शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

मनाचिये गुंथी - कट्टा

By admin | Updated: January 9, 2017 00:34 IST

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी.

समाज सरोवर आहे की नदी, तो अखंड पाझर आहे की गटार, तो पवित्र तीर्थ आहे की डिस्टील्ड केलेलं कृत्रिम पाणी. खूप प्रश्न पाडलेत या समाजाने. सभ्यता जागविलेला जमाव म्हणजे समाज किंवा संवेदना माळलेला जमाव, असेही म्हणता येईल. ठरावीक कारणाने जमतो तोही समाजच असतो. स्मशानात जमलेली माणसं त्या त्या जातीचा समाजच असतो. ज्ञानेश्वरांनी पसायदानात एक शब्द वापरला, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. ही मांदियाळी सज्जन माणसांचा समुदायच असतो. वर्षानुवर्षे हे आपल्यावर संस्कारित झालंय. हा समाज ज्या एका जागेवर जमतो ते भले पटांगण असो, सभागृह असो, छोटा हॉल असो, लगेच त्या जागेला विचारांचे एक वेगळे वलय प्र्राप्त होते. पण जागा बदलली की हेतू बदलतात. उदा. पार्टीचं कार्यालय आणि कट्टा. कट्टा म्हटलं की सगळंच बदलतं. माणसांचा वयोगट बदलतो. विचार बदलतात. भाषा बदलते. एरवी जे असभ्य, अश्लील म्हणून डोळे मोठे करून बघितलं जातं ते एकदम रुटीनचं किंबहुना आवडीचं, नेहमीचं होतं. समाजात पडद्यामागील शब्द, भाषा, स्तर, संबंध एकदम मोकळे होतात. जात येते ती शिवी म्हणून. घर येतं ते बोअर कोंडवाडा म्हणून. आई-बाबा म्हातारी-बाप होतात. यार भंकस नुस्ती, पकवतात रे बोलून बोलून. हे बघा, कुठलीच भीडभाड न ठेवता बोललं पाहिजे. ही थिअरी आणि नियम इथले. इथली भाषा आणि चर्चा घरापर्यंत जाऊच द्यायची नाही. फळ चोरून खाल्ल्यानंतर कुणाला कळू नये म्हणून मुलगा तोंड स्वच्छ धुतो. पुसतो. हात धुतो घाईने चड्डीला पुसतो. पण नेमके होते काय की चड्डीला पुसलेले हात आईला कळतात. कारण ठराविक भागच ओला दिसतो. तसे काहीसे होते. चुकून मित्र घाईने घरी येतो. डोकं भेंगाळलेला, तो त्याच्या परवलीच्या भाषेत मित्राला हाक मारतो. शिवाय भ ची बाराखडी जोडूनच. आजोबा दारात येतात. मित्र बावरतो. क्षणभर त्याची बोबडी वळते. आपले संदर्भ ह्यांना कळले तर? आजोबा हसतात म्हणतात, ये बाळा आहे तो घरात! आजोबा एका हास्याने भाषा सुधारतात. खरं तर पुन्हा प्रश्न! आधीची मुलाची भाषा चांगली होती की आताची.खरं तर दोन्ही एका गटाला संमत असलेले शब्द दुसऱ्या वयाला पचत नाहीत, पटत नाहीत, पण त्यांचा रोष उमटतही नाही. स्वीकारायला हवे, आजोबांचे सरोवर झालेले. त्यामुळे दगड टाकला की ढवळणारच सारे. पण तरण्या पोरांची खळखळ नाही. ते त्या वयाची भाषा बोलतात. राग, वैताग, विद्रोह आणि प्रेमही व्यक्त करतात. नकळत तो समाजच वेगळा होतो. मग आजोबाही उठतात. हातात काठी घेऊन त्यांच्या कट्ट्यावर येतात. त्यातल्या त्यात तरुण म्हाताऱ्याला डोळा मारतात. बायकोचा डोळा चुकवून थोडी मिठाई खाल्ल्याचे सांगतात. पलीकडे कट्ट्यावर वडापाव शिळा होता रे म्हणून घमासान शिव्यायुद्ध चालू असते. एकंदर समाजाचे दोन्ही घटकच! एक धट्टाकट्टा दुसरा मठ्ठाकट्टा!किशोर पाठक