शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भूमाफिया व घोटाळेबाजांचे राज्य म्हणजे महाराष्ट्र!

By admin | Updated: June 10, 2016 06:55 IST

संपूर्ण देशात आज महाराष्ट्राची ओळख तेथील स्थावर मालमत्तांच्या वाढत्या वादांमुळे निर्माण होत आहे

संपूर्ण देशात आज महाराष्ट्राची ओळख तेथील स्थावर मालमत्तांच्या वाढत्या वादांमुळे निर्माण होत आहे. तेथील जमीन व्यवहारांशी संबंधित कायदा करणे किती कठीण असते, हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका प्रसंगी सांगितले होते. केवळ पारदर्शकता आणण्यासाठी त्यांनी मुंबईतील बहुमजली वाहनतळ आणि चटई क्षेत्र निर्देशांकाशी संबंधित काही नियम बदलण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला तेव्हा एकदम शांतता पसरली होती. चव्हाण म्हणतात, 'माझे काही सहकारी असे बघत होते की, जणू मी काही पापकर्मच करीत आहे.' हे स्वाभाविक आहे. कारण मुंबईतील इमारतींवर चढणारा प्रत्येक मजला बांधकाम व्यावसायिकाला आणि त्याच्या राजकीय हितसंबंधींना कोट्यवधींचा लाभ मिळवून देत असतो. पृथ्वीराज चव्हाणांप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आदराने बघितले जाते. विरोधी पक्षात असताना त्यांनी जे अनेक जमीन घोटाळे उघडकीस आणले त्यातील एक कुख्यात घोटाळा होता आदर्श सोसायटीचा. सचोटीच्या व्यवहारामुळे त्यांनीही चांगली प्रतिष्ठा मिळवली आहे; पण व्यक्तिगत सचोटीमुळे यंत्रणा सुधारत नाही हे तेदेखील पृथ्वीराज यांच्याप्रमाणेच हळूहळू शिकू लागले आहेत. गेल्या आठवड्यात महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा जमीन घोटाळ्याच्याच आरोपावरून घेतला गेलेला राजीनामा हेच दर्शवितो की, सरकार चालवणारे भलेही बदलोत; पण चुकीच्या सवयी काही बदलत नाहीत. 'ना खाऊंगा ना खाने दुंगा' अशी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. आपण भ्रष्टाचाराची मिठाई बंद केली म्हणून आपणास लक्ष्य केले जात आहे, असे त्यांनी कतारमधील अनिवासी भारतीयांशी बोलताना सांगितले; पण काहींना हे पटणारे नाही. मोदींच्या अंगावर कोणताच डाग नाही व सत्तेचा दुरुपयोग करणार्‍यांच्या मनात त्यांनी नक्कीच भय निर्माण केले आहे; पण स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा दावेदार मानणार्‍या खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होतात तेव्हा त्याला उत्तर देण्याची जबाबदारी मोदी स्वीकारणार आहेत का? खडसे प्रकरणातून तीन गोष्टी समोर येतात.पहिली म्हणजे उच्चपदावर सचोटीचा माणूस ठेवला म्हणजे त्याचे सहकारीही प्रामाणिक असतीलच असे नाही. दिल्लीत डॉ. मनमोहनसिंग आणि मुंबईत पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारे होती; पण त्यांच्या भ्रष्टाचारी सहकार्‍यांनीच त्यांची पंचाईत करून ठेवली. (म्हणूनच की काय छगन भुजबळांच्या विरुद्धची कारवाई सरकार बदलल्यानंतरच झाली). स्वत: मोदी वा फडणवीस एखाद्या वरिष्ठ मंत्र्याविरुद्धही कारवाई करू शकतात; पण भाजप जाहीरपणे खडसेंना खडसावण्याचे धैर्य दाखवू शकत नाही. कारण पक्षाला राजकीय र्मयादा पडतात. खडसे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात व भाजपला जातीच्या गणितात मागे पडायचे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे राजकारणात भ्रष्टाचार नेहमीच सार्‍यांना एका पातळीवर आणून ठेवतो. भाजप स्वत:ला 'पार्टी विथ डिफरन्स' म्हणू शकतो. कारण तिच्या तुलनेत काँग्रेस अधिक काळ सत्तेत राहिली आहे. दीर्घकाळच्या सत्तेमुळेच काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार शिरला व तिचे वेगाने विघटन सुरू झाले. म्हणूनच काँग्रेसला भाजपचा भ्रष्टाचार उघड करण्यास र्मयादा आहेत. आता हेही दिसू लागले आहे की, ज्या राज्यांमध्ये भाजप दीर्घकाळ सत्तेत आहे तिथे मिठाई जोरात सुरू आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार एकट्या काँग्रेसपुरता र्मयादित नाही.तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशभरातील राजकारण्यांसाठी जमीन हा पैसा कमावण्याचा आद्य मार्ग आहे. आज देशात एकही असे राज्य नाही की जिथे सत्ताधार्‍यांनी स्वार्थासाठी जमीनविषयक नियम आणि कायद्यांना वळण देण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांचा सर्वांत आवडता उद्योग म्हणजे शेतजमिनी बिगरशेती करून व्यावसायिक वापरासाठी त्या मोकळे करणे. लेखणीच्या एका फटकार्‍यानिशी शेकडो एकर किमती जमीन बांधकाम व्यावसायिकांना आणि उद्योजकांना उपलब्ध करून दिली जाते व बदल्यात अफाट पैसा कमावला जातो.पुणे शहर याचे उत्तम उदाहरण आहे. राजकारणी, बांधकाम व्यावसायिक, शासकीय अधिकारी आणि भू-माफिया यांच्या चौकडीने या शहराचा चेहरा-मोहराच बदलून टाकला आहे. एके काळी हे शहर पेन्शनरांचे शहर म्हणून ओळखले जात असे; पण आता ते सिमेंटचे भयानक जंगल झाले आहे. काही वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला तब्बल ६६ हजार इमारती बेकायदेशीर असल्याचे आढळले होते. जेव्हा जिल्हाधिकार्‍यांनी या इमारती पाडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची बदली करण्यात आली. त्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिकांना राजकीय आश्रय मिळाला आणि मग शासनानेही सर्व संबंधित अवैध बांधकामे नियमित करून टाकण्यासाठी पाऊल उचलले. माहितीच्या अधिकाराखाली ज्या कार्यकर्त्याने त्याच्या विरोधात आवाज उठवला, त्याला गा राजदीप सरदेसाई(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)