शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

मनाचिये गुंथी - रंग माणसांचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:21 IST

माणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात.

- प्रल्हाद जाधवमाणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात. मात्र माणसांचे रंग किती, याची अधिकृत यादी कोणी तयार केलेली दिसत नाही. ती करता येईल असेही वाटत नाही. शेक्सपिअरने आपल्या ३६ नाट्यकृतींमधून मनुष्य स्वभावाचे सारे नमुने टिपले आहेत, असे म्हणतात. पण या मताशी कदाचित शेक्सपिअरही सहमत झाला नसता. त्याच्या लेखनात आध्यात्मिक विचारांचा अभाव आहे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलेच आहे. तात्पर्य काय, तर माणसाच्या रंगांची मोजदाद करता येणे अवघड आहे.एखाद्या माणसाला आपण सरड्यासारखे रंग बदलणारा, अशी उपमा देतो. प्रत्यक्षात हा सरड्याचा अपमान आहे. कारण मातकट, लाल, पिवळा, हिरवा अशा चार-पाच छटा सोडल्या तर त्या पलीकडे सरड्याला रंग बदलता येत नाहीत. माणूस मात्र असंख्य रंग धारण करू शकतो. इतके की त्या रंगांचे माणसाला नामकरणही करता येऊ शकत नाही. सरडा संकटाच्या वेळी आणि तेही स्वसंरक्षणार्थ रंग बदलतो. माणूस मात्र त्याच्या मनात येईल तेव्हा आणि सोईनुसार रंग बदलताना दिसतो. प्रसंगी, तो मी नव्हेच असे म्हणत आणखी एखादा रंग दाखवतो. कधी आपल्या रंग बदलण्याच्या करामतीचा अभिमान बाळगत, रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा असे म्हणायलाही मोकळा असतो.एखाद्या माणसाकडून अपेक्षाभंग झाला की, त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असे आपण म्हणतो. केसाने गळा कापणारी, पाठीत खंजीर खुपसणारी, आश्वासने देऊन फसवणारी, विविध आमिषे दाखवून भुलवणारी सारीच माणसे कोणता ना कोणता रंग धारण करीत असतात. काही रंग गडद तर काही हलके, काही साधे तर काही विषारी असतात. काही रंग पुसट होत जातात तर काहींचे डाग आयुष्यभर जात नाहीत. रंगांपासून कुणाचीच सुटका नाही. कोळशाच्या खाणीत काम करणाºया माणसाला जसे काळ्या रंगाशी जुळवून घ्यावे लागते तसेच प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रंगाचा सामना करावाच लागतो. प्रेम, वात्सल्य, भक्तीचेही सरळ साधे रंग असतात. यातील आपला रंग कोणता हे जाणून घ्यायचे झाले तर त्यासाठी मनाचा आरसा स्वच्छ, लखलखीत ठेवणे आवश्यक असते, पण त्यावरही बºयाचदा धूळ बसलेली असते !