शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

मराठा-दलित एकीचे प्रयत्न

By admin | Updated: September 14, 2016 23:06 IST

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचे आरोपपत्र या आठवड्यात न्यायालयात दाखल होईल, असे सांगितले जाते. महिनाभरात आरोपपत्र दाखल करण्याची घोषणा झाली होती; परंतु आरोपीची ‘डीएनए’ तपासणी व इतर अनेक पुरावे जमा केले जात असल्याने विलंब लागला. अर्थात, मुख्य आरोपीला फाशीच होईल, एवढे सबळ पुरावे आम्हाला मिळत असल्याचा दावा पोलीस करीत आहेत. कायद्याच्या पातळीवर हे प्रकरण पुढे सुरु राहील. पण, या निमित्ताने मराठा-दलित या दोन समाजात निर्माण होणारा विसंवाद संपणार कसा, हा प्रश्न आहे. मराठा समाजात प्रचंड असंतोष दिसतो आहे. येत्या २३ तारखेस नगरलाही मराठा क्रांती मोर्चा निघत आहे. कोपर्डी घटनेमुळे मोर्चांची सुरुवात झाल्याने राज्यातील सर्वाधिक गर्दी येथील मोर्चाला जमेल, अशा पद्धतीने नियोजन सुरु आहे. मोर्चांचे वैशिष्ट्य हे की त्यांना कुणीही एक नेता नाही. सामूहिक नेतृत्व आहे. शिवाय हे ‘मूक’ मोर्चे आहेत. गत आठवड्यात नगरला झालेल्या बैठकीत सर्व आमदार देखील व्यासपीठाच्या खाली बसले होते. कुठल्याही प्रसिद्धी पत्रकात नेत्यांची नावे टाकली जात नाहीत. नेत्यांनी स्वत:चा बॅनर लावायचा नाही, स्वत:चे नाव वापरायचे नाही, अशी अचारसंहिता ठरली आहे. शेकडो व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार झाले आहेत. महिला, डॉक्टर, वकील अशा वेगवेगळ्या घटकांच्या बैठका घेतल्या जात आहेत. या निमित्ताने मराठा समाज प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्र येत असल्याचे दिसत आहे. आंदोलनाचे तंत्र म्हणूनही हा मोर्चा एक अभ्यासाचा विषय आहे. मोर्चाचे नियोजन आज तरी शांततेत सुरु आहे. मात्र, याच दिवशी दलित संघटनांनी सद्भावना रॅली काढण्याची घोषणा केल्याने प्रशासनासमोर पेच आहे. दोन समाजघटक एकाच दिवशी रस्त्यावर आले तर तणाव वाढू शकतो. अर्थात काही दलित नेत्यांनी याबाबत समजूतदारपणाची भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आपल्या प्रश्नांवर मोर्चा काढण्याचा अधिकार आहे. त्या विरोधात दलितांनी प्रतिमोर्चा काढणे गैर असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. काही स्थानिक दलित नेतेही याच मताचे आहेत. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करा, हा एक विषय वगळता आम्हीही मराठा समाजासोबत आहोत, असेही दलित नेत्यांनी जाहीर केले आहे. मराठा संघटनांनीही अ‍ॅट्रॉसिटी रद्द करण्याची नव्हे तर या कायद्याचा गैरवापर रोखण्याची आमची मागणी असल्याचा खुलासा केला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकाचा आदर करणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. रामदास आठवले यांनी शिर्डीत सात आॅक्टोबरला ‘मराठा-ऐक्य’ दलित परिषद घेण्याचे ठरविले आहे. या परिषदेत मराठा नेत्यांना निमंत्रित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे नगरपासून दुभंगलेली मने पुन्हा सांधायला येथूनच सुरुवात होईल, अशी आशा अनेकांना आहे. सर्व जाती संघटीत होत असताना मराठा समाजात आजपर्यंत एकी दिसत नव्हती. ती या निमित्ताने दिसली. मराठा समाजातही प्रचंड विषमता आहे. ठराविक लोकांकडेच राजकीय सत्ता आहे. ते नात्यागोत्याचे पाहातात. सर्वसामान्य मराठा वर्गासमोर शेतीपासून मुलांच्या शिक्षणापर्यंतचे अनेक प्रश्न आहेत. शेतमालाला भाव नाही, नोकऱ्या नाहीत. ती खदखद तरुणांत आहे. कोपर्डीच्या निमित्ताने हा सगळा असंतोष उफाळून आला आहे. ही अस्वस्थता आता मराठा नेत्यांसह सर्वांनाच समजून घ्यावी लागेल. मराठा समाजाच्या एकीकरणाने खुद्द मराठा नेतेही हादरलेले दिसतात. त्यामुळेच ते संघटनांच्या बैठकांत सामील होत आहेत. मोर्चांसाठी देणग्या देण्याची त्यांची तयारी आहे. आजपर्यंत या नेत्यांनीही समाजाला गृहीत धरले. या मोर्चांतून कदाचित नवीन नेतेही उभे राहतील. हा दलित-मराठा असा वाद नाही, त्याला अनेक पदर आहेत. - सुधीर लंके