शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

मराठवाडा हिरवाकंच होणार

By गजानन दिवाण | Updated: July 21, 2018 12:23 IST

वन विभागाची आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

कायम दुष्काळाच्या छायेत जगणारा मराठवाडा आगामी काही वर्षांत हिरवाकंच झाला, तर नवल वाटायला नको. तशी जोरदार तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठवाड्यातील प्रशासनही झपाट्याने कामाला लागले आहे.

राज्यभरात यंदा १३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात मराठवाड्याच्या वाट्याला २ कोटी ९१ लाख ७४ हजार वृक्ष आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार मराठवाड्याने एक कोटी ७३ लाख ६४ हजार रोपट्यांची लागवडदेखील केली आहे.

महावृक्षलागवड मोहिमेत पहिल्या टप्प्यात केवळ दहाच दिवसांत मराठवाड्याने ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यातही आघाडी आहे ती रेल्वेने पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातूरची. दुष्काळाच्या झळा काय असतात, हे त्यांनीच सर्वाधिक भोगले आहे म्हणून असावे कदाचित. ३३.४६ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना या जिल्ह्याने आतापर्यंत ३५ लाख ५४ हजारांवर रोपांची लागवड केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने २७.६८ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना १६ लाख ५६ हजार रोपे लावली आहेत. जालन्याला ३६.२६ लाखांचे उद्दिष्ट असून, १२ लाख ६२ हजार रोपे लावली आहेत. बीड जिल्ह्यात ९७ टक्केवृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने केवळ ३२ टक्के वृक्षलागवड झाली आहे.

वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून १ जुलैपासून सुरू झालेली ही मोहीम ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वृक्षलागवडीत मराठवाडा उद्दिष्टपूर्ती करणार यात अजिबात शंका नाही. २०१६ मध्येदेखील राज्य सरकारने मोठी मोहीम राबविली होती. राज्यात दोन कोटी रोपटी लावण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्यात ५४ लाख १९ हजार ४६५ रोपटी लावली गेली. यातील तब्बल ७४ टक्केरोपटी जगल्याचा दावा नंतर वन विभागाने केला. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ८८ टक्केरोपे जगली. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ८७ टक्के, हिंगोलीत ८३ टक्केरोपटी जगली.

अन्य जिल्ह्यांत रोपटी जगण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा कमी होते. सर्वात कमी ५४ टक्केरोपटी नांदेड जिल्ह्यात जगली. लागवड केलेली रोपट्यांची संख्या पाहिली, तर हे प्रमाणदेखील अजिबात कमी नाही. एवढी झाडे जगली तरी दुष्काळाची छाप सोडून मराठवाडा हिरवाकंच व्हायला वेळ लागणार नाही. यंदा तर मराठवाड्यात तब्बल अडीच लाख लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे वन विभाग सांगतो आहे.

वन विभागाची अशी आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाNatureनिसर्गforest departmentवनविभाग