शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

मंडईची पुण्याई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2016 05:09 IST

पुणे हे नुसते एखाद्या शहराचे नाव निश्चितच नाही. कारण पुलंनी म्हटलं, त्यानुसार नुसतं पुण्यात राहायला येऊन पुणेरी होता येत नाही.

पुणे हे नुसते एखाद्या शहराचे नाव निश्चितच नाही. कारण पुलंनी म्हटलं, त्यानुसार नुसतं पुण्यात राहायला येऊन पुणेरी होता येत नाही. पुणेरी व्हायचंच असेल तर कंबर कसून तयार करावी लागेल आणि पुण्यातील काही गोष्टींविषयी नुसता नाही तर 'जाज्वल्य' अभिमान असावा लागेल. पुण्यातील पर्वती, कसबा गणपती, बालगंधर्व रंगमंदिर अशी पुणेकरांच्या अभिमानाची अनेक ठिकाणं. या पंक्तीत अगदी मानानं विराजमान होईल असा या पुण्याचा मानबिंदू म्हणजे, महात्मा फुले मंडई. शारदा - गणेश आणि दगडुशेठ हलवाई या प्रसिध्द गणपतींच्या मधोमध अगदी कोंदणासारखी शोभून दिसणारी मंडई हे नुसतं भाजी मिळण्याचं ठिकाण नाही तर पुणेकर अभिमानानं ज्याच्याविषयी आवर्जून सांगतील अशी जागा आहे.५ आॅक्टोबर १८८६ रोजी पुणे महानगरपालिकेने ड्युक आॅफ कॅनॉट व लॉर्ड रे यांच्या हस्ते या मंडईचे उदघाटन केले. आज त्या मंडईचे १३१ व्या वर्षात पदार्पण होत असताना या वास्तुचा आणि त्या अनुषंगाने तेथील गौरवशाली इतिहास, रुजलेली संस्कृती, सद्यस्थिती, आणि नव्याने असलेल्या समस्या यांचा वेध घेणे उचित ठरेल.ही ऐतिहासिक वास्तू देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची साक्षीदार आहे. लोकमान्य टिळकांनी ‘काळ’कर्ते शि.म.परांजपे यांच्या साथीने विदेशी कपड्यांंची होळी याच मंडईच्या रस्त्यावर केली होती. अनेक सामाजिक प्रश्नांचे लढे येथूनच सुरु झाले. आजही गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीची सुरुवात मंडईतील लोकमान्यांच्या पुतळ्यापासून होते.यशवंराव चव्हाण, आचार्य अत्रे अशा दिग्गजांच्या भाषणांचे स्वर मंडईच्या भिंतींनी कानात साठवून ठेवले आहेत. या परिसराला 'मंडई विद्यापीठ' असेही म्हटले जाते. कारण नवख्या कार्यकर्त्यांना खरे धडे इथेच मिळतात. कालपरवापर्यंत मंडईतल्याच एखाद्या कट्ट्यावर रात्री-अपरात्री गप्पा मारत बसलेले पुण्यातले नामवंत राजकारणी दिसत असत. चार एकर जागेत विस्तारलेल्या मंडईत भाजीपाल्याचे सुमारे ९०० गाळे आहेत. मंडईतून फेरफटका मारणे ही हजारो पुणेकरांच्या आवडीची गोष्ट असून खरेदीचा आत्मानंद प्रत्येक पिढीत टिकून आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत गर्दी आणि वर्दळ असली तरी महिलांना फिरताना असुरक्षितता कधीच जाणवत नाही. याच मंडईत एक रुपयात झुणका भाकर सुरू होती. त्याचेच विस्तारीत रुप युती शासनाच्या स्वस्त झुणका भाकर केंद्रात दिसून आले. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा, खाद्यसंस्कृती अशी नानाविध वैशिष्ट्ये भाजीपाल्याच्या जोडीने रंगणारे हे एकमेव ठिकाण असावे. सतत जाग असणाऱ्या मंडईत अपरात्री कुणी आले तरी त्याला नाश्त्यासाठी एखादे हॉटेल उघडे नक्की मिळते. एखाद्या निराश्रित पांथस्थाला रात्रीचा आसराही देते ती मंडईच! वाढत्या नागरीकरणाने मात्र मंडईचा श्वास कोंडला गेला आहे. अतिक्रमण हा पालिकेपुढचा चिंतेचा विषय आहे. अनेकदा अतिक्रमणे हटवूनही ती पुन्हा तयार होतात. तुळशीबागेच्या रस्त्यापासूनच रस्त्याच्या दुतर्फा बसणारे विक्रेते बाबू गेनू चौकापर्यंत आणि शिवाजी रस्त्याच्या पल्याडच्या अंतर्गत रस्त्यांवरही तळ ठोकून असतात. बुरुड गल्ली ते नव्या विष्णु चौकापर्यंत त्यांची लगबग असते. मंडईच्या मुख्य वास्तुलगतच्या रस्त्यावरचे अतिक्रमण हटवून महानगरपालिकेने बसथांबे उभारले, पण ही वरवरची मलमपट्टी होय. ऐतिहासिक घटना घडामोडींच्या साक्षीदार असलेल्या मंडईचे जतन आणि संवर्धन खरोखर महत्त्वाचे आहे. सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय चळवळीचे केंद्र असलेल्या या मंडईला नुसत्या रंगरंगोटीने झळाळी देऊन भागणार नाही. ही वास्तु, तिचे आगळेवेगळेपण आणि तेथील संस्कृती हे सारे संचितासारखे जपायला हवे. त्यासाठी या मंडईविषयी आस्था, प्रेम, जिव्हाळा असणाऱ्या पुणेकरांचाच एक दबावगट निर्माण व्हायला हवा. तेव्हाच हा पुणेरी अस्मितेचा वारसा जपला जाईल.- विजय बाविस्कर