शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

कारगिलचे नाते दृढ करणारी मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 00:20 IST

कारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे.

- संजय नहारकारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे. कारगिलमध्ये झालेले युद्ध कोणीही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. शत्रूकडून झालेला विश्वासघात आणि आक्रमण या दोन्हींवर हा जसा मिळविलेला विजय आहे तसाच त्याचा एक संदेशही आहे. याच भावनेतून सरहद संस्थेने कारगिल युद्ध प्रारंभ झाल्यानंतर लगेचच आपल्या छोट्याशा मदतकार्याला तत्परतेने प्रारंभ केला होता.मे आणि जून १९९९ मध्ये कारगिल, द्रास, बटालिक आणि मच्छिल भागातील सैनिकांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी संस्थेने यथाशक्ती केलेल्या मदतीनंतर आपले सैनिक आणि तेथील स्थानिक लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही लढाई लढले. याची टायगर हिल किंवा टोलोलिंग शिखर पाहताना जाणीव झाली. पुण्यात राहून केवळ छोटीशी मदत केल्यावरही लष्करप्रमुखापासून स्थानिक अधिकाºयांपर्यंत सर्वांनी त्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामुळे आपण केलेली मदत ही अगदीच तोकडी आहे. मात्र तेथील जनता आणि सैनिकांना दीर्घकालीन उपयोग होईल असे प्रयत्न करायला हवे याची जाणीव झाली. यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला.प्रथम नो इंडिया (ओळख भारताची) या उपक्रमांतर्गत कारगिल आणि काश्मीर भागातील मुलांना भारतातील इतर भागात भेटीसाठी आणले गेले. याचा परिणाम होत आहे असे वाटतानाच २००३ साली कारगिलचे तत्कालीन ब्रिगेडियर रवी दास्ताने यांच्या पुढाकाराने कारगिल युद्धातील १७ मुले पुण्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली. ही संख्या सध्या ३९ पर्यंत गेली आहे. यामध्ये कारगिल युद्धाची प्रथम माहिती देणाºया मेंढपाळाच्या मुलापासून शहीद सौरभ कालिया याचा मृतदेह पाकिस्तानच्या हद्दीतून आणणाºया मदतनिसाच्या मुलीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून कारगिल ही युद्धभूमी तर आहेच त्याचवेळी एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी त्या भागाचा अभ्यास करताना अनेक ठिकाणांच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती पुढे आली आणि आम्ही हरखूनच गेलो. त्यातूनच संजीव शहा एका सायकल यात्रेसाठी कारगिलला गेले होते. कारगिलच्या स्थानिक जनतेशी जोडणाºया प्रयत्नांना मॅरेथॉनसारखे क्रीडाप्रकार उपयोगी ठरू शकतात, अशा भावनेतून कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची कल्पना जन्माला आली. स्वानंद अ‍ॅडव्हेंचर, रनबडी आणि सेवक या संस्थांच्या सहकार्याने तिने मूर्त स्वरूप प्राप्त केले.जम्मू-काश्मीरची दहशतग्रस्त अशी प्रतिमा असताना शांततेचा संदेश देणाºया दुसºया कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनचे १ आणि २ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये महाराष्टÑ, गोवा, केरळ ओडिसा, सिक्कीम, कर्नाटक, बिहार, हरियाना, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील ४२ शहरांमधून ३०० पेक्षा अधिक तर कारगिल जिल्ह्याच्या विविध भागांतील २००० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्याचवेळी पॅराट्रूपर ब्रिगेडचे २५ अधिकारी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आग्रा येथून आले होते. यातील राम भगत आणि नसीब सिंग यांनी कारगिल युद्धात योगदान दिले होते. तर सर्जिकल स्ट्राइक करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर जे स्वत:ही कारगिल युद्धात जखमी झाले होते आणि सैनिकांना मदत करणाºया गुजर बकरवाल समाजाचे नेते समशेर पूंछी या सर्वांचा कारगिल गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.पुण्यातील संवाद संस्थेच्या पुढाकाराने मराठी कलाकारांनी कारगिलच्या जनतेसमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. नागरिक आणि लष्कराचे जवान यांच्या एकत्रित सहकार्यातून पार पडलेल्या या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची दखल जगभर घेतली गेली. संजीव शहा, मोहमद हमजा, अरविंद बिजवे यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या वर्षाच्या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची लगेचच तयारी सुरू झाली आहे. ही मॅरेथॉन केवळ हौशी किंवा क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारी नसून ‘जवान और अवाम एकही है मुकाम’ या घोषणेचा प्रत्यय देणारी आणि कारगिलचे नाते उर्वरित भारताशी दृढ करणारी ठरली आहे.(संस्थापक, सरहद)

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिन