शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

भौतिकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 00:03 IST

जर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे.

- जग्गी वासुदेवजर एखाद्या माणसानं त्याच्या परमोच्च प्रकृतीपर्यंत पोहोचण्याची इच्छा बाळगली नाही, जर त्यानं केवळ एक हाडामांसाचा तुकडा म्हणूनच जगण्यात समाधानी राहण्याचा प्रयत्न केला, तर हे सर्वांत निकृष्ट दर्जाचं अस्तित्व आहे. आपण का आणि कशासाठी जगतो, याचा विचार कुणीच करताना दिसत नाही. आपल्या जगण्याचं प्रयोजन काय, असा प्रश्न कुणालाच पडल्याचं दिसत नाही. केवळ जन्माला आलो म्हणून जगायचं, अशी धारणा प्रत्येकाच्या ठायी दिसून येते. विशेष म्हणजे या प्रकारचं अस्तित्व आजकाल जगात रूढ होत चाललं आहे. आजचा आधुनिक माणूस किंवा ज्याला ‘मॉडर्न’ म्हटलं जातं, ते केवळ याबद्दलच आहे. एखाद्यामध्ये भीती, हाव, राग, चिंता, लाचारी अशा अनेक प्रकारच्या गोष्टी असतील, पण तरी जोपर्यंत तो त्याच्या भौतिक अस्तित्वापलीकडे काहीतरी शोधत असेल, तोपर्यंत त्याच्यासाठी एक मार्ग आहे. पण जर कुणी स्वत:ला केवळ स्वत:च्या भौतिक प्रकृतीलाच वाहून घेतलं, तर त्यासाठी कुठलाही मार्ग नाही. अशा मनुष्याची मती कुंठित झाल्यासारखीच असते. या जगण्याला मथितार्थ नसतो. मग जगायचं तरी का आणि नेमकं कशासाठी, हा प्रश्न उरतोच. हा प्रश्न प्रत्येकाला पडणं ही भौतिक अस्तित्वाच्या पलीकडे जाण्याची पहिली पायरी आहे. पण येथूनच या विचारमंथनाच्या प्रवासाला सुरुवात होते. हा प्रवास मोठा आहे तो वैचारिकदृष्ट्या. म्हटलं तर ही विचारयात्रा तशी मोठी आहे. पण ही पहिली पायरी पार करून पुढील विचारयात्रा सुरू होते तेव्हा तो भौतिकतेच्या पलीकडे खऱ्या अर्थाने पाहायच्या अवस्थेसाठी पूर्णपणे तयार झालेला असतो. ही एक उल्लेखनीय अवस्था आहे. जेव्हा एखादा माणूस विचार करू लागतो की, ‘‘मीच सर्वकाही आहे; आणि माझ्याशिवाय दुसरं काही असू शकत नाही. मला सर्वकाही माहीत आहे आणि मला माहीत नाही असं काही असू शकत नाही.’’ ही मानवी अवस्थांमधली सर्वांत भयावह अवस्था आहे. जेव्हा त्याला जाणवू लागतं की स्वत:हून अधिक असं काहीतरी आहे, हे आध्यात्मिक प्रक्रियेचं पाहिलं पाऊल आहे. जेव्हा एखाद्याला जाणवू लागतं की, ‘‘मी आत्ता जसा आहे ते पुरेसं नाहीये, अजून काहीतरी आहे. माझं अस्तित्वच सर्वकाही नाहीये.’’ याचा अर्थ त्याच्या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात झाली.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकnewsबातम्या