शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

मराठी कालिदासाची स्मृतिशताब्दी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:17 IST

‘मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या गीतातून महाराष्ट्राचा महिमा गाणारे थोर कवी आणि एकाहून एक सरस नाटके लिहून महाराष्ट्र सारस्वतात नाव अजरामर करणारे सिद्धहस्त लेखक राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची कालपासून सुरुवात झाली. उपमा नरसिंंहस्य। श्रीपादस्यार्थगौरवम्॥

‘मंगल देशा, पवित्र देशा महाराष्ट्र देशा’ या गीतातून महाराष्ट्राचा महिमा गाणारे थोर कवी आणि एकाहून एक सरस नाटके लिहून महाराष्ट्र सारस्वतात नाव अजरामर करणारे सिद्धहस्त लेखक राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाची कालपासून सुरुवात झाली.उपमा नरसिंंहस्य। श्रीपादस्यार्थगौरवम्॥कृष्णस्य पदलालित्यम्। रामे सन्तित्रयो गुणा॥न. चिं. केळकर, श्री. कृ. कोल्हटकर व कृ. प्र. खाडिलकर या तिघांची एकवटलेली त्रिवेणी प्रतिभा गडकरी नावाच्या सुंदर संगमावर कशी अलंकृत झाली आहे, याचे या श्लोकात सुंदर वर्णन केले आहे. महाराष्ट्र शारदेच्या या लाडक्या पुत्राला आपल्यातून जाऊन आता शंभर वर्षे पूर्ण होतील, तरी त्यांची ‘रामरसवंती’ आजही महाराष्ट्रात स्वच्छंदपणे बागडते आहे!२६ मे १८८५ रोजी गुजरातेत नवसारी जिल्ह्यात गणदेवी मुक्कामी या रामाचा जन्म दुपारी १२ वाजता झाला. सहाव्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. थोड्याच दिवसांत धाकटे बंधू गोविंदचेही अकाली निधन झाले. यातून सावरण्यासाठी ते पुण्यात आले. नवलाची बाब म्हणजे तोपर्यंत त्यांना मराठीचा गंधही नव्हता. शिक्षण घेऊन त्यानंतर नोकरी करत असताना ते विविध नियतकालिकांतून कविता लिहू लागले. यातून मित्राच्या ओळखीने त्यांना ‘किर्लोस्कर नाटक कंपनी’त नाट्यपदं लिहिण्याची संधी मिळाली. त्या संधीचं त्यांनी सोनं केलं आणि एक सोनेरी कारकीर्द आकाराला आली. उपमा, उत्प्रेक्षा, प्रास, अलंकारांनी नटलेली भरजरी भाषा आणि एक वेगळ्या प्रतीचा निर्भेळ विनोद घेऊन १९१२ मध्ये त्यांचं ‘प्रेमसंन्यास’ रंगभूमीवर अवतरलं! आणि महाराष्ट्राला राम गणेश गडकरी नावाच्या प्रतिभेचे दर्शन झालं!प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन आणि राजसंन्यास ही पाच नाटके, वाग्वैजयंती हे काव्य आणि विनोदी लेखन ही त्यांची साहित्यसंपदा. त्यांनी आपले कवितालेखन ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने केले, तर विनोदी लेखन ‘बाळकराम’ या नावाने. बोचºया नसलेल्या त्यांच्या अभिजात विनोदानेही एक दर्जा राखत कमालीची उंची गाठली. पहिली चार सामाजिक तर राजसंन्यास हे ऐतिहासिक नाटक होते. ‘एकच प्याला’ या नाटकाने तर पुढे लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. मराठी रंगभूमीवर अखंड भरजरी वस्त्रांत वावरलेले बालगंधर्व या नाटकात सिंधूच्या रूपात अगदी आनंदाने फाटक्या लुगड्यात प्रेक्षकांसमोर वावरले. ‘वाग्वैजयंती’च्या अभिनव वाग्विलासाने महाराष्ट्र शारदेची पूजा बांधणारा हा लखलखता कोहिनूर मराठी सारस्वतात एका विलक्षण तेजाने झळकला! आणि त्याच्या चंद्रकलेप्रमाणे सदोदित वर्धिष्णू होणाºया वाग्वैभवाने महाराष्ट्र दिपून गेला! अवघे जीवन नाट्यक्षेत्रातील वातावरणात घालविलेले गडकरी तिशीनंतर अचानक आजारी पडू लागले. हवापालटासाठी १९१८ च्या नववर्षात सावनेरला आले. प्रवासात आपले बंधू विनायकराव यांना ऐकवलेला अठरा नाटकांचा भावी संकल्प पूर्ण होणं नियतीच्या मनात नसावं. कारण सावनेरी आल्या आल्या ते अंथरुणाला खिळले!२३ जानेवारी १९१८ रोजी रात्री १ वाजता भावबंधनाचा अखेरचा प्रवेश त्यांनी पूर्ण केला आणि अवघ्या ३३ व्या वर्षी हा तेज:पुंज चंद्रमा अकस्मात मावळला. मावळताना त्याने आपल्या बौद्धिक ज्ञानाची श्रीशिल्लक महाराष्ट्रशारदेच्या चरणी अर्पण केली! ही श्रीशिल्लक पाहून महाराष्ट्राने त्यांना ‘मराठी रंगभूमीचा कालिदास’ म्हणून अग्रपूजेचा मान दिला. योगायोग म्हणजे या कालिदासाच्या अस्थीही अखेर कविकुलगुरू कालिदासाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या रामटेकच्या काव्यभूमीतच विसर्जित झाल्या! त्यांच्या नाट्य व काव्यसंपदेतून अवतरलेल्या अलौकिक भाषाप्रभुत्वाने ते आजही अजरामर आहेत.- विजय बाविस्कर vijay.baviskar@lokmat.com