शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

मराठी कालिदासाची स्मृतिशताब्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:17 IST

‘मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या गीतातून महाराष्ट्राचा महिमा गाणारे थोर कवी आणि एकाहून एक सरस नाटके लिहून महाराष्ट्र सारस्वतात नाव अजरामर करणारे सिद्धहस्त लेखक राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची कालपासून सुरुवात झाली. उपमा नरसिंंहस्य। श्रीपादस्यार्थगौरवम्॥

‘मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या गीतातून महाराष्ट्राचा महिमा गाणारे थोर कवी आणि एकाहून एक सरस नाटके लिहून महाराष्ट्र सारस्वतात नाव अजरामर करणारे सिद्धहस्त लेखक राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची कालपासून सुरुवात झाली.उपमा नरसिंंहस्य। श्रीपादस्यार्थगौरवम्॥कृष्णस्य पदलालित्यम्। रामे सन्तित्रयो गुणा॥न. चिं. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर व कृ. प्र. खाडिलकर या तिघांची एकवटलेली त्रिवेणी प्रतिभा गडकरी नावाच्या सुंदर संगमावर कशी अलंकृत झाली आहे, याचे या श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. महाराष्ट्र शारदेच्या या लाडक्या पुत्राला आपल्यातून जाऊन आता शंभर वर्षे पूर्ण होतील, तरी त्यांची ‘रामरसवंती’ आजही महाराष्ट्रात स्वच्छंदपणे बागडते आहे!२६ मे १८८५ रोजी गुजरातेत नवसारी जिल्ह्यात गणदेवी मुक्कामी या रामाचा जन्म दुपारी १२ वाजता झाला. सहाव्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. थोड्याच दिवसांत धाकटे बंधू गोविंदचेही अकाली निधन झाले. यातून सावरण्यासाठी ते पुण्यात आले. नवलाची बाब म्हणजे तोपर्यंत त्यांना मराठीचा गंधही नव्हता. शिक्षण घेऊन त्यानंतर नोकरी करत असताना ते विविध नियतकालिकांतून कविता लिहू लागले. यातून मित्राच्या ओळखीने त्यांना ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’त नाट्यपदं लिहिण्याची संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि एक सोनेरी कारकीर्द आकाराला आली. उपमा, उत्प्रेक्षा, प्रास, अलंकारांनी नटलेली भरजरी भाषा आणि एक वेगळ्या प्रतीचा निर्भेळ विनोद घेऊन १९१२ मध्ये त्यांचं ‘प्रेमसंन्यास’ रंगभूमीवर अवतरलं! आणि महाराष्ट्राला राम गणेश गडकरी नावाच्या प्रतिभेचे दर्शन झालं!प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यास ही पाच नाटके, वाग्वैजयंती हे काव्य आणि विनोदी लेखन ही त्यांची साहित्यसंपदा. त्यांनी आपले कवितालेखन ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने केले, तर विनोदी लेखन ‘बाळकराम’ या नावाने. बोचºया नसलेल्या त्यांच्या अभिजात विनोदानेही एक दर्जा राखत कमालीची उंची गाठली. पहिली चार सामाजिक तर राजसंन्यास हे ऐतिहासिक नाटक होते. ‘एकच प्याला’ या नाटकाने तर पुढे लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. मराठी रंगभूमीवर अखंड भरजरी वस्त्रांत वावरलेले बालगंधर्व या नाटकात सिंधूच्या रूपात अगदी आनंदाने फाटक्या लुगड्यात प्रेक्षकांसमोर वावरले. ‘वाग्वैजयंती’च्या अभिनव वाग्विलासाने महाराष्ट्र शारदेची पूजा बांधणारा हा लखलखता कोहिनूर मराठी सारस्वतात एका विलक्षण तेजाने झळकला! आणि त्याच्या चंद्रकलेप्रमाणे सदोदित वर्धिष्णू होणाºया वाग्वैभवाने महाराष्ट्र दिपून गेला! अवघे जीवन नाट्यक्षेत्रातील वातावरणात घालविलेले गडकरी तिशीनंतर अचानक आजारी पडू लागले. हवापालटासाठी १९१८ च्या नववर्षात सावनेरला आले. प्रवासात आपले बंधू विनायकराव यांना ऐकवलेला अठरा नाटकांचा भावी संकल्प पूर्ण होणं नियतीच्या मनात नसावं. कारण सावनेरी आल्या आल्या ते अंथरुणाला खिळले!२३ जानेवारी १९१८ रोजी रात्री १ वाजता भावबंधनाचा अखेरचा प्रवेश त्यांनी पूर्ण केला आणि अवघ्या ३३ व्या वर्षी हा तेज:पुंज चंद्रमा अकस्मात मावळला. मावळताना त्याने आपल्या बौद्धिक ज्ञानाची श्रीशिल्लक महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण केली! ही श्रीशिल्लक पाहून महाराष्ट्राने त्यांना ‘मराठी रंगभूमीचा कालिदास’ म्हणून अग्रपूजेचा मान दिला. योगायोग म्हणजे या कालिदासाच्या अस्थीही अखेर कविकुलगुरू कालिदासाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामटेकच्या काव्यभूमीतच विसर्जित झाल्या! त्यांच्या नाट्य व काव्यसंपदेतून अवतरलेल्या अलौकिक भाषाप्रभुत्वाने ते आजही अजरामर आहेत.- विजय बाविस्कर vijay.baviskar@lokmat.com