शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
4
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
5
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
6
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
7
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
8
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
9
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
10
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
11
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
12
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
13
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
14
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
15
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
16
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
17
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
18
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
19
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
20
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
Daily Top 2Weekly Top 5

कारगिलचे नाते दृढ करणारी मॅरेथॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 00:20 IST

कारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे.

- संजय नहारकारगिलची जगभराला सध्याची ओळख आहे ती पाकिस्तानबरोबर जिंकलेल्या युद्धामुळे. कारगिलमध्ये झालेले युद्ध कोणीही भारतीय कधीच विसरू शकणार नाही. शत्रूकडून झालेला विश्वासघात आणि आक्रमण या दोन्हींवर हा जसा मिळविलेला विजय आहे तसाच त्याचा एक संदेशही आहे. याच भावनेतून सरहद संस्थेने कारगिल युद्ध प्रारंभ झाल्यानंतर लगेचच आपल्या छोट्याशा मदतकार्याला तत्परतेने प्रारंभ केला होता.मे आणि जून १९९९ मध्ये कारगिल, द्रास, बटालिक आणि मच्छिल भागातील सैनिकांना मदत करणाऱ्या स्थानिक नागरिकांसाठी संस्थेने यथाशक्ती केलेल्या मदतीनंतर आपले सैनिक आणि तेथील स्थानिक लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही लढाई लढले. याची टायगर हिल किंवा टोलोलिंग शिखर पाहताना जाणीव झाली. पुण्यात राहून केवळ छोटीशी मदत केल्यावरही लष्करप्रमुखापासून स्थानिक अधिकाºयांपर्यंत सर्वांनी त्याबद्दल ज्या भावना व्यक्त केल्या, त्यामुळे आपण केलेली मदत ही अगदीच तोकडी आहे. मात्र तेथील जनता आणि सैनिकांना दीर्घकालीन उपयोग होईल असे प्रयत्न करायला हवे याची जाणीव झाली. यासाठी सरहद संस्थेने पुढाकार घेतला.प्रथम नो इंडिया (ओळख भारताची) या उपक्रमांतर्गत कारगिल आणि काश्मीर भागातील मुलांना भारतातील इतर भागात भेटीसाठी आणले गेले. याचा परिणाम होत आहे असे वाटतानाच २००३ साली कारगिलचे तत्कालीन ब्रिगेडियर रवी दास्ताने यांच्या पुढाकाराने कारगिल युद्धातील १७ मुले पुण्यात शिक्षणासाठी दत्तक घेण्यात आली. ही संख्या सध्या ३९ पर्यंत गेली आहे. यामध्ये कारगिल युद्धाची प्रथम माहिती देणाºया मेंढपाळाच्या मुलापासून शहीद सौरभ कालिया याचा मृतदेह पाकिस्तानच्या हद्दीतून आणणाºया मदतनिसाच्या मुलीपर्यंत सर्वांचा समावेश आहे. त्यांच्या माध्यमातून कारगिल ही युद्धभूमी तर आहेच त्याचवेळी एक जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ व्हावे यासाठी त्या भागाचा अभ्यास करताना अनेक ठिकाणांच्या ऐतिहासिक संदर्भाची माहिती पुढे आली आणि आम्ही हरखूनच गेलो. त्यातूनच संजीव शहा एका सायकल यात्रेसाठी कारगिलला गेले होते. कारगिलच्या स्थानिक जनतेशी जोडणाºया प्रयत्नांना मॅरेथॉनसारखे क्रीडाप्रकार उपयोगी ठरू शकतात, अशा भावनेतून कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची कल्पना जन्माला आली. स्वानंद अ‍ॅडव्हेंचर, रनबडी आणि सेवक या संस्थांच्या सहकार्याने तिने मूर्त स्वरूप प्राप्त केले.जम्मू-काश्मीरची दहशतग्रस्त अशी प्रतिमा असताना शांततेचा संदेश देणाºया दुसºया कारगिल आंतरराष्टÑीय मॅरेथॉनचे १ आणि २ सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना समर्पित केलेल्या या मॅरेथॉनमध्ये महाराष्टÑ, गोवा, केरळ ओडिसा, सिक्कीम, कर्नाटक, बिहार, हरियाना, पश्चिम बंगाल आणि जम्मू-काश्मीर आदी राज्यांतील ४२ शहरांमधून ३०० पेक्षा अधिक तर कारगिल जिल्ह्याच्या विविध भागांतील २००० हून अधिक विद्यार्थी आणि नागरिक मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्याचवेळी पॅराट्रूपर ब्रिगेडचे २५ अधिकारी मॅरेथॉनमध्ये धावण्यासाठी आग्रा येथून आले होते. यातील राम भगत आणि नसीब सिंग यांनी कारगिल युद्धात योगदान दिले होते. तर सर्जिकल स्ट्राइक करणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर जे स्वत:ही कारगिल युद्धात जखमी झाले होते आणि सैनिकांना मदत करणाºया गुजर बकरवाल समाजाचे नेते समशेर पूंछी या सर्वांचा कारगिल गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.पुण्यातील संवाद संस्थेच्या पुढाकाराने मराठी कलाकारांनी कारगिलच्या जनतेसमोर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले. नागरिक आणि लष्कराचे जवान यांच्या एकत्रित सहकार्यातून पार पडलेल्या या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची दखल जगभर घेतली गेली. संजीव शहा, मोहमद हमजा, अरविंद बिजवे यांच्या नेतृत्वाखाली पुढच्या वर्षाच्या आंतरराष्टÑीय मॅरेथॉनची लगेचच तयारी सुरू झाली आहे. ही मॅरेथॉन केवळ हौशी किंवा क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणारी नसून ‘जवान और अवाम एकही है मुकाम’ या घोषणेचा प्रत्यय देणारी आणि कारगिलचे नाते उर्वरित भारताशी दृढ करणारी ठरली आहे.(संस्थापक, सरहद)

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिन