शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

सुर-असुरांचा निर्माता

By admin | Updated: June 21, 2014 11:11 IST

आपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये सुर आणि असुर, देव आणि दानव, चांगले आणि वाईट, अशा दोन टोकांच्या गोष्टी असतातच. आजकालच्या कथाच कशाला, अगदी लोककथा जरी पाहिल्या, तरी त्यातही एखादे दुष्ट पात्र असतेच.

अध्यात्मवेणुगोपाल धूत, चेअरमन व्हिडिओकॉन गु्रपआपल्या कुठल्याही गोष्टीमध्ये सुर आणि असुर, देव आणि दानव, चांगले आणि वाईट, अशा दोन टोकांच्या गोष्टी असतातच. आजकालच्या कथाच कशाला, अगदी लोककथा जरी पाहिल्या, तरी त्यातही एखादे दुष्ट पात्र असतेच. त्याशिवाय त्या कथेची रंगतच वाढत नाही. आपल्या मुलांना गोष्टी सांगतानाही एखाद्या परीला एखादी चेटकीण त्रास देत असल्याचे आपण सांगतोच. सिंंड्रेलाला तिची सावत्र आई छळते, तेव्हा मुलांना त्या सावत्र आईच्या रूपात राक्षसच दिसत असतो. नायिका रूपा-गुणांची खाण असते आणि मग सावत्र आई, सासू, नणंद अशा रूपात एखादे दुष्ट पात्र कथेत शिरते तेव्हाच कथेला रंगत चढते. हल्लीच्या टीव्ही मालिकांमध्ये, म्हणूनच पावलोपावली खलनायकी थाटाची पात्रे वावरत असतात.अगदी देवादिकांच्या पौराणिक कथा घेतल्या, तरी त्यांना त्रास देणारी दुष्ट पात्रे असतातच. ही पात्रे कधी असुराच्या रूपात असतात, तर कधी संतापी ऋषी बनून येतात. शकुंतलेच्या प्रेमकथेत कोपिष्ट विश्वामित्र येतात, तेव्हाच त्या प्रेमकथेला रंगत येते. रामायणात कैकेयीच नसती तर पुढचे रामायण घडलेच नसते. हे देव-दानवांचे युद्ध ऐकताना, देवांचा विजय होणार, हे माहीत असूनही आपला श्वास अखेरपर्यंत रोखला जातो. असुरांचा पराभव करण्यासाठी देवांनाही कपटाची, युक्त्यांची, हिकमतींची मदत घ्यावी लागते. संघर्षात थरार असतो आणि हा संघर्ष सुष्ट-दुष्टांचा, देव-दानवांचा, नायक-खलनायकांचा असेल, तर तो पाहण्याची मजा काही वेगळीच असते.मनुष्यप्राण्याच्या सुरुवातीच्या काळात संघर्ष अटळ होता. निसर्ग रौद्र होता, अफाट होता, उग्रही होता आणि माणूस त्या मानाने अगदीच क्षुल्लक जीव होता. त्या काळी माणूस क्षुद्र आणि परावलंबी असला, तरी आपली बुद्धी आणि अनुभवाच्या जोरावर तो जीवसृष्टीमध्ये आपले वेगळे स्थान सिद्ध करण्याच्या तयारीत होता. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करीत होता आणि भीतीवर विजय मिळवू इच्छित होता.पंचमहाभूतांशी असा सामना करीत असतानाच तो त्यांनाही वश करू पाहत होता. वेळप्रसंगी त्यांची नक्कलही करीत होता. रोजच्या जगण्यासाठी संघर्ष करताना तो याच पंचमहाभूतांच्या खेळातून नवी ऊर्जा मिळवत होता.त्याला निसर्गाचे भयही वाटत होते आणि या भयातून मुक्त होण्यासाठी पुन्हा तो निसर्गाचीच मदत घेत होता. निसर्गातच त्याला देवत्वही सापडत होते आणि दानवत्वही सापडत होते. माणसाने आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर निसर्गातल्या लौकिक गोष्टींमधूनच अलौकिक गोष्टींचे चित्र रंगवले. त्यातूनच त्याने देव आणि दानव या संकल्पना निर्माण केल्या. त्यांच्या संघर्षाची वर्णने केली आणि देवांचा विजयही रंगवला. नृत्य, नाट्य, साहित्य यासारख्या कलांमधून त्याने देवदानवांचा संघर्ष रंगवला. यातूनच संस्कृतीचा विकास झाला आणि सर्व कलाही विकसित झाल्या. माणूसच देवांचाही निर्माता आहे आणि दानवांचाही आहे. देव-दानव या संकल्पनाच मानवी आहेत.