शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

भौतिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 00:03 IST

जर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे.

- जग्गी वासुदेवजर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे. आपण का आणि कशासाठी जगतो, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न कुणालाच पडल्याचं दिसत नाही. केवळ जन्माला आलो म्हणून जगायचं, अशी धारणा प्रत्येकाच्या ठायी दिसून येते. विशेष म्हणजे या प्रकारचं अस्तित्व आजकाल जगात रूढ होत चाललं आहे. आजचा आधुनिक माणूस किंवा ज्याला ‘मॉडर्न’ म्हटलं जातं, ते केवळ याबद्दलच आहे. एखाद्यामध्ये भीती, हाव, राग, चिंता, लाचारी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, पण तरी जोपर्यंत तो त्याच्या भौतिक अस्तित्वापलीकडे काहीतरी शोधत असेल, तोपर्यंत त्याच्यासाठी एक मार्ग आहे. पण जर कुणी स्वत:ला केवळ स्वत:च्या भौतिक प्रकृतीलाच वाहून घेतलं, तर त्यासाठी कुठलाही मार्ग नाही. अशा मनुष्याची मती कुंठित झाल्यासारखीच असते. या जगण्याला मथितार्थ नसतो. मग जगायचं तरी का आणि नेमकं कशासाठी, हा प्रश्न उरतोच. हा प्रश्न प्रत्येकाला पडणं ही भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाण्याची पहिली पायरी आहे. पण येथूनच या विचारमंथनाच्या प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवास मोठा आहे तो वैचारिकदृष्ट्या. म्हटलं तर ही विचारयात्रा तशी मोठी आहे. पण ही पहिली पायरी पार करून पुढील विचारयात्रा सुरू होते तेव्हा तो भौतिकतेच्या पलीकडे खऱ्या अर्थाने पाहायच्या अवस्थेसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो. ही एक उल्लेखनीय अवस्था आहे. जेव्हा एखादा माणूस विचार करू लागतो की, ‘‘मीच सर्वकाही आहे; आणि माझ्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. मला सर्वकाही माहीत आहे आणि मला माहीत नाही असं काही असू शकत नाही.’’ ही मानवी अवस्थांमधली सर्वांत भयावह अवस्था आहे. जेव्हा त्याला जाणवू लागतं की स्वत:हून अधिक असं काहीतरी आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेचं पाहिलं पाऊल आहे. जेव्हा एखाद्याला जाणवू लागतं की, ‘‘मी आत्ता जसा आहे ते पुरेसं नाहीये, अजून काहीतरी आहे. माझं अस्तित्वच सर्वकाही नाहीये.’’ याचा अर्थ त्याच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या