शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

इडापिडा टळू दे, साऱ्यांवर सुखाची सावली असू दे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2022 09:12 IST

लक्ष्मीवंतांपासून झोळी फाटकीच राहिलेल्या अभाग्यांपर्यंत प्रत्येकाच्या नजरेत आनंदाचे दिवे उजळते, ती दिवाळीच!

खरे तर दिवस तेच असतात आणि आपणही काही वेगळे नसतो; पण थंडीच्या चाहुलीसोबत दिवाळी आली की सगळा भोवतालचा परिसर उजळून गेल्यासारखा वाटू लागतो, हे खरेचा यावर्षी पाऊस 'जातो जातो' म्हणत अजून गेला नाही आणि थंडी गुणगुणायला लागली असली तरी दरवर्षीच्या जोमाने अजून आलेली नाही. पण यंदाच्या दिवाळीला आनंद आणि उत्साहाचा स्पर्श मात्र आहे! दाणापाणी कमावण्यासाठी बाहेरगावी असलेली मुले माणसे एव्हाना प्रवासाचे सगळे त्रास सोसून आपापल्या घरी पोहोचली असतील, रामप्रहरी दारचे आकाशदिवे उजळले असतील, सुगंधी उटण्याच्या घमघमाटाने पहाट दरवळून गेली असेल आणि थोरामोठ्यांच्या श्रीमंती महालांपासून कष्टकऱ्यांच्या झोपडी-पालांपर्यंत हरेक घराला आज शुभशकुनाचा स्पर्श झाला असेल. हेच तर दिवाळीचे खरे सामर्थ्य! 

लक्ष्मीवंतांपासून झोळी फाटकीच राहिलेल्या अभाग्यांपर्यंत प्रत्येकाच्या नजरेत आनंदाचे दिवे उजळते, ती दिवाळीच! या सणाला ऐश्वर्याची, श्रीमंतीची आस आहे खरी, पण खिशात पैसे असणे ही या आनंदाची पूर्वअट मात्र नाही. मनाजोगे असेल ते टिकेल; मन मोडणारे जे जे ते सरेल आणि आपल्या आयुष्याला सुखाची सावली मिळेल या अक्षय स्वप्नावरचे सावट हटवते म्हणून तर दिवाळीचे सगळ्यांनाच एवढे अप्रूप! आज घरोघरी लक्ष्मीपूजनाचे दिवे लागतील, रेशमी वस्त्रे लेवून आनंदाने दरवळणारी कुटुंबे परस्परांचे शुभचिंतन करतील आणि व्यापारी पेठांमधला उत्सवी झगमगाट आकाशात झेपावेल; तेव्हा समोर उभे सगळे प्रश्न, सर्वांच्या नशिबीच्या सगळ्या काळज्या दोन-चार दिवसांसाठी का होईना, अदृश्य होतील! 

दोन वर्षे मुक्काम ठोकून असलेल्या महामारीने आता काढता पाय घेतला असला तरी सामान्य माणसांच्या डोक्यावर लादलेल्या आर्थिक विवंचना सरलेल्या नाहीत. परतीच्या पावसाने बदाबदा ओतलेल्या पाण्याने हातची पिके धुऊन नेल्याने शेतकरी त्रस्त आहेत. दिवाळीचे तेज सरले की बाजारात काय होणार या शंकेने व्यावसायिक, व्यापारी मनातून धास्तावलेले आहेत. केवळ विध्वंस याखेरीज कुणाच्याही हाती दुसरे काहीही लागणार नाही, अशा विचित्र टप्प्यावर पोहोचलेल्या एका युद्धासह अनेक कारणांनी त्रस्त असलेल्या आणि आर्थिक मंदीच्या भयाने ग्रासलेल्या जगाला चैन नाही. अनेक देशांच्या नशिबी स्थैर्य नाही. जागतिक स्तरावर असा नन्नाचा पाढा असताना भारतीय अर्थव्यवस्थेचे चित्र त्यातल्या त्यात बरे आहे / असेल असे आकडे सांगतात खरे, पण आपल्याही देशात कसलीतरी एक विचित्र घुसमट अनुभवाला येते आहे. प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असतील, पण नीटशी स्पष्ट न करता येणारी अस्वस्थता प्रत्येकालाच जाणवते आहे. 

मध्येच कधीतरी कोरोना रुग्णांच्या आकड्यांची बातमी येते आणि नाही म्हटले तरी काळजाचा एक ठोका अजूनही चुकतोच, या सगळ्याचा विसर पाडते म्हणून या दिवाळीचे इतके अप्रूप अंगाला नवे कपडे लागतात, चवीत बदल करणारे गोडधोड जिन्नस घरात शिजतात, म्हणून खरेतर आपल्या परंपरेने ३६५ दिवसांच्या गजऱ्यात ही सणावारांची फुले ओवली. पण हल्ली तसे ना नव्या कपड्यांचे अप्रूप, ना लाडू करंज्यांचा, चिवडा चकल्यांचा दिमाख । खायला आणि ल्यायला तर काय नेहमीच असते, असा सुकाळ नशिबी असलेल्यांची संख्या वाढली आहे, हे तर खरेच! पण त्या बदल्यात आयुष्याने लादलेल्या सक्तीच्या धावपळीची, सततच्या ताणतणावाची गर्दी इतकी झाली, की जगण्यातले स्वास्थ्य कधी हरपून गेले ते कळलेच नाही. म्हणून तर हल्ली दिवाळीत लोक लक्ष्मीपूजन झाले की शांत-निवांत सुखाच्या शोधात प्रवासाला पळतात. 

काहीच न करता नुसत्या गप्पांच्या मैफली जमवून घरीच आराम करू, असेही ठरवतात. जगण्याच्या धावपळीतून क्षणभर विसावा घेण्याची ही दुर्मीळ संधी दिवाळी देते, हे कसे विसरणार? म्हणून ती हवी मुक्त, निर्भर सुखाचे बोट निदान चार दिवस तरी पकडून येण्याचे निमित्त हवे, म्हणून दिवाळी हवी!! आदल्या वर्षीची दिवाळी बंद दाराआड काढली आपण गेल्यावर्षीची धाकधुकीतच सरली... यंदा मात्र दारासमोरच्या रांगोळीभोवती दोन पणत्या जास्तीच्या लागतील आणि आकाशकंदिलाच्या झिरमिळ्या उत्साहाने आभाळभर पसरतील. दिवाळी सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यात बाजारात खरेदीसाठी लोटलेला पूर या उत्साहाचीच सुखद साक्ष आहे. असतील नसतील त्या साऱ्या गाठी - निरगाठी सुटू देत... सगळे जसे होते, जसे आहे त्याहून सुंदर, मंगल होऊ दे.... इडापिडा टळू दे, साऱ्यांवर सुखाची सावली असू दे!

टॅग्स :Diwaliदिवाळी 2022