शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मनाचिये गुंथी - रंग माणसांचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:21 IST

माणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात.

- प्रल्हाद जाधवमाणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात. मात्र माणसांचे रंग किती, याची अधिकृत यादी कोणी तयार केलेली दिसत नाही. ती करता येईल असेही वाटत नाही. शेक्सपिअरने आपल्या ३६ नाट्यकृतींमधून मनुष्य स्वभावाचे सारे नमुने टिपले आहेत, असे म्हणतात. पण या मताशी कदाचित शेक्सपिअरही सहमत झाला नसता. त्याच्या लेखनात आध्यात्मिक विचारांचा अभाव आहे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलेच आहे. तात्पर्य काय, तर माणसाच्या रंगांची मोजदाद करता येणे अवघड आहे.एखाद्या माणसाला आपण सरड्यासारखे रंग बदलणारा, अशी उपमा देतो. प्रत्यक्षात हा सरड्याचा अपमान आहे. कारण मातकट, लाल, पिवळा, हिरवा अशा चार-पाच छटा सोडल्या तर त्या पलीकडे सरड्याला रंग बदलता येत नाहीत. माणूस मात्र असंख्य रंग धारण करू शकतो. इतके की त्या रंगांचे माणसाला नामकरणही करता येऊ शकत नाही. सरडा संकटाच्या वेळी आणि तेही स्वसंरक्षणार्थ रंग बदलतो. माणूस मात्र त्याच्या मनात येईल तेव्हा आणि सोईनुसार रंग बदलताना दिसतो. प्रसंगी, तो मी नव्हेच असे म्हणत आणखी एखादा रंग दाखवतो. कधी आपल्या रंग बदलण्याच्या करामतीचा अभिमान बाळगत, रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा असे म्हणायलाही मोकळा असतो.एखाद्या माणसाकडून अपेक्षाभंग झाला की, त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असे आपण म्हणतो. केसाने गळा कापणारी, पाठीत खंजीर खुपसणारी, आश्वासने देऊन फसवणारी, विविध आमिषे दाखवून भुलवणारी सारीच माणसे कोणता ना कोणता रंग धारण करीत असतात. काही रंग गडद तर काही हलके, काही साधे तर काही विषारी असतात. काही रंग पुसट होत जातात तर काहींचे डाग आयुष्यभर जात नाहीत. रंगांपासून कुणाचीच सुटका नाही. कोळशाच्या खाणीत काम करणाºया माणसाला जसे काळ्या रंगाशी जुळवून घ्यावे लागते तसेच प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रंगाचा सामना करावाच लागतो. प्रेम, वात्सल्य, भक्तीचेही सरळ साधे रंग असतात. यातील आपला रंग कोणता हे जाणून घ्यायचे झाले तर त्यासाठी मनाचा आरसा स्वच्छ, लखलखीत ठेवणे आवश्यक असते, पण त्यावरही बºयाचदा धूळ बसलेली असते !