शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
"तुम्हाला अपेक्षित उत्तर मिळू शकत नाही"; मतदार याद्यांच्या वादावरून CM फडणवीसांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर
3
काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही...
4
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
5
जगातील टेक उद्योगात उलथापालथ: ॲमेझॉन, गूगल नंतर आता 'या' कंपनीच्या हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
7
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
9
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
10
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
11
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
12
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
13
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
14
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
15
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
16
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
17
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
18
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
19
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
20
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!

राष्ट्रपिता महात्मा गांधींचे कानात शिसे ओतणारे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 05:25 IST

गांधींचे हे भाषण इंग्रजीत झाले. त्यावेळी त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. त्याबद्दल त्यांनी प्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य याबद्दल आपली मते ठासून मांडणी केली.

- जयंत दिवाण

पंडित मदनमोहन मालवीय यांनी बनारस हिंदू यूनिव्हर्सिटीची स्थापना केली होती. या यूनिव्हर्सिटीच्या शिलान्यासाच्या कार्यक्रमात त्यावेळी गांधींचे भाषणही झाले होते. हे भाषण म्हणजे भारतीय राजकारणातील त्यांचे ‘पहिले पाऊल’ म्हणविले जाते. या यूनिव्हर्सिटीच्या शिलान्यासासाठी स्वत: व्हाईसरॉय उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रांताचे गव्हर्नर, लेफ्टनंट गव्हर्नरही त्यावेळी उपस्थित होते. संस्थानांचे राजे, रजवाडे रंगबिरंगी पोशाख व दागदागिने घालून या कार्यक्रमासाठी आले होते. भारतातील प्रसिध्द नेतेही उपस्थित होते. डोळ्यांचे पारणे फिटावे असा भव्य मंडप या कार्यक्रमासाठी घालण्यात आला होता. संपूर्ण कार्यक्रमाला जणू दरबाराचे स्वरुप आले होते.गांधींचे हे भाषण इंग्रजीत झाले. त्यावेळी त्यांना हिंदी बोलता येत नव्हते. त्याबद्दल त्यांनी प्रथम दिलगिरी व्यक्त केली. आपल्या भाषणात त्यांनी स्वातंत्र्य, स्वराज्य याबद्दल आपली मते ठासून मांडणी केली. स्वराज्याला त्यांनी मातृभाषेशी जोडले. गेली ५० वर्षे जर देशी भाषेतून शिक्षण झाले असते, तर गरीबातील गरीब माणूस स्वातंत्र्याच्या चळवळीशी जोडला जाऊन भारत कधीच स्वतंत्र झाला असता, असे मत त्यांनी यावेळी मांडले. केवळ ठराव करुन किंवा भाषण करुन स्वराज्य मिळणार नाही, असे सांगताना त्यांनी बनारसमधील मंदीरांच्या परिसरातील गलिच्छपणाचा उल्लेख केला. जेथे आपली मंदिरे गलिच्छ असतीलतेथे आपले स्वराज्य कसे असेल याकडे त्यांनी उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधले. गांधींनी आपल्या भाषणात राजे रजवाड्यांची चांगलीच कान उघाडणी केली. लोक कंगाल असताना जवाहिरांचे प्रदर्शन शोभेसाठी करु नका, असे ते म्हणाले. त्यांनी ठासून सांगितले की, स्वातंत्र्य शेतकऱ्यांमार्फतच येईल. त्यांचे भाषण जसजसे रंगू लागले, तस तसे मंचावरील अ‍ॅनी बेझंट वगैरे मंडळी धुसफूसू लागली. कडेलोट झाला तेव्हा गांधी म्हणाले, ‘मला जर असे आढळून आले की भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांनी येथून निघून गेले पाहिजे, तर त्यांना चलेजाव म्हणण्यास मी कचरणार नाही.’ सभास्थानी बसलेल्यांची सहनशीलता संपली. बेझंट बाई उठून गेल्या, राजे रजवाडे निघून गेले. त्यांना असे वाटले की, या माणसामुळे आपल्यावर राजद्रोहाचा गुन्हा तर लागणार नाही ना! मंचावर कोणीच उरले नसल्याने सभा आपोआपच विसर्जित झाली.या भाषणामुळे वर्तमानपत्रांमध्ये जो वाद-विवाद सुरु झाला, त्यामुळे वाचकांचे लक्ष गांधींकडे वेधले. बेझंट बाईंनी जाहिर केले की, गांधी संतदृष्टीने कितीही मोठे असले तरी राजकारणाच्या दृष्टीने अर्भकच आहेत. परंतु गांधींच्या रुपाने काही तरी एक नवीन तत्वज्ञान हिंदुस्थानात येत आहे, अशी चर्चा सामान्य सुशिक्षित लोकांमध्ये या निमित्ताने सुरु झाली. गांधी चर्चेचा विषय ठरले.(लेखक गांधीवादी, सर्वाेदयी कार्यकर्ते आहेत.)