शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
2
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
3
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
4
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
5
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
6
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
7
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
8
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
9
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
10
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
11
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
12
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
13
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
14
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
15
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
16
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
17
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
18
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
19
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
20
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती

Maharashtra Politics: घसरलेल्या जिभा आणि थोबाडं फोडण्याची लगबग

By सचिन जवळकोटे | Updated: August 5, 2021 05:46 IST

Maharashtra Politics: नारद तळकोकणात गेले, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनबाहेर बोर्डच लावलेला- ‘चोवीस तास नेत्यांच्या सेवेत! बारा तास मुंबईचे मंत्री, बारा तास दिल्लीचे मंत्री’

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर)

इंद्र दरबारात भलतंच आक्रित घडलं. दरबाराचं मनोरंजन करणाऱ्या अप्सरा अलीकडे विचित्र वागू लागल्या होत्या. ज्यांच्या पावलांमधून नृत्यकला फुलायची, त्यांच्या वाणीतून अचानक स्फोटक शब्दांचे अंगार फुलू लागले.नेहमीची शालीन परंपरा विसरून एकमेकींना ‘अस्वर्गीय’ भाषेत हिणविणाऱ्या या अप्सरांमुळे अवघा दरबार बुचकळ्यात पडला. इंद्र महाराजांनी राजवैद्यांना पाचारण केलं. त्यांनी अस्वस्थ होत भर दरबारात असमर्थता दर्शवली, ‘महाराज.. आपल्या अप्सरा तशा खूप चांगल्या, मात्र भूतलावरून आलेला एक भयंकर विषाणू अनेकींच्या जिभेवर रेंगाळतोय. त्यामुळे यांचीही भाषा अशी असभ्य बनत चाललीय.’ मग काय.. इंद्राच्या आदेशानुसार नारद मुनी तत्काळ भूतलावर पोहोचले. या नव्या विषाणूचा शोध घेण्यासाठी त्यांनी एका डॉक्टरांची भेट घेतली.“डॉक्टर.. भल्याभल्यांची जीभ अनियंत्रित करणारा हा विषाणू तुम्हाला माहितीय का?” डोकं खाजवत डॉक्टर उत्तरले, “हो. मी अलीकडे ऐकतोय त्याच्याबद्दल. विशेष करून राजकीय नेत्यांना खूप ग्रासलंय म्हणे त्यानं. तुमची इच्छा असेल तर भेटू या नेतेमंडळींना. चला.”नारद अन् डॉक्टर सर्वप्रथम गेले तळकोकणात. तिथं भेटले जिल्ह्याचे अधिकारी. त्यांच्या केबिनसमोर भलामोठा बोर्ड लावलेला. ‘चोवीस तास नेत्यांच्या सेवेत. बारा तास मुंबईच्या मंत्र्यांसाठी. बारा तास दिल्लीच्या मंत्र्यांसाठी.’ वाचून आश्चर्यानं सवयीप्रमाणं नारद मुनी पुटपुटले, “नारायण.. नारायण..” हे वाक्य कानावर पडताच आतले अधिकारी गडबडीत केबिनबाहेर आले, “कुठाहेत साहेब?” गालातल्या गालात हसत मुनी पुढे सरकले. तिथल्या विमानतळाबाहेर नवा बोर्ड लटकला होता : राणे एअरपोर्ट. मुनींनी गोंधळून सिक्युरिटी टीमला विचारलं, “मुंबई एअरपोर्टवरचा बोर्ड बदलल्याचं माहीत होतं. पण, हा काय प्रकार.. तुमचे नेतेही विमान उडवू लागलेत की काय?” यावर एक जण शांतपणे म्हणाला, “ते विमान नाही, सीएम-बीएम उडवतात.” मुनींनी प्रश्नार्थक नजरेनं बघताच डॉक्टर कानात पुटपुटले, “या विषाणूचं प्रस्थ बहुधा इथंच जास्त असावं. खूप वर्षांपूर्वीच पिता-पुत्रांना लागण झालीय ना याची.” मजल-दरमजल करत दोघे मुंबईत पोहोचले. एका मंदिरासमोर प्रसाद वाटप सुरू होतं. डॉक्टरांनी एक लाडू नारदांना दिला. मात्र तो काही फुटता फुटेना, “हा प्रसाद कसा फोडायचा हो?” मुनींनी जोरात विचारताच आजूबाजूला कालवा झाला. हलकल्लोळ माजला. ‘भगवं उपरणं’वाले तावातावात पळत आले, “कुठे आहे प्रसाद.. बघतोच आम्ही आता.. कसा फोडतोय ते.” भांबावलेल्या डॉक्टरांनी विचारलं, “तुमचा काय संबंध.. तुम्ही कोण?” तेव्हा एक जण मोबाइलमधला ‘रौतां’चा मेसेज दाखवत अंगावर धावून आला, “आम्ही शाखाप्रमुख. तुम्हाला उत्तर आता आम्हीच देणार..” तेव्हा तिकडून दुसऱ्या शाखेचे शिक्षक हातात ‘दंड’ वगैरे घेऊन धावून आले, “अंगावर आलेल्यांना सोडू नका. आपल्या नागपूरच्या नेत्यांनी जाहीरच केलंय तसं..” - तेही घोषणा देऊ लागले.दोन्हीकडचा विचित्र रागरंग पाहून दोघेही तिथून पटकन निसटले. ‘वर्षा’ बंगल्याकडे जाताना वाटेत एका दुकानाबाहेर बोर्ड दिसला, ‘या परिसरात थपडा स्वस्तात मिळतात. एक वर एक फ्री. सोबत पायावर उभं राहण्यासाठी कुबड्याही दिल्या जातील.’ “डॉक्टर.. विषाणूचा फैलाव भलताच पसरलाय वाटतं. त्याचा असर आपल्यावर होण्यापूर्वीच निघू या,”-  नारदांनी भीती व्यक्त करताच दोघेही परत फिरले. कपाळावरचा घाम पुसत मुनी घाईघाईनं इंद्र दरबारात पोहोचले. त्यांनी महाराजांना रिपोर्ट सादर केला, “भूतलावर जीभ भ्रष्ट करणारे विषाणू-बिषाणू काही नाहीत. मुंबईत थोरले काका अन् उद्बोधन एकमेकांना भेटले की कोकणातली जीभ घसरते. दिल्लीत नमो अन् उद्धो चर्चा करताच रौतांचीही भाषा बदलते. नंतर कोल्हापुरात देवेंद्र अन् उद्धो एकमेकांना नमस्कार करताच प्रसादांची जीभ लाडावते. बाकी काही नाही.” हे ऐकून दचकलेल्या इंद्र महाराजांनी हळूच विचारलं, “मग आता अमित भाई अन् थोरले काकांच्या भेटीनंतर कुणाकुणाची जीभ सळसळणार?”  - नारायण.. नारायण..

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र