शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

मन मोठं कर

By admin | Updated: July 18, 2016 05:40 IST

लहानपणी आजी बाबांना सारखं म्हणायची, जाऊ दे ना भाऊ, तू मन मोठं कर, बाळ लहान आहे.

लहानपणी आजी बाबांना सारखं म्हणायची, जाऊ दे ना भाऊ, तू मन मोठं कर, बाळ लहान आहे. बापूही लहान आहे. मग बाबा चिडायचे. सगळा समजूतदारपणाचा ठेका मी घेतलाय का? मीच सारखं सर्वांना समजून घ्यायचं का? एकदा ज्येष्ठतेचा शिक्का कपाळावर मारला की समजून, सोशिकता, सायुज्यता, समपिता हे सारे गुण पटापट चिकटविले जातात, इतके की ते अवगुण वाटू लागतात. खरंतर कुणीच पूर्ण समंजस वा असमंजस नसतो. वेळकाळ पाहून जो वागतो तो यशस्वी समंजस माणूस ! बाबांचा काळ सरतो. ते वृद्धपणी पश्चात्तापाचा कोळसा उगाळत राहतात. मुलांवर, बायकोवर राग काढत राहतात. त्यांच्या तरुणपणी त्यांच्यावर नाइलाजाने प्रेम (?) करणारी आई त्यांचं ऐकत ऐकत खंगत जाते. आणि त्यांच्या म्हातारपणी नवऱ्याला तिच्या लग्नापासूनचे सगळे हिशेब ऐकवते. तेव्हा बाबाही खोकत तिला समजावतात. जाऊ दे, मन मोठं कर. पोरानातवांना जीव लाव. ऐकत ऐकत मुलगा मोठा होतो. त्याला ताई असेल तर सोसण्याची सवय आणि भार तो सर्व ताईवर सोपवतो आणि मोठा झाल्यावर जाण ठेवलीच तर जाहीरपणे ताईने मला आईसारखं सांभाळलं म्हणत राहतो. म्हणजे लागला ताईचा निकाल ! लग्नापूर्वी बाबा भाऊंचा धाकदपटशा आणि नंतर नवऱ्याचा! ह्या नादात मुलांचे अतोनात लाड करायचे आणि ते पुढे परंपरेने लाथा मारू लागले की टिपं गाळत बसायचे ! एखादी स्त्री मुक्तीवाली चवताळून म्हणेलही हे सर्व आम्ही बदललंय ! आताची स्त्री मुक्त आहे, तिचं विश्व मोठ्ठं आहे ! मान्य ! पण मनाचं काय? ते होतं का मोठं? मन काही फुगा आहे का हवा भरून फुगवायला! शेवटी आयुष्य धक्केचपाटे खात घालवावं लागतं. तो शाळा-कॉलेजात मेणघुण्या, अबोल असला तर सारेजण अधिकार गाजवायला मोकळे. मग त्याची इच्छा असो नसो त्याला मन मोठं करावं लागतं! अशावेळी शांत विचारी बायको, प्रेयसी मिळालीच तर त्याचं नशीब चांगलं. ताणतणाव, शिक्षण, नोकरी, धंदा ह्यातील असुरक्षितता, शरीराचे सर्व पातळ्यांवर होणारे व्यापारीकरण ह्यातून मुली खूप सावध होताहेत. त्यातून शुभ्र फुलांची सोबत कशी मिळवायची हे त्यांना कळतंय. तसे धोके आहेतच. वाट निसरडीच आहे. दोघांचेही पाय घसरणारच आहेत. तेव्हा सांभाळायला निसर्ग आणि मोठ्या मनाचे पर्यावरण असलेली माणसं मिळाली की तो प्रवास सुंदर होतोच. कळत नाही मन कधी मोठं होतं ते! तो तरुणपणी वारंवार मन मोठं कर हे वाक्य ऐकत ऐकवत राहतो. पण एकदा काय करायचं हे नक्की असेल ना तर मनही हवं तसं लहानमोठं होत राहतं. जगणं विविध वाटा वळणांवर खुणावत राहतं. तेव्हा या जगण्यानेच पूर्वापार मन मोठं कर हे वाक्य सटवाईच्या लेखणीत भरून ठेवलंय. ते आजोबांनी ऐकलं, बाबा बोलले, आपण गुणगुणतो आणि मुलांनाही ऐकवू या ! मुलं कदाचित म्हणणार नाहीत पण वागताना मन मोठं होतच राहणार !किशोर पाठक