शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

‘मनोहारी’ सल्ला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:25 IST

एखाद्या व्यक्तीच्या वा मान्यवराच्या जवळ जाण्यासाठी, त्याला खूश करण्यासाठी किंवा त्याची मर्जी संपादन करण्यासाठी पुष्पगुच्छ हा महत्त्वाचा दुवा ठरत असतो.

एखाद्या व्यक्तीच्या वा मान्यवराच्या जवळ जाण्यासाठी, त्याला खूश करण्यासाठी किंवा त्याची मर्जी संपादन करण्यासाठी पुष्पगुच्छ हा महत्त्वाचा दुवा ठरत असतो. स्वागत हा त्यामागील वरकरणी हेतू केवळ नाममात्र. वाढदिवस, यश-निवड, राजकीय नेत्यांपासून आमदार-खासदार, मंत्र्यांच्या स्वागतासाठीच नव्हे; तर कुणाची भेट घ्यायची झाली तरी लोक पुष्पगुच्छ घेऊनच निघतात. वाढदिवस-विवाह समारंभातील फुलांचा अवाजवी वापर तर वेगळाच. केवळ स्वागताच्या नावाखाली किती फुलांचा चुराडा होत असेल, याचा हिशेब न केलेलाच बरा. यामुळे पर्यावरणाचे नुकसान होते आणि कचºयाच्या प्रमाणात वाढ होते असा निष्कर्ष काढून गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ‘सरकारी कार्यालयांनी कुणालाच सोहळ्यावेळी पुष्पगुच्छ देऊ नये’ असा फतवा काढला आहे. ‘पुष्पगुच्छ द्याल तर शिक्षा करू’ असा दमही गोव्यातील सरकारी कर्मचाºयांना दिला आहे. निमित्त होते, पर्यावरणविषयक सिनेमा महोत्सवाचे. कार्यक्रम शासकीय नसतानादेखील आयोजकांनी मुख्यमंत्र्यांना सुखावण्यासाठी मोठा पुष्पगुच्छ दिला. त्यामुळे व्यथित झालेल्या पर्रीकरांनी ‘निदान पर्यावणाचा आग्रह धरणाºयांनी तरी फुले वाया घालवू नयेत किंवा कचºयाची निर्मिती करू नये’ असा घरचा आहेर दिला. याच व्यासपीठावरून सरकारी कार्यालयाकडून पुष्पगुच्छ न देता केवळ एक फूल देऊन स्वागत केले जावे असे परिपत्रकच मुख्यमंत्र्यांनी जारी केले आहे. यातील अतिशयोक्ती अथवा गमतीचा भाग बाजूला ठेवला तर पर्रीकरांचा हा सल्ला तसा ‘मनोहारी’च वाटतो. उठसूठ कुणाच्याही स्वागतासाठी पुष्पगुच्छांचा वापर करण्याऐवजी केवळ एक फूल देऊन पर्यावरणाचे रक्षण करता येत असेल तर केवळ गोवा राज्यच नव्हे; इतर राज्यांनीही हा पायंडा पाडणे त्यांच्या पत्थ्यावरच पडू शकेल. पर्रीकरांचा हा सल्ला अन्य राजकारणी मंडळींनी झेलावा आणि आपापल्या पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत पाझरत ठेवला तर तो पर्यावरणासाठी पूरकच ठरू शकेल. पुष्पगुच्छ वा फूल दोन्ही समानच, त्यामागील भावना तेवढी महत्त्वाची असते. पर्रीकरांच्या या ‘मनोहारी’ सल्ल्याचे साºयांनी पुष्पगुच्छ न देता आचरणात आणून स्वागत केले किती बरे होईल!