शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना मनपा आयुक्त संतोष खांडेकर यांना अटक; १० लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं!
2
एकरकमी ३७५१ पहिली उचल टाका, मगच ऊसाला कोयता; राजू शेट्टी यांनी स्पष्ट केली भूमिका
3
DIGच्या घरात सापडलं घबाड, नोटा मोजण्यासाठी मागवावी लागली मशीन, CBIची मोठी कारवाई  
4
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात फोनवरून कसलीही चर्चा झाली नाही'; भारताने दावा फेटाळला, अमेरिकेच्या अध्यक्षांची 'पंचाईत'
5
बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबत अमित शाहांचं सस्पेन्स वाढवणारं विधान, नितिश कुमारांबाबत म्हणाले...
6
'स्वतःच्या अपयशांसाठी शेजाऱ्यांना दोष देणे पाकिस्तानची जुनी सवय', अफगाण-पाक संघर्षावरुन भारताचे टीकास्त्र
7
कर्मचारीच द्यायचा टिप, मग फ्लिपकार्टच्या ट्रकमधील वस्तूंवर मारायचे डल्ला, ७ जण अटकेत, २२६ मोबाईल जप्त  
8
रणजी ट्रॉफी स्पर्धेत 'जर्सी' चित्रपटाचा ट्रेलर! मुंबईकरांवर भारी पडला जम्मू-काश्मीरचा ४० वर्षीय कॅप्टन
9
डीएसएलआर कॅमेऱ्याला टक्कर देणारी ओप्पो फाइंड एक्स ९ सीरीज लॉन्च; जाणून घ्या किंमत!
10
सलग दुसऱ्या सेंच्युरीसह एलिसा हीलीनं पा़डला बांगलादेशचा बुक्का; ऑस्ट्रेलियाला मिळालं सेमीचं पहिलं तिकीट
11
Gujarat Cabinet Resignation: भाजपने गुजरातमधील सर्व मंत्र्यांचे राजीनामे का घेतले, आता पुढे काय घडणार?
12
टी-२० विश्वचषक २०२६ साठी पात्र ठरलेले सर्व २० संघ कोणते? येथे पाहा संपूर्ण यादी
13
वापरली अशी ट्रिक आणि दोन वर्षे फ्रीमध्ये ऑनलाइन ऑर्डर केलं जेवण, बिंग फुटताच...   
14
"इज्जत गेली गावाची, मग आठवण आली भावाची" एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
15
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
16
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
17
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी
18
‘गर्भवती असाल तर सुट्टी घ्या, पैसे कमावण्यासाठी येता आणि बैठकीला अनुपस्थित राहता” महिला अधिकाऱ्यावर काँग्रेसचे आमदार भडकले
19
Bogus Voter: 'त्या' घरात ८०० नव्हे, पाचच सदस्यांचे वास्तव्य; जयंत पाटील यांच्या आरोपात किती सत्यता? काय आढळलं?
20
Video - ऑनलाईन ऑर्डर केलं फूड; डिलिव्हरी बॉयची अवस्था पाहून डोकंच फिरेल, दारू पिऊन...

कारगिलचे नाते दृढ करणारी मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 00:20 IST

कारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे.

