या आकलनाबाहेरचे असतात. अनेकवेळा कथनी आणि करणी सारखी असतेच याची शाश्वती नाही. हे सर्व यासाठी की नंदुरबार पालिकेत विकासकामांमध्ये २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप भाजपने पत्रकार परिषदेत केला आहे. नंदुरबार पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात आहे. गेल्या पाच वर्षात शहरात पालिकेतर्फे मोठ्या प्रमाणावर विकासकामे राबविण्यात आल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. रस्ते विकास प्रकल्प, भूमिगत गटार, वाढीव पाणीपुरवठा, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापन अशी अनेक सुमारे २०० कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कामांचा त्यात समावेश आहे. अर्थातच गेल्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत हाच मुद्दा केंद्रस्थानी होता. सत्ताधारी काँग्रेसने विकासकामे केल्याचा दावा करीत त्या आधारावर मते मागितली तर भाजपने विकासकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत पोलखोल करण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत प्रचारासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील आले होते. त्यांनीही आपल्या भाषणात जाहीरपणे सत्ता आल्यास सर्वप्रथम नंदुरबार पालिकेतील भ्रष्टाचार उघड करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. अर्थात निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. मात्र निवडणुकीनंतर पालिकेतील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी होऊन कारवाई होईल का? हा प्रश्न मात्र भाजप समर्थकांमध्ये कायम होता. दरम्यानच्या काळात पालिकेचे सत्तास्थानी केंद्रित असलेल्या आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या मुलाचे लग्न इंदूरला झाले. मुख्यमंत्री विशेष विमानाने खास विवाह सोहळ्याला आले होते. या उपस्थितीने नंदुरबारकरांच्या भुवया उंचावल्या. राजकारणापलिकडे मैत्री जपण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे अर्थ मात्र वेगवेगळे लावले गेले. रघुवंशींविरुद्ध कारवाई करण्याचे आश्वासन आता पाळले जाईल काय, असा स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात प्रश्न होता तर दुसरीकडे आमदार रघुवंशी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने मुख्यमंत्री लग्नाला आल्याची चर्चा सुरू झाली. या सर्व चर्चांना विराम मिळाला असताना सोमवारी भाजपचे गटनेते रवींद्र चौधरी व जिल्हाध्यक्षा खासदार डॉ.हीना गावीत यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेत २०० कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप केला. या अपहाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याचेही सांगितले. त्याबाबतचे पत्रही देण्यात आले. हे पत्र एप्रिल महिन्यातील असून त्याचा गौप्यस्फोट दोन महिन्यानंतर का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. येत्या चार महिन्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचा धुराळा उडणार असल्याने ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भाजपने पालिकेला अर्थात आमदार रघुवंशींना लक्ष्य केल्याची चर्चा सुरू झाली. अर्थात चर्चा काहीही असल्या तरी अपहाराच्या आरोपांच्या चौकशीत काय निष्पन्न होते याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव