शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - रंग माणसांचे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:21 IST

माणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात.

- प्रल्हाद जाधवमाणसे अनेक रंगांची असतात. रंग म्हणजे स्वभाव. स्वभाव हे रंगाचे द्योतक आहे. अर्थात रंग म्हणजे स्वभावच. आपल्याला सात रंग माहीत असतात. मूळ रंग तर चारच आहेत. ते एकमेकात कमी-अधिक प्रमाणात मिसळत नेले की रंगाच्या असंख्य छटा निर्माण होतात. केवळ हिरवा हा एक रंग घेतला तरी त्याच्या सुमारे ६० छटा आढळून येतात. मात्र माणसांचे रंग किती, याची अधिकृत यादी कोणी तयार केलेली दिसत नाही. ती करता येईल असेही वाटत नाही. शेक्सपिअरने आपल्या ३६ नाट्यकृतींमधून मनुष्य स्वभावाचे सारे नमुने टिपले आहेत, असे म्हणतात. पण या मताशी कदाचित शेक्सपिअरही सहमत झाला नसता. त्याच्या लेखनात आध्यात्मिक विचारांचा अभाव आहे, असे विंदा करंदीकरांनी म्हटलेच आहे. तात्पर्य काय, तर माणसाच्या रंगांची मोजदाद करता येणे अवघड आहे.एखाद्या माणसाला आपण सरड्यासारखे रंग बदलणारा, अशी उपमा देतो. प्रत्यक्षात हा सरड्याचा अपमान आहे. कारण मातकट, लाल, पिवळा, हिरवा अशा चार-पाच छटा सोडल्या तर त्या पलीकडे सरड्याला रंग बदलता येत नाहीत. माणूस मात्र असंख्य रंग धारण करू शकतो. इतके की त्या रंगांचे माणसाला नामकरणही करता येऊ शकत नाही. सरडा संकटाच्या वेळी आणि तेही स्वसंरक्षणार्थ रंग बदलतो. माणूस मात्र त्याच्या मनात येईल तेव्हा आणि सोईनुसार रंग बदलताना दिसतो. प्रसंगी, तो मी नव्हेच असे म्हणत आणखी एखादा रंग दाखवतो. कधी आपल्या रंग बदलण्याच्या करामतीचा अभिमान बाळगत, रंगुनी रंगात सा-या रंग माझा वेगळा असे म्हणायलाही मोकळा असतो.एखाद्या माणसाकडून अपेक्षाभंग झाला की, त्याने आपले रंग दाखवायला सुरुवात केली असे आपण म्हणतो. केसाने गळा कापणारी, पाठीत खंजीर खुपसणारी, आश्वासने देऊन फसवणारी, विविध आमिषे दाखवून भुलवणारी सारीच माणसे कोणता ना कोणता रंग धारण करीत असतात. काही रंग गडद तर काही हलके, काही साधे तर काही विषारी असतात. काही रंग पुसट होत जातात तर काहींचे डाग आयुष्यभर जात नाहीत. रंगांपासून कुणाचीच सुटका नाही. कोळशाच्या खाणीत काम करणाºया माणसाला जसे काळ्या रंगाशी जुळवून घ्यावे लागते तसेच प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या रंगाचा सामना करावाच लागतो. प्रेम, वात्सल्य, भक्तीचेही सरळ साधे रंग असतात. यातील आपला रंग कोणता हे जाणून घ्यायचे झाले तर त्यासाठी मनाचा आरसा स्वच्छ, लखलखीत ठेवणे आवश्यक असते, पण त्यावरही बºयाचदा धूळ बसलेली असते !