शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

CoronaVirus: कोरोना विजयानंतर बरेच काही बदलून जाईल!

By विजय दर्डा | Updated: April 20, 2020 05:36 IST

कडक सुरक्षेनंतर आता आरोग्य व स्वच्छता प्राधान्य असेल

- विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूहकाळाच्या ओघात सर्व काही बदलून जाते, असा फार जुना समज आहे; पण इतिहास असे सांगतो की, काही घटना जग बदलून टाकतात किंवा जगाला नाईलाजाने बदलावे लागते. अशा घटना मानवनिर्मित असोत वा नैसर्गिक, पण वास्तव असे आहे की, अशा घटनांनंतर जीवनातील अग्रक्रम व गरजाही बदलून जातात. त्यातून काही नव्या गोष्टींचा उदय होतो. सध्याच्या कोरोना महामारीच्या संकटानंतरही असेच बरेच काही बदलून जाणार आहे. अमेरिकेतील ९/११ व मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यांनंतर जसे बरेच काही बदलले तसेच काहीसे आताही होणार आहे.

दि. ११ सप्टेंबर २००१ पूर्वी जगातील कोणत्याही विमानतळावर आजच्याइतकी कडक सुरक्षा व्यवस्था नसायची. सुरक्षा तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रे वापरली जात नव्हती की, तपासणीसाठी लांब रांगही नसायची; पण ९/११च्या दहशतवादी हल्ल्याने अमेरिकेतच नव्हे तर संपूर्ण जगातच नागरी विमान वाहतुकीचे चित्र बदलूून गेले. तो हल्ला झाल्यानंतर अमेरिकेने सर्वप्रथम त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यावर लक्ष केंद्रित केले व नंतर हे काम कायमस्वरूपी दक्षतेने व्हावे यासाठी ‘ट्रान्स्पोर्टेशन सिक्युरिटी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ हा स्वतंत्र विभागच सुरू केला. सुरक्षित प्रवासासाठी अधिक कडक नियम तयार केले गेले. जगातील इतर देशांनीही नंतर त्याचे अनुकरण केले. अमेरिकेखेरीज इस्रायल, रशिया, फ्रान्स व चीन या देशांनी याबाबतीत खूप प्रगती केली आहे. आता तर विमानतळांवरील सुरक्षा तपासणी थक्क व्हावे इतकी कसून करणारी यंत्रे आहेत. तुमच्या बॅगेत ठेवलेल्या पेनमध्ये शाईऐवजी अन्य काही भरलेले असेल, तर अशी बॅग ही यंत्रे क्षणार्धात ओळखून बाजूला काढतात. अनेक विमाने हवेत उडत असताना आकाशातून वीज पडली तरी ती निष्प्रभ करण्याची क्षमता असलेली करण्यात आली आहेत. काही विमाने तर क्षेपणास्त्राचा हल्लाही परतवू शकतील एवढी अत्याधुनिक आहेत.९/११चा आणखी एक असा परिणाम झाला की, मोठमोठ्या कंपन्यांनीही कडक सुरक्षेचे जेवढे काही उपाय योजणे शक्य होते ते २४ तासांत लागू केले. त्यानंतर तर अमेरिकेचा ‘सिक्युरिटी’ हा एक स्वतंत्र उद्योग बनला व तो खूप फोफावला. अजूनही त्या उद्योगाची सद्दी सुरूच आहे. २०१५ ते २०१९ या काळात ‘सिक्युरिटी उद्योगा’चा विकासदर अडीच टक्क्यांहून जास्त राहिला आहे.
आता जरा भारताविषयी बोलू. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी महाभयंकर दहशतवादी हल्ला झाला आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा चोख बंदोबस्त करणे, हे सर्वोच्च प्राधान्य असायला हवे, याची आपल्याला सर्वप्रथम जाणीव झाली. आपल्या गुप्तचर यंत्रणा अत्यंत सक्षम असायला हव्यात. सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत कडक नजर ठेवण्याची व्यवस्था हवी, हेही प्रकर्षाने जाणवले. त्यानंतर भारतात अनेक महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी ‘क्लोज्ड सर्किट कॅमेरे’ बसविण्याचे काम वेगाने केले गेले. दूरवरूनही अत्यंत सुस्पष्ट चित्रे टिपणारे (हाय रेझोल्युशन कॅमेरे) व अन्य अनेक