शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

मंडईची पुण्याई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 05:09 IST

पुणे हे नुसते एखाद्या शहराचे नाव निश्चितच नाही. कारण पुलंनी म्हटलं, त्यानुसार नुसतं पुण्यात राहायला येऊन पुणेरी होता येत नाही.

पुणे हे नुसते एखाद्या शहराचे नाव निश्चितच नाही. कारण पुलंनी म्हटलं, त्यानुसार नुसतं पुण्यात राहायला येऊन पुणेरी होता येत नाही. पुणेरी व्हायचंच असेल तर कंबर कसून तयार करावी लागेल आणि पुण्यातील काही गोष्टींविषयी नुसता नाही तर 'जाज्वल्य' अभिमान असावा लागेल. पुण्यातील पर्वती, कसबा गणपती, बालगंधर्व रंगमंदिर अशी पुणेकरांच्या अभिमानाची अनेक ठिकाणं. या पंक्तीत अगदी मानानं विराजमान होईल असा या पुण्याचा मानबिंदू म्हणजे, महात्मा फुले मंडई. शारदा - गणेश आणि दगडुशेठ हलवाई या प्रसिध्द गणपतींच्या मधोमध अगदी कोंदणासारखी शोभून दिसणारी मंडई हे नुसतं भाजी मिळण्याचं ठिकाण नाही तर पुणेकर अभिमानानं ज्याच्याविषयी आवर्जून सांगतील अशी जागा आहे.५ आॅक्टोबर १८८६ रोजी पुणे महानगरपालिकेने ड्युक आॅफ कॅनॉट व लॉर्ड रे यांच्या हस्ते या मंडईचे उदघाटन केले. आज त्या मंडईचे १३१ व्या वर्षात पदार्पण होत असताना या वास्तुचा आणि त्या अनुषंगाने तेथील गौरवशाली इतिहास, रुजलेली संस्कृती, सद्यस्थिती, आणि नव्याने असलेल्या समस्या यांचा वेध घेणे उचित ठरेल.ही ऐतिहासिक वास्तू देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची साक्षीदार आहे. लोकमान्य टिळकांनी ‘काळ’कर्ते शि.म.परांजपे यांच्या साथीने विदेशी कपड्यांंची होळी याच मंडईच्या रस्त्यावर केली होती. अनेक सामाजिक प्रश्नांचे लढे येथूनच सुरु झाले. आजही गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्यापासून होते.यशवंराव चव्हाण, आचार्य अत्रे अशा दिग्गजांच्या भाषणांचे स्वर मंडईच्या भिंतींनी कानात साठवून ठेवले आहेत. या परिसराला 'मंडई विद्यापीठ' असेही म्हटले जाते. कारण नवख्या कार्यकर्त्यांना खरे धडे इथेच मिळतात. कालपरवापर्यंत मंडईतल्याच एखाद्या कट्ट्यावर रात्री-अपरात्री गप्पा मारत बसलेले पुण्यातले नामवंत राजकारणी दिसत असत. चार एकर जागेत विस्तारलेल्या मंडईत भाजीपाल्याचे सुमारे ९०० गाळे आहेत. मंडईतून फेरफटका मारणे ही हजारो पुणेकरांच्या आवडीची गोष्ट असून खरेदीचा आत्मानंद प्रत्येक पिढीत टिकून आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत गर्दी आणि वर्दळ असली तरी महिलांना फिरताना असुरक्षितता कधीच जाणवत नाही. याच मंडईत एक रुपयात झुणका भाकर सुरू होती. त्याचेच विस्तारीत रुप युती शासनाच्या स्वस्त झुणका भाकर केंद्रात दिसून आले. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, खाद्यसंस्कृती अशी नानाविध वैशिष्ट्ये भाजीपाल्याच्या जोडीने रंगणारे हे एकमेव ठिकाण असावे. सतत जाग असणाऱ्या मंडईत अपरात्री कुणी आले तरी त्याला नाश्त्यासाठी एखादे हॉटेल उघडे नक्की मिळते. एखाद्या निराश्रित पांथस्थाला रात्रीचा आसराही देते ती मंडईच! वाढत्या नागरीकरणाने मात्र मंडईचा श्वास कोंडला गेला आहे. अतिक्रमण हा पालिकेपुढचा चिंतेचा विषय आहे. अनेकदा अतिक्रमणे हटवूनही ती पुन्हा तयार होतात. तुळशीबागेच्या रस्त्यापासूनच रस्त्याच्या दुतर्फा बसणारे विक्रेते बाबू गेनू चौकापर्यंत आणि शिवाजी रस्त्याच्या पल्याडच्या अंतर्गत रस्त्यांवरही तळ ठोकून असतात. बुरुड गल्ली ते नव्या विष्णु चौकापर्यंत त्यांची लगबग असते. मंडईच्या मुख्य वास्तुलगतच्या रस्त्यावरचे अतिक्रमण हटवून महानगरपालिकेने बसथांबे उभारले, पण ही वरवरची मलमपट्टी होय. ऐतिहासिक घटना घडामोडींच्या साक्षीदार असलेल्या मंडईचे जतन आणि संवर्धन खरोखर महत्त्वाचे आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे केंद्र असलेल्या या मंडईला नुसत्या रंगरंगोटीने झळाळी देऊन भागणार नाही. ही वास्तु, तिचे आगळेवेगळेपण आणि तेथील संस्कृती हे सारे संचितासारखे जपायला हवे. त्यासाठी या मंडईविषयी आस्था, प्रेम, जिव्हाळा असणाऱ्या पुणेकरांचाच एक दबावगट निर्माण व्हायला हवा. तेव्हाच हा पुणेरी अस्मितेचा वारसा जपला जाईल.- विजय बाविस्कर