शहरं
Join us  
Trending Stories
1
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
2
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
3
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
4
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
5
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
अमेरिकेविरोधात रशिया-चीनचा खतरनाक प्लॅन; भारतासाठी धोक्याची घंटा, पुतिन-जिनपिंगचं चाललंय काय?
8
शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
9
'ओढत खोलीत घेऊन गेले, पाय पकडले अन्...', कोलकाता बलात्कार पीडितेने सांगितली आपबीती
10
'कोल्हापुरी'सारखी चप्पल विकून वादात अडकली 'प्राडा'; १ लाख रुपयांच्या किंमतीवरून झाला 'राडा'
11
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची स्पष्ट भूमिका; एकनाथ शिंदेंचं मौन, भाजपामुळे होतेय कोंडी?
12
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
13
वृद्ध महिलांना बांधून ठेवलं, पुरुषांच्या अंगावर कपडेही नाहीत! आश्रमातील धक्कादायक प्रकार उघड
14
मुलं पुढे निघून जातात, ब्रेकअपनंतर मुलींचं लग्न अवघड होतं! अलाहाबाद उच्च न्यायालयानं व्यक्त केली चिंता
15
Viral Video : ताडपत्री अन् झावळ्या बघून झोपडी समजलात का? आत वाकून बघाल तर शॉकच व्हाल!
16
Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथाच्या रथापुढे होते 'सोन्याच्या' झाडूने स्वच्छता; कोणी सुरू केली ही प्रथा? आता कोण करतं? वाचा!
17
Gold Silver Rates 27 June: सोन्या-चांदीच्या दरात आज मोठी घसरण, आता 'इतकी' झाली १० ग्राम सोन्याची किंमत
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघाताच्या चौकशीत संयुक्त राष्ट्रांची मदत घेतली जाणार नाही; भारताने प्रस्ताव फेटाळला
19
गोलंदाजांचा कहर...एकही फलंदाज टिकेना! फक्त एक फिफ्टी अन् २ दिवसांत पडल्या २४ विकेट्स!
20
कोलकाता हादरलं! लॉ कॉलेजमधील विद्यार्थीनीवर सामूहिक अत्याचार, तीन आरोपींना अटक

मराठा-दलित एकीचे प्रयत्न

By admin | Updated: September 14, 2016 23:06 IST

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती; परंतु आरोपीची ‘डीएनए’ तपासणी व इतर अनेक पुरावे जमा केले जात असल्याने विलंब लागला. अर्थात, मुख्य आरोपीला फाशीच होईल, एवढे सबळ पुरावे आम्हाला मिळत असल्याचा दावा पोलीस करीत आहेत. कायद्याच्या पातळीवर हे प्रकरण पुढे सुरु राहील. पण, या निमित्ताने मराठा-दलित या दोन समाजात निर्माण होणारा विसंवाद संपणार कसा, हा प्रश्न आहे. मराठा समाजात प्रचंड असंतोष दिसतो आहे. येत्या २३ तारखेस नगरलाही मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. कोपर्डी घटनेमुळे मोर्चांची सुरुवात झाल्याने राज्यातील सर्वाधिक गर्दी येथील मोर्चाला जमेल, अशा पद्धतीने नियोजन सुरु आहे. मोर्चांचे वैशिष्ट्य हे की त्यांना कुणीही एक नेता नाही. सामूहिक नेतृत्व आहे. शिवाय हे ‘मूक’ मोर्चे आहेत. गत आठवड्यात नगरला झालेल्या बैठकीत सर्व आमदार देखील व्यासपीठाच्या खाली बसले होते. कुठल्याही प्रसिद्धी पत्रकात नेत्यांची नावे टाकली जात नाहीत. नेत्यांनी स्वत:चा बॅनर लावायचा नाही, स्वत:चे नाव वापरायचे नाही, अशी अचारसंहिता ठरली आहे. शेकडो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. महिला, डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या घटकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या निमित्ताने मराठा समाज प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे तंत्र म्हणूनही हा मोर्चा एक अभ्यासाचा विषय आहे. मोर्चाचे नियोजन आज तरी शांततेत सुरु आहे. मात्र, याच दिवशी दलित संघटनांनी सद्भावना रॅली काढण्याची घोषणा केल्याने प्रशासनासमोर पेच आहे. दोन समाजघटक एकाच दिवशी रस्त्यावर आले तर तणाव वाढू शकतो. अर्थात काही दलित नेत्यांनी याबाबत समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आपल्या प्रश्नांवर मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्या विरोधात दलितांनी प्रतिमोर्चा काढणे गैर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. काही स्थानिक दलित नेतेही याच मताचे आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, हा एक विषय वगळता आम्हीही मराठा समाजासोबत आहोत, असेही दलित नेत्यांनी जाहीर केले आहे. मराठा संघटनांनीही अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची नव्हे तर या कायद्याचा गैरवापर रोखण्याची आमची मागणी असल्याचा खुलासा केला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकाचा आदर करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. रामदास आठवले यांनी शिर्डीत सात आॅक्टोबरला ‘मराठा-ऐक्य’ दलित परिषद घेण्याचे ठरविले आहे. या परिषदेत मराठा नेत्यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे नगरपासून दुभंगलेली मने पुन्हा सांधायला येथूनच सुरुवात होईल, अशी आशा अनेकांना आहे. सर्व जाती संघटीत होत असताना मराठा समाजात आजपर्यंत एकी दिसत नव्हती. ती या निमित्ताने दिसली. मराठा समाजातही प्रचंड विषमता आहे. ठराविक लोकांकडेच राजकीय सत्ता आहे. ते नात्यागोत्याचे पाहातात. सर्वसामान्य मराठा वर्गासमोर शेतीपासून मुलांच्या शिक्षणापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. शेतमालाला भाव नाही, नोकऱ्या नाहीत. ती खदखद तरुणांत आहे. कोपर्डीच्या निमित्ताने हा सगळा असंतोष उफाळून आला आहे. ही अस्वस्थता आता मराठा नेत्यांसह सर्वांनाच समजून घ्यावी लागेल. मराठा समाजाच्या एकीकरणाने खुद्द मराठा नेतेही हादरलेले दिसतात. त्यामुळेच ते संघटनांच्या बैठकांत सामील होत आहेत. मोर्चांसाठी देणग्या देण्याची त्यांची तयारी आहे. आजपर्यंत या नेत्यांनीही समाजाला गृहीत धरले. या मोर्चांतून कदाचित नवीन नेतेही उभे राहतील. हा दलित-मराठा असा वाद नाही, त्याला अनेक पदर आहेत. - सुधीर लंके