प्रकारची अत्याधुनिक सुरक्षा साधने बनविणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात उतरल्या. आज हा उद्योग मोठ्या तेजीत सुरू आहे. त्यांचा वार्षिक विकासदर २० ते २५ टक्क्यांच्या दरम्यान आहे. दरमहा २० लाख सिक्युरिटी कॅमेऱ्यांची विक्री होत असते. गेल्या तीन वर्षांत भारतातील सुरक्षा व निगराणी साधनांच्या विक्रीची वार्षिक उलाढाल ८ हजार २०० कोटींवरून ११ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यावर्षी ही उलाढाल २० हजार कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे; परंतु सुरक्षेच्या बाबतीत सर्वोत्तम कामगिरी चीनची आहे. तेथे प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी कानाकोपऱ्यात कॅमेरे लावलेले आहेत. ‘फेस डिटेक्शन टेक्नॉलॉजी’ने चीन प्रत्येक नागरिकाच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवू शकतो.
सांगायचे तात्पर्य असे की, आताही कोरोनानंतर अशाच प्रकारे आपले आयुष्य बरंच बदलून जाईल. आपली आताची स्थिती पाहता भारतात तर बरेच बदल घडू शकतात. कोरोनावर विजय मिळविल्यानंतर ‘हेल्थ अ‍ॅण्ड हायजिन’ हे आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. व्यक्तिगत आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता याला आपण कित्येक वर्षे महत्व दिले नाही, हे खरंच दुर्दैव आहे. सांगितले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण सन २०१८ मध्ये भारतात एकूण ‘जीडीपी’च्या फक्त १.२८ टक्के खर्च सार्वजनिक आरोग्यावर केला गेला. त्याआधी ही रक्कम जेमतेम एक टक्का असायची. अमेरिकेसारख्या विकसित देशातही सार्वजनिक आरोग्यावरील खर्चाचे प्रमाण आजही ‘जीडीपी’च्या ४.६ टक्के एवढेच आहे. अमेरिकेची ‘जीडीपी’ आपल्या तुलनेत कितीतरी पटींनी जास्त आहे.कोरोनामुळे आरोग्याच्या बाबतीत जे भीतीचे वातावरण तयार झाले आहे, ते पाहता नजीकच्या भविष्यात भारतात आरोग्यसेवा चांगल्या प्रतीच्या व सामान्यांना परवडणाºया होतील, अशी आशा करूया. अशी अपेक्षा करूया, सरकारी रुग्णालयांची अवस्था सुधारेल व अतिदक्षता कक्षात जशी स्वच्छता असते, तशीच संपूर्ण रुग्णालयात पाहायला मिळेल. सार्वजनिक स्वच्छेतेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्य सरकारांनी आधीपासून लढा उभारला आहे. आता बदललेल्या परिस्थितीत सामान्य माणूस या स्वच्छतेच्या मोहिमेत सक्रियतेने सहभागी होईल व व्यक्तिगत तसेच सार्वजनिक स्वच्छतेविषयी जागृती नक्कीच वाढेल. नागरिकांची घरे व कामाची ठिकाणे आरोग्यसंपन्न कशी ठेवावीत, कोणती काळजी घ्यावी व काय करायचे टाळावे, यासंबंधीची मार्गदर्शिकाही सरकारकडून काढली जाऊ शकेल. ‘हेल्थ अ‍ॅण्ड हायजिन’ हा एक मोठा उद्योग उदयास येईल. साबण, सॅनिटायझर, मास्क व काही औषधांच्या मागणीत खूप मोठी वाढ होईल.
कोरोना कालखंडानंतर आणखीही काही बदल होतील. किचन व कॅटरिंगचे स्वरूप बदलेल. हायजिनवर सर्वांत जास्त लक्ष दिले जाईल. लोक योग व व्यायामाकडे वळतील. शिक्षण संस्थांमध्येही बदल होतील. देशात ऑनलाईन शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर अंगीकार केला जाईल. विमान प्रवासाची पद्धतही बदलेल. मास्कचा वापर सार्वत्रिक व सार्वकालिक होईल. कदाचित काही गोष्टी आपल्या आयुष्यातून कायमच्या हद्दपारही होतील. अगदीच घनिष्ट नाते असल्याशिवाय आपण सहजपणे कोणाचीही गळाभेट घेणार नाही. शेकहँडच्याऐवजी प्रणाम व नमस्ते ही स्वागताची नवी रीत बनेल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या