शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आजचा अग्रलेख: दुष्काळ हवा कोणाला? नैसर्गिक संकटाची अपेक्षा कोणी स्वत:हून करतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 09:40 IST

चालू हंगामात पावसाने लहरीपणा दाखविल्याने राज्याच्या अनेक भागात दुष्काळसदृश परिस्थिती

महाराष्ट्र राज्य संकटकाळातून वाटचाल करीत आहे. मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे. त्या दरम्यान महाराष्ट्राचा बराचसा ग्रामीण भाग दुष्काळसदृश परिस्थितीने वेढला गेला आहे. आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याने शासन, प्रशासन आणि समाजाचे सर्व लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. चालू हंगामात पावसाने लहरीपणा दाखविल्याने पेरण्या उशिरा झाल्या. सुमारे अठरा टक्के पाऊस कमी झाला असला तरी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा सुमारे २० ते ४५ टक्के पाऊस कमी झाला आहे. नगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सांगली आणि सातारा आदी जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामावर परिणाम झाला. जून अखेरपर्यंत पाऊस न झाल्याने पेरण्या अपुऱ्या आणि उशिरा झाल्या. सोयाबीन, बाजरी, ज्वारी, कापूस आदी पिकांच्या उत्पादनात ३० ते ५० टक्क्यांची घट आहे.

भरपूर पावसाचा विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणात आणि सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरही स्थिती बरी नाही. रत्नागिरी जिल्ह्यात भात लावणीत सात हजार हेक्टरने घट झाली आहे. कापणीला आलेल्या भाताचा उतारा ३० ते ४० टक्क्यांनी घसरला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील उसाच्या उत्पादनावर देखील  पावसाचा परिणाम झाला आहे. उसाची भरणीच चांगली झाली नसल्याने उत्पादनावर सरासरी ३० टक्के  परिणाम होणार आहे. ऊस गाळप हंगामावर याचे सावट जाणवेल. साखर कारखाने १०० दिवस तरी चालतील की नाहीत, याची शाश्वती देता येत नाही. किमान १८० दिवस साखर कारखाने चालले तरच उत्पादन खर्च परवडतो. आधीच साखरेचे दर पाडण्याच्या धोरणाने साखर उद्योगासमोर अडचणी उभ्या आहेत. त्यात उत्पादन कमी होण्याने या उद्योगाचे कंबरडे मोडण्याची वेळ येऊ शकते.

मान्सूनच्या नियमित पावसाप्रमाणेच परतीचा पाऊस शेतीला खूप उपयुक्त असतो. तोदेखील किरकोळच झाला. परतीचा पाऊस आणि नंतरच्या थंडीमुळे रब्बीची पिके उत्तम येतात. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने येत्या जानेवारीपासूनच पाणी टंचाई जाणवायला लागेल आणि रब्बीची पिके धोक्यात येतील. हा धोका ओळखून असणारे शेतकरी रब्बी हंगामातील पेरण्या करायच्या की, नाहीत या विचारात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत रब्बीच्या केवळ ११ टक्केच  पेरण्या झाल्याचे  कृषी विभागाने सांगितले आहे. अशा पार्श्वभूमीवर दुष्काळ जाहीर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून जोर धरायला हवी होती. शासनाने पंधरा जिल्ह्यातील केवळ ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आश्चर्य म्हणजे ज्या तालुक्यांची ओळखच दुष्काळी अशी महाराष्ट्रभर आहे, असे तालुके त्यातून वगळण्यात आले आहेत. मराठा आरक्षणादरम्यान समाजात असंतोष खदखदत असताना कोणत्या निकषाच्या आधारे या ४० तालुक्यांची निवड केली आहे, हे समजत नाही. २०१६ च्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेच्या आधारे दुष्काळी तालुक्यांची निवड केल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र हेच निकष लागू शकतील असे अनेक तालुके महाराष्ट्रात आहेत. सुमारे शंभर तालुक्यातील संपूर्ण शेतीच कोरडवाहू आहे. दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. राजकीय नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी ‘दुष्काळ ना आवडे आम्हाला’ म्हणत दुष्काळ व्यवस्थापन संहिता लागू होणार नाही याची काळजी घेतली आहे.

दुष्काळ जाहीर होताच वीजबिल, शेतसाऱ्यात सूट मिळते, पीक नुकसान भरपाई मिळते, रोजगार हमीची कामे सुरू होतात. विद्यार्थ्यांना शुल्कामध्ये सूट मिळते. या सवलती-सोयींवर खर्च करण्यासाठी इतर कामावरील निधी कमी करण्यात येतो. सवलती किंवा सूट शेतकरी वर्गास मिळेल पण निधी आटल्याने आपले दुकान बंद पडण्याची भीती लोकप्रतिनिधींना असल्याची तक्रार शेतकऱ्यांसह कार्यकर्ते करीत आहेत. सांगली जिल्ह्यातील अतिपूर्वेच्या जत तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला नाही, याचा उद्रेक दुष्काळी तालुक्यांची यादी जाहीर होताच झाला. एकही पीक हाती न लागलेल्या जतसारखा कायम दुष्काळी तालुक्यावर हा अन्यायच आहे. पाऊस, पेरण्या, कापणी, उतारा आदी निकषात जतसारखे तालुके वंचित राहता कामा नयेत. पुरेसा निधी मिळणार नाही, अशी कारणे देत शेतकरी वर्गाला वंचित ठेवण्याचे पाप त्यांच्या मतावर राजकारण करणाऱ्यांकडून तरी अपेक्षित नाही. अन्यथा दुष्काळाची अपेक्षा कोणी स्वत:हून करते का?

टॅग्स :droughtदुष्काळ