शहरं
Join us  
Trending Stories
1
भल्या भल्यांना नाही जमले ते आज एलन मस्कनी करून दाखविले; ६०० अब्ज डॉलर संपत्ती असलेले जगातील पहिले व्यक्ती बनले
2
व्होडाफोनने सर्वांवर कडी केली! फोन हरवला, चोरी झाला... रिचार्जसोबतच २५००० चा विमा, ते ही ६१ रुपयांत...
3
२५ जणांच्या राखरांगोळीस जबाबदार असणारे लुथरा बंधू भारताच्या ताब्यात; थायलंडहून आज दुपारी आणले जाणार
4
“पृथ्वीराज चव्हाण हे जगातील सर्वांत मोठे भविष्यवेत्ते आहेत”; भाजपा नेत्यांचा पलटवार
5
शेअर बाजारात कंपनी आधीच बॅन, आता चर्चेतील 'या' फिनफ्ल्युएन्सरवर SEBI ची मोठी कारवाई; प्रकरण काय?
6
"मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई, मुंबई वाचवायला..."; संजय राऊतांचा भाजपा-शिंदेसेनेवर निशाणा
7
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
8
Crime: लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं गाडीत बसवलं, दारू पाजली, निर्जनस्थळी नेऊन जिवंत जाळलं! 
9
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
10
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
12
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
13
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
14
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
15
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
16
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
17
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
18
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
19
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
20
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
Daily Top 2Weekly Top 5

खरेच माणूस पराधीन आहे?  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 13:23 IST

मिलिंद कुलकर्णी  पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा...गदिमांची ही नितांतसुंदर आणि अर्थगर्भ रचना आहे. अलिकडच्या काही घटना ...

मिलिंद कुलकर्णी 

पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा...गदिमांची ही नितांतसुंदर आणि अर्थगर्भ रचना आहे. अलिकडच्या काही घटना बघीतल्या तर प्रश्न पडतो की, खरेच आपण पराधीन आहोत काय? कोल्हापूर, सांगलीतील महापुराने हा समृध्द परिसर होत्याचा नव्हता झाला, जायकवाडी धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला, मात्र संपूर्ण मराठवाडा कोरडा आहे, गिरणा धरण निम्म्याहून अधिक भरले, पण पारोळा, भडगाव तालुक्यातील छोटे, मध्यम प्रकल्प कोरडेठाक आहेत. अगदी परवा धुळे जिल्ह्यात झालेल्या अपघातात १३ निष्पाप प्रवासी जीव गमावून बसले. हे सगळे पाहिल्यावर संवेदनशील माणसाचे मन प्रश्नांच्या भुंग्यांनी पोखरले जाते. माहिती-तंत्रज्ञानाचे युग आहे, आम्ही चंद्रावर यान पाठवतो, तरीही आम्हाला हवामानाचे, पर्जन्यमानाचे अचूक भाकीत वर्तवता येत नाही. पाश्चात्य देशात आठवडाभराचे भाकीत वर्तवले जाते तसेच अगदी पुढील चार तासांविषयी अंदाज सांगितला जातो. मग आमच्याकडे का होत नाही? पराधीन फक्त आम्हीच आहोत, पाश्चात्य मंडळी नाही? दोष कुणाचा आहे मग? भारतासारख्या विभिन्न हवामान, वातावरण असलेल्या देशात कुठे अतिवृष्टी तर कुठे दुष्काळ अशी स्थिती आपण अनुभवत आहोत. पर्यावरण संतुलन, वृक्षारोपण,   नदी जोड हे विषय केवळ राष्टÑीय परिषदा, चर्चासत्र, संशोधन पत्रिका, वर्तमानपत्रांमधील लेख, दूरचित्रवाहिन्यांवरील चर्चा, शासकीय धोरण आणि परिपत्रकांपुरती मर्यादीत राहिलेले आहेत. मोजक्या पाच-दहा व्यक्ती, संस्था, गावे यांच्या ‘आदर्श’ कथा आम्ही वर्षानुवर्षे ऐकत, वाचत राहतो. पण ही जनचळवळ होत नाही. तरीही दोष ना कुणाचा?आपात्कालीन स्थिती हाताळणारी यंत्रणा हा खूप चिंताजनक विषय आहे. भूकंप, महापूर, वादळ या स्थितीत तातडीने मदत आणि बचाव कार्य आवश्यक असते. महसूल विभागातर्फे दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस दल, गृहरक्षक दल यांच्यासह संबंधित शासकीय कार्यालय प्रमुखांची बैठक घेऊन ‘आपात्कालीन नियोजन, आराखडा’ तयार केला जातो. पण ही बैठक आणि त्यातील उपाययोजना या केवळ कागदावर आणि शासकीय उपचार म्हणून केल्या जातात. महसूल मंडळाच्या पातळीवर पर्जन्यमापके, तापमापके बसविली जातात. मंडळाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक अशा गावपातळीवरील शासकीय यंत्रणेला या उपकरणांची माहिती आहे?  देखभाल, दुरुस्तीविषयी प्राथमिक कल्पना आहे? तहसील कार्यालयांमध्ये बोटी, जीवरक्षक प्रणाली असे साहित्य उपलब्ध आहे, त्यांची स्थिती कशी आहे, हे कधी जिल्हाधिकाºयांनी जाऊन पाहिले आहे? गावपातळीपासून तर राजधानीपर्यंत कागदे रंगविण्याचे काम अतीशय उत्तमपणे चालते. वास्तवापासून किती योजने दूर आहोत, हे माहित असूनही त्याकडे कानाडोळा केला जात असेल तरी आम्ही म्हणायचे दोष ना कुणाचा? महामार्गांच्या सभोवताली असलेल्या हॉटेलांमध्ये दारु सहज उपलब्ध होते. १०-१२ तास गाडी चालवून थकलेला, शिणलेला गाडी चालक नशेच्या आहारी जातो. विश्रांती न घेता त्याच अवस्थेत वाहन रस्त्यावर आणतो आणि निमगूळसारखे अपघात घडतात. निष्पाप जिवांचा हकनाक बळी जातो. दहा लाखांची मदत देऊन माणूस परत येणार आहे काय? महामार्गापासून २०० मीटर अंतरावर दारु दुकाने हलवावी, असा आदेश न्यायालयाने देताच शासकीय आणि राजकीय पातळीवरील उडालेली तारांबळ आपण गेल्यावर्षी पाहिली. महामार्गाचे राज्य मार्ग, राज्यमार्गाचे गाडरस्ते एका रात्रीतून झाले. ‘गतिमान प्रशासन’ पहिल्यांदा अनुभवाला मिळाले. मग हे प्रशासन मद्यपी चालकाला रस्त्यावर येण्यापासून का रोखत नाही? टोल घ्यायला, अवजड वाहनाकडून दंड वसूल करायला यंत्रणा व्यवस्थित काम करते, पण गैरप्रकार रोखायला, माणसाचे जीव वाचवायला आम्हाला का वेळ नाही. जळगावातील मेहरुण तलावात लागोपाठच्या दोन दिवसात तीन तरुण बुडाले. गेल्यावर्षी या तलावाचे सुशोभीकरण केल्याचे जाहीर झाले. निम्मी संरक्षक भिंत बांधली गेली. रस्ते डांबरी केले, पण उरलेली भिंत बांधली गेली नाही. सुरक्षारक्षक, जीवरक्षक तेथे तैनात नाही. मग अशावेळी माणूस पराधीन आहे असे कसे म्हणता येईल? 

टॅग्स :Jalgaonजळगाव