शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

मराठवाडा हिरवाकंच होणार

By गजानन दिवाण | Updated: July 21, 2018 12:23 IST

वन विभागाची आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

कायम दुष्काळाच्या छायेत जगणारा मराठवाडा आगामी काही वर्षांत हिरवाकंच झाला, तर नवल वाटायला नको. तशी जोरदार तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी मराठवाड्यातील प्रशासनही झपाट्याने कामाला लागले आहे.

राज्यभरात यंदा १३ कोटी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात मराठवाड्याच्या वाट्याला २ कोटी ९१ लाख ७४ हजार वृक्ष आले आहेत. ताज्या आकडेवारीनुसार मराठवाड्याने एक कोटी ७३ लाख ६४ हजार रोपट्यांची लागवडदेखील केली आहे.

महावृक्षलागवड मोहिमेत पहिल्या टप्प्यात केवळ दहाच दिवसांत मराठवाड्याने ६० टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. यातही आघाडी आहे ती रेल्वेने पाणी आणून तहान भागविणाऱ्या लातूरची. दुष्काळाच्या झळा काय असतात, हे त्यांनीच सर्वाधिक भोगले आहे म्हणून असावे कदाचित. ३३.४६ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना या जिल्ह्याने आतापर्यंत ३५ लाख ५४ हजारांवर रोपांची लागवड केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याने २७.६८ लाख वृक्षांचे उद्दिष्ट असताना १६ लाख ५६ हजार रोपे लावली आहेत. जालन्याला ३६.२६ लाखांचे उद्दिष्ट असून, १२ लाख ६२ हजार रोपे लावली आहेत. बीड जिल्ह्यात ९७ टक्केवृक्षलागवड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याने केवळ ३२ टक्के वृक्षलागवड झाली आहे.

वन विभाग, सामाजिक वनीकरण, ग्रामपंचायत आणि इतर यंत्रणांच्या माध्यमातून १ जुलैपासून सुरू झालेली ही मोहीम ३१ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यामुळे वृक्षलागवडीत मराठवाडा उद्दिष्टपूर्ती करणार यात अजिबात शंका नाही. २०१६ मध्येदेखील राज्य सरकारने मोठी मोहीम राबविली होती. राज्यात दोन कोटी रोपटी लावण्यात आली होती. त्यावेळी मराठवाड्यात ५४ लाख १९ हजार ४६५ रोपटी लावली गेली. यातील तब्बल ७४ टक्केरोपटी जगल्याचा दावा नंतर वन विभागाने केला. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ८८ टक्केरोपे जगली. त्याखालोखाल औरंगाबाद जिल्ह्यात ८७ टक्के, हिंगोलीत ८३ टक्केरोपटी जगली.

अन्य जिल्ह्यांत रोपटी जगण्याचे प्रमाण ८० टक्क्यांपेक्षा कमी होते. सर्वात कमी ५४ टक्केरोपटी नांदेड जिल्ह्यात जगली. लागवड केलेली रोपट्यांची संख्या पाहिली, तर हे प्रमाणदेखील अजिबात कमी नाही. एवढी झाडे जगली तरी दुष्काळाची छाप सोडून मराठवाडा हिरवाकंच व्हायला वेळ लागणार नाही. यंदा तर मराठवाड्यात तब्बल अडीच लाख लोकांनी या मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे वन विभाग सांगतो आहे.

वन विभागाची अशी आकडेवारीच समोर आल्यानंतर वृक्षलागवडीवर शंका कोण घेणार? आता ही झाडे नेमकी कोठे लावली? ती कुठल्या प्रजातीची होती? एकीकडे वृक्षलागवडीचे कोटीच्या कोटी उड्डाणे घ्यायची आणि त्याचवेळी रस्ताकामासह अनेक विकासकामांसाठी मोठमोठाली झाडे का तोडायची? असे अनेक प्रश्न विचारण्याची हिंमत करायची नाही. मराठवाडा हिरवाकंच होणार हे नक्की. तो केवळ कागदावर की प्रत्यक्षात हे विचारायचे नाही.

टॅग्स :MarathwadaमराठवाडाNatureनिसर्गforest departmentवनविभाग