शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आय ॲम फ्री, बट नॉट अव्हेलेबल... एका स्नेहाचे स्मरण!

By विजय दर्डा | Updated: May 10, 2023 07:37 IST

मला आठवते, कवी ग्रेस यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, सन्मान असे सारे काही टांगलेले ! ते म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’

डॉ. विजय दर्डा, चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह

माणिक सीताराम गोडघाटे म्हणजेच कवी ग्रेस यांचा बुधवारी ८६ वा जन्मदिन. ते जाऊन अकरा वर्षे झाली. पण, त्यांच्या आठवणी आजही मनात रुंजी घालतात. त्यांची पहिली भेट अजूनही चांगली आठवते. विवेक रानडे यांच्या सोबत मी ग्रेस यांच्या घरी पहिल्यांदा गेलो. दारावर दोन पाट्या दिसल्या. पहिली - फ्लॅट फॉर सेल, बट नॉट फॉर जंटलमेन आणि दुसरी- आय ॲम फ्री बट नॉट अव्हेलेबल ! दुसऱ्या पाटीबद्दल अधिक कुतूहल होते. विचारले तर म्हणाले, ‘ही पाटी तुमच्यासाठी नाही. पण, मीच काय इतरही कुणी कलावंत, कवी-लेखक, विचारवंत रिकामे दिसले तरी तसे ते नसतात. त्यांचे म्हणून काम सुरूच असते. तेव्हा, ते बाजारगप्पा मारण्यासाठी रिकामेच आहेत, असे समजून येणाऱ्यांसाठी ही पाटी आहे.’

- हे केवळ ग्रेस यांच्याबद्दलच होत नसते. एखाद्याभाेवती प्रसिद्धीचे वलय तयार झाले की, हौसे, नवसे, गवसे लोक त्या वलयापोटी त्यांच्याकडे जातात. ग्रेस त्याबद्दल फटकळ म्हणावे इतके स्पष्टवक्ते होते. त्यांच्या घरात एक वठलेले झाड होते. त्यावर पदके, ओळखपत्रे सारे काही टांगलेले. म्हणायचे, ‘मी जो काही आहे, तो या झाडावर आहे.’

‘लोकमत’ला काही गोष्टी योगायोगाने लाभल्या. त्यापैकी एक म्हणजे नागपुरात लोकमत भवनजवळ राहणारी थोर माणसे. अशा सान्निध्यासोबतच ती माणसे संस्थेच्या रोजच्या व्यवहारात सहभागी झाली तर आपोआप त्यांचे वलय संस्थेभोवतीही तयार होते. कवी अनिल म्हणजे आत्माराव रावजी देशपांडे व त्यांच्या पत्नी कुसुमावती यांचे घर रामदासपेठेत ‘लोकमत’पासून हाकेच्या अंतरावर. रस्त्याच्या पलीकडे धंतोलीत  ग्रेस व सुरेश भट यांची घरे. कवी अनिलांच्या वार्धक्याच्या काळात लोकमत बाल्यावस्थेत, फारतर किशोरावस्थेत होता. सुरेश भट मात्र प्रारंभापासून लोकमतशी जुळलेले. ते लोकमतमध्ये नियमित लिहायचे. पण, महत्त्वाचे म्हणजे आधी ते अमरावतीला लोकमतचे जिल्हा प्रतिनिधीही होते. ग्रेस थोडे अलिप्त राहणारे. स्वत:हून वृत्तपत्रांकडे न जाणारे. इतकेच काय, पण नेहमीच्या कला-साहित्याच्या कार्यक्रमांकडेही न फिरकणारे. आमच्या भेटी व्हायला लागल्या आणि मी त्यांना ‘दीपोत्सव’ या लोकमतच्या दिवाळी अंकाचे अतिथी संपादक बनण्याचे निमंत्रण दिले. त्यांनी विचारले, ‘मी कविता करणारा, ललित लिहिणारा माणूस, मला ते संपादन वगैरे कसे जमेल? त्याऐवजी मी तुम्हाला पन्नास कविता देतो’. मग मी विनम्रपणे १९७१ ते ७४पर्यंत त्यांनी केलेल्या विदर्भ साहित्य संघाचे ‘युगवाणी’ व नंतर मुंबईच्या रायटर्स सेंटरच्या ‘संदर्भ’ द्वैमासिकाच्या संपादनाचा संदर्भ दिला. ते तयार झाले. लिखाणासाठी बैठक मारावी तसे त्यांनी किशोर कुलकर्णी, विवेक रानडे यांच्यासोबत अत्यंत मन लावून अंकाचे काम केले. २००७ सालच्या दीपोत्सवावर त्यांच्या संपादनाची अमीट छाप होती आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रेस यांच्या एकवीस कविता हा त्या नितांत सुंदर अंकाचा मेरुमणी होता.

पहिल्याच कवितासंग्रहाला ‘संध्याकाळच्या कविता’ नाव देणारे, दुर्बोध शिक्का मारला गेलेल्या गूढ-गर्भित कविता लिहिणारे ग्रेस नेमके कसे आहेत, हा प्रश्न त्यांच्या हयातीत चर्चेत होता आणि आताही आहे. अनेकजण म्हणतात तसे ते कुणात न मिसळणारे माणूसघाणे, एककल्ली, फटकळ होते का? त्यांना जवळून पाहिले, अनुभवले असल्यामुळे मी नक्की सांगू शकतो की, ते तसे  नव्हते. मैत्री जपणारे होते. नागपुरात अनेकांशी त्यांचे आयुष्यभर मित्रत्वाचे संबंध होते. आमचा प्रदीर्घकाळ पत्रव्यवहार चालला. मला लिहिलेल्या प्रत्येक पत्राची प्रत ते विवेक रानडे यांना पाठवायचे. कारण काय? - तर ज्यांच्यामुळे मैत्री झाली, त्यांनाही मैत्रीचा व्यवहार समजावा.

आयुष्यात त्यांनी दु:खाचे अनेक पदर अनुभवले.. ते दु:ख ते अखेरपर्यंत विसरले नाहीत. त्यांच्या मोठ्या भावाच्या निधनावेळी आम्ही सांत्वनासाठी गेलो तेव्हा ते शांत बसून होते. म्हणाले, ‘बाप गेला तेव्हाही गेलो नव्हतो. ज्याने कधी मुलगा मानला नाही, त्याच्या मृत्यूचा काय शोक करायचा? मी मरणाला व तोरणाला जाणे कधीच बंद केले आहे’.

बालपणीच्या दु:खाने त्यांच्या मनावर इतक्या खोल जखमा केल्या होत्या. त्यांचे बालपण कष्टात गेले. आईच्या अकाली मृत्यूमुळे त्या कष्टावर मायेची पाखरही राहिली नाही. हालअपेष्टा सहन करून शिक्षण घेतले. पुढे  अलौकिक प्रतिभेने त्यांच्या आयुष्यातील उणिवांवर मात केली. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात काही विशेष असलाच तर तो दु:ख गोंजारण्याचा नव्हता तर प्रतिभेचा होता. आयुष्यभर वाट्याला येणारे सारे दु:ख कमी वयातच भोगून झाले असल्यामुळे त्यापुढे आपले घर, आपले लिखाण, आपले आयुष्य आपल्याला हवे तसेच जगायचे, हे त्यांनी ठरवून टाकले होते आणि अखेरपर्यंत ते तसेच राहिले... त्यांना विनम्र आदरांजली!