शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

मराठवाडा हिरवाकंच होणार

By गजानन दिवाण | Updated: July 21, 2018 12:23 IST

वन विभागाची आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

कायम दुष्काळाच्या छायेत जगणारा मराठवाडा आगामी काही वर्षांत हिरवाकंच झाला, तर नवल वाटायला नको. तशी जोरदार तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठवाड्यातील प्रशासनही झपाट्याने कामाला लागले आहे.

राज्यभरात यंदा १३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात मराठवाड्याच्या वाट्याला २ कोटी ९१ लाख ७४ हजार वृक्ष आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार मराठवाड्याने एक कोटी ७३ लाख ६४ हजार रोपट्यांची लागवडदेखील केली आहे.

महावृक्षलागवड मोहिमेत पहिल्या टप्प्यात केवळ दहाच दिवसांत मराठवाड्याने ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यातही आघाडी आहे ती रेल्वेने पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातूरची. दुष्काळाच्या झळा काय असतात, हे त्यांनीच सर्वाधिक भोगले आहे म्हणून असावे कदाचित. ३३.४६ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना या जिल्ह्याने आतापर्यंत ३५ लाख ५४ हजारांवर रोपांची लागवड केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने २७.६८ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना १६ लाख ५६ हजार रोपे लावली आहेत. जालन्याला ३६.२६ लाखांचे उद्दिष्ट असून, १२ लाख ६२ हजार रोपे लावली आहेत. बीड जिल्ह्यात ९७ टक्केवृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने केवळ ३२ टक्के वृक्षलागवड झाली आहे.

वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून १ जुलैपासून सुरू झालेली ही मोहीम ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वृक्षलागवडीत मराठवाडा उद्दिष्टपूर्ती करणार यात अजिबात शंका नाही. २०१६ मध्येदेखील राज्य सरकारने मोठी मोहीम राबविली होती. राज्यात दोन कोटी रोपटी लावण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्यात ५४ लाख १९ हजार ४६५ रोपटी लावली गेली. यातील तब्बल ७४ टक्केरोपटी जगल्याचा दावा नंतर वन विभागाने केला. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ८८ टक्केरोपे जगली. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ८७ टक्के, हिंगोलीत ८३ टक्केरोपटी जगली.

अन्य जिल्ह्यांत रोपटी जगण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा कमी होते. सर्वात कमी ५४ टक्केरोपटी नांदेड जिल्ह्यात जगली. लागवड केलेली रोपट्यांची संख्या पाहिली, तर हे प्रमाणदेखील अजिबात कमी नाही. एवढी झाडे जगली तरी दुष्काळाची छाप सोडून मराठवाडा हिरवाकंच व्हायला वेळ लागणार नाही. यंदा तर मराठवाड्यात तब्बल अडीच लाख लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे वन विभाग सांगतो आहे.

वन विभागाची अशी आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाNatureनिसर्गforest departmentवनविभाग