शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

अशाने महाराष्ट्र काँग्रेसमुक्त होईल?

By admin | Updated: March 22, 2015 23:19 IST

विधान परिषद सभापतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय शिमगा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर सभापती झाले.

सोज्वळ म्हणून परिचित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात हे राजकारण का घडावे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो आहे.विधान परिषद सभापतींच्या निवडणुकीच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रात राजकीय शिमगा पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर सभापती झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव देशमुख यांना सभापतिपदावरून हटविण्याचे समर्थन करताना, ‘आम्हाला महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करायचा आहे आणि देशमुखांना हटविणे ही त्याची सुरुवात आहे’, असे विधान भाजपाचे ज्येष्ठ नेते महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केले. काँग्रेसला असे पाण्यात पाहिले जाण्याचा अनुभव यापूर्वी अनेकदा आलेला आहे. १९७७ च्या निवडणुकीनंतर जनता पक्ष सत्तेत आला तेव्हा असाच विद्वेष करण्यात आला. अशा राजकारणाने सुरुवातीला बदला घेण्याचा आनंद मिळतो पण कालांतराने ते अंगलट येते, हे १९८० मध्ये इंदिरा गांधी दमदारपणे सत्तेत परतल्या तेव्हा सिद्ध झाले होते. महाराष्ट्रात तीच चूक भाजपा करायला निघाली आहे. आज ना उद्या ती चूक अंगाशी येऊ शकते. एकदोन माणसे संपवून काँग्रेस वा काँग्रेसचा विचार संपेल हा मुळातच अविचार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय पार्श्वभूमी बदला घेण्याची नाही, पण तेही त्याच मार्गावर निघालेले दिसतात. दुसऱ्याची रेष पुसण्याऐवजी स्वत:ची रेष मोठी करा, असे त्यांच्याच नागपुरातील दिग्गज नेते नितीन गडकरी नेहमी म्हणत असतात. गडकरींचे हे विधान फडणवीस यांनी सल्ला म्हणून स्वीकारले तर, ‘तुम्ही पंधरा वर्षांत काय पापं केली ते आधी बोला’, अशी काँग्रेसला हिणवणारी वाक्ये म्हणण्यात त्यांचा वेळ जाणार नाही. महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करण्याऐवजी काँग्रेस आणि विशेषत: राष्ट्रवादीच्या खात्यांमध्ये बोकाळलेल्या भ्रष्टाचारापासून लोकांना मुक्ती हवी होती म्हणून त्यांनी तुम्हाला सत्तेत आणले. सध्या तसे काही दिसत नाही. आधीच्या राजवटीत मंत्रालय, विधानभवनात फिरणारे दलाल, कंत्राटदार आताही दिसतात. सामाजिक न्याय विभाग, आदिवासी विकास विभागात तर ते कधीच सक्रिय झाले आहेत. नवीन सरकारमधील नव्या मंत्र्यांना ते चक्क ‘मार्गदर्शन’ करताना दिसत आहेत. खडसेसाहेब! या डल्लाभरूंपासून मुक्ती दिली तर बरे होईल. आघाडी सरकारच्या काळात झालेल्या वीज घोटाळ्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने करून भाजपाला आयती संधी दिली होती, पण ही मागणी पद्धतशीरपणे टाळून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ते आमदार असताना अजित पवार, सुनील तटकरे यांच्याकडून कामे करवून घेतल्याची बूज राखल्याचे दिसते. भाजपाने सभापतिपदासाठी राष्ट्रवादीला साथ देऊन कोणते तत्त्वनिष्ठ राजकारण साधले? शिवसेनेने उद्या पाठ दाखविली तर प्लॅन बी तयार असावा म्हणून राष्ट्रवादीचा पर्याय भाजपाने तयार ठेवला आहे असे जे म्हटले जाते त्याला बळ देणारे राजकारण सभापती निवडीच्या निमित्ताने झाले. सोज्वळ नेतृत्व म्हणून परिचित असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात हे राजकारण का व्हावे असा प्रश्न भाजपाप्रेमींना पडला आहे. पण त्याचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. असंतोषाची दखलरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतील प्रशिक्षण वर्गात भाजपाच्या अनेक आमदारांनी, काही मंत्री बोलत नाहीत वा आमच्याकडे पाहतही नाहीत, अशा तक्रारी केल्या होत्या. आता ‘ते’ मंत्री माणुसकीने बोलू लागले असल्याचा अनुभव आमदार सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांनीही आता प्रत्येक महसूल विभागातील भाजपा आमदारांच्या स्वतंत्र बैठका सुरू केल्या आहेत. जाता जाता : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘अत्युच्च’ या ऐवजी, ‘अचुत्य’ असा चुकीचा शब्द वापरला म्हणून त्यांची खिल्ली उडविणारा अग्रलेख लिहिला गेला. मुनगंटीवार भाषाप्रभू आहेत म्हणून पाच वेळा आमदार वा मंत्री झालेले नाहीत. पण एका शाब्दिक चुकीसाठी त्यांना इतके झोडपायचे? महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री लोकनेते दादासाहेब कन्नमवार हयातभर साधे जीवन जगले. नागपुरातील त्यांच्या शोकसभेनंतर त्यांच्या पत्नी एसटीने चंद्रपूरला गेल्या, यातच सारे आले. पण दादासाहेबांचा उल्लेख नेहमी ‘कंडम’वार म्हणून करणारे थोर पत्रकार तेव्हाही होते. कन्नमवार ते मुनगंटीवार विदर्भद्वेष तसाच कायम आहे; एवढेच. - यदु जोशी