- संजय नहारकारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे. कारगिलमध्ये झालेले युद्ध कोणीही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. शत्रूकडून झालेला विश्वासघात आणि आक्रमण या दोन्हींवर हा जसा मिळविलेला विजय आहे तसाच त्याचा एक संदेशही आहे. याच भावनेतून सरहद संस्थेने कारगिल युद्ध प्रारंभ झाल्यानंतर लगेचच आपल्या छोट्याशा मदतकार्याला तत्परतेने प्रारंभ केला होता.मे आणि जून १९९९ मध्ये कारगिल, द्रास, बटालिक आणि मच्छिल भागातील सैनिकांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी संस्थेने यथाशक्ती केलेल्या मदतीनंतर आपले सैनिक आणि तेथील स्थानिक लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही लढाई लढले. याची टायगर हिल किंवा टोलोलिंग शिखर पाहताना जाणीव झाली. पुण्यात राहून केवळ छोटीशी मदत केल्यावरही लष्करप्रमुखापासून स्थानिक अधिकाºयांपर्यंत सर्वांनी त्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामुळे आपण केलेली मदत ही अगदीच तोकडी आहे. मात्र तेथील जनता आणि सैनिकांना दीर्घकालीन उपयोग होईल असे प्रयत्न करायला हवे याची जाणीव झाली. यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला.प्रथम नो इंडिया (ओळख भारताची) या उपक्रमांतर्गत कारगिल आणि काश्मीर भागातील मुलांना भारतातील इतर भागात भेटीसाठी आणले गेले. याचा परिणाम होत आहे असे वाटतानाच २००३ साली कारगिलचे तत्कालीन ब्रिगेडियर रवी दास्ताने यांच्या पुढाकाराने कारगिल युद्धातील १७ मुले पुण्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली. ही संख्या सध्या ३९ पर्यंत गेली आहे. यामध्ये कारगिल युद्धाची प्रथम माहिती देणाºया मेंढपाळाच्या मुलापासून शहीद सौरभ कालिया याचा मृतदेह पाकिस्तानच्या हद्दीतून आणणाºया मदतनिसाच्या मुलीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून कारगिल ही युद्धभूमी तर आहेच त्याचवेळी एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी त्या भागाचा अभ्यास करताना अनेक ठिकाणांच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती पुढे आली आणि आम्ही हरखूनच गेलो. त्यातूनच संजीव शहा एका सायकल यात्रेसाठी कारगिलला गेले होते. कारगिलच्या स्थानिक जनतेशी जोडणाºया प्रयत्नांना मॅरेथॉनसारखे क्रीडाप्रकार उपयोगी ठरू शकतात, अशा भावनेतून कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची कल्पना जन्माला आली. स्वानंद अ‍ॅडव्हेंचर, रनबडी आणि सेवक या संस्थांच्या सहकार्याने तिने मूर्त स्वरूप प्राप्त केले.जम्मू-काश्मीरची दहशतग्रस्त अशी प्रतिमा असताना शांततेचा संदेश देणाºया दुसºया कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनचे १ आणि २ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये महाराष्टÑ, गोवा, केरळ ओडिसा, सिक्कीम, कर्नाटक, बिहार, हरियाना, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील ४२ शहरांमधून ३०० पेक्षा अधिक तर कारगिल जिल्ह्याच्या विविध भागांतील २००० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्याचवेळी पॅराट्रूपर ब्रिगेडचे २५ अधिकारी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आग्रा येथून आले होते. यातील राम भगत आणि नसीब सिंग यांनी कारगिल युद्धात योगदान दिले होते. तर सर्जिकल स्ट्राइक करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर जे स्वत:ही कारगिल युद्धात जखमी झाले होते आणि सैनिकांना मदत करणाºया गुजर बकरवाल समाजाचे नेते समशेर पूंछी या सर्वांचा कारगिल गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.पुण्यातील संवाद संस्थेच्या पुढाकाराने मराठी कलाकारांनी कारगिलच्या जनतेसमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. नागरिक आणि लष्कराचे जवान यांच्या एकत्रित सहकार्यातून पार पडलेल्या या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची दखल जगभर घेतली गेली. संजीव शहा, मोहमद हमजा, अरविंद बिजवे यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या वर्षाच्या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची लगेचच तयारी सुरू झाली आहे. ही मॅरेथॉन केवळ हौशी किंवा क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारी नसून ‘जवान और अवाम एकही है मुकाम’ या घोषणेचा प्रत्यय देणारी आणि कारगिलचे नाते उर्वरित भारताशी दृढ करणारी ठरली आहे.(संस्थापक, सरहद)

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिन