शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

महाराष्ट्राचे न्याय‘भूषण’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 06:34 IST

या नियुक्तीने देशातील कोट्यवधी दीनदुबळ्या, दलित वर्गाचा ऊर अभिमानाने भरून आला असेल.

भारताची राज्यघटना देशाच्या हाती सोपविण्याच्या पूर्वसंध्येला, २५ नोव्हेंबर १९४९ रोजी घटना समितीत बोलताना राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते - ‘राजकीय लोकशाही टिकवायची असेल, तर तिचा पाया सामाजिक लोकशाहीवर आधारित रचला गेला पाहिजे. सामाजिक लोकशाही म्हणजे अशी समाजरचना जिथे समता आहे, बंधुता आहे, परस्परांबद्दल आदर आहे.’ पंचाहत्तर वर्षांनंतर १ ऑगस्ट २०२४ ला सर्वोच्च न्यायालयाच्या सात-सदस्यीय घटनापीठाने अनुसूचित जाती व जमातींमधील उपवर्गीकरणाला अनुकूलतेच्या माध्यमातून समाजातील दुबळ्या, खऱ्या अर्थाने वंचित घटकांना दिलासा देताना त्या विधानाचे स्मरण करून दिले. 

लोकानुनयाचा मार्ग सोडून देशाच्या सर्वोच्च न्यायासनाने वास्तववादी, झालेच तर थोडी धाडसी भूमिका घेतली. या ऐतिहासिक निकालातील न्या. भूषण रामकृष्ण अर्थात बी. आर. गवई यांचे योगदान, स्पष्ट नि:स्पृह भूमिका महत्त्वाची होती. क्रिमी लेअरच्या रूपाने मागासांमधील उन्नत वर्गाऐवजी खऱ्या वंचितांना आरक्षणाच्या लाभांसाठी ते आत्यंतिक आग्रही होते. अजूनही प्रगतीच्या मुख्य प्रवाहात येऊ न शकलेल्या गरीब घरातील मुलांना आरक्षणाचा लाभ घेतलेल्या उन्नत वर्गातील मुलांशी स्पर्धा करता येणार नाही, हे त्यांचे वेधक निरीक्षण होते. याच न्या. गवई यांना बुधवारी देशाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी शपथ दिली. अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील दारापूरच्या मातीतून अंकुरलेली, अमरावती शहरातील फ्रेजरपुरा, काँग्रेसनगरमध्ये फुललेली प्रतिभा देशाच्या सर्वोच्च न्यायपीठापर्यंत पोहोचली. शपथविधीनंतर न्या. गवई यांनी मातोश्री कमलताईंना केलेल्या चरणस्पर्शाचा क्षण समारंभाला उपस्थित त्यांचे सहकारी, मित्र, चाहत्यांनी डोळ्यांत साठवून ठेवला. 

या नियुक्तीने देशातील कोट्यवधी दीनदुबळ्या, दलित वर्गाचा ऊर अभिमानाने भरून आला असेल. कारण, न्या. गवई यांच्यापुढे पुढच्या सहा महिन्यांत कोणते खटले सुनावणीसाठी येणार आहेत किंवा आधी त्यांनी कोणते निवाडे दिले आहेत, यापेक्षा ते कोणता वारसा चालविणार आहेत, हे अधिक महत्त्वाचे. पहिला वारसा आहे सामाजिक जबाबदारीचा. दिवंगत आंबेडकरी नेते, महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती, लोकसभेचे खासदार तसेच बिहार, केरळ, त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम करतानाही खेड्यापाड्याचा, झोपडपट्ट्यांमधील अतिवंचितांच्या हिताचा विचार करणारे रा. सू. उपाख्य दादासाहेब गवई यांनी हे जबाबदारीचे भान मुलांमध्ये रूजवले. कमलताईंनी त्याला पैलू पाडले. यामुळेच ‘बार’ आणि ‘बेंच’वर काम करताना न्या. गवई चाकोरीबाहेरचा विचार करीत आले. काहीवेळा न्यायदानाची चाैकट मोडली. कर्तव्यात कसूर करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांना शिक्षा म्हणून त्यांचा एक महिन्याचा पगार पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथाश्रमाला दान देताना त्यांनी परंपरेचा बाऊ केला नाही.  न्या. गवई यांचा बहुमान महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. 

आधी मुंबई प्रांत किंवा नंतर महाराष्ट्राचा झेंडा न्यायव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी फडकविणारे न्या. हिरालाल कनिया, न्या. यशवंत चंद्रचूड, न्या. पी. एन. भगवती, न्या. एस. एच. कपाडिया आदी थोरांच्या पंक्तीत न्या. गवई यांचे नाव जोडले गेले आहे. त्यातही न्या. शरद बोबडे, न्या. उदय लळीत व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या पाठोपाठ गेल्या पाच वर्षांमध्ये सरन्यायाधीश बनणारे न्या. गवई हे चाैथे मराठी न्यायमूर्ती आहेत. वकिली किंवा न्यायदानाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडू पाहणाऱ्या अनेकांसाठी गवई यांच्या नियुक्तीने प्रेरणा मिळेल. न्यायालयात तुंबून पडलेले लाखो खटले, उच्च व सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची रिक्तपदे, सर्वसामान्यांना न्याय मिळण्यात दिरंगाई, न्यायव्यवस्थेत पायाभूत सुविधांची कमतरता आदींची जाण त्यांच्या मुलाखतींमधून स्पष्ट झाली आहे. 

न्यायाला मानवीय चेहरा देणारे, सामाजिक न्यायाचे अग्रणी, जनहित याचिकांचे संकल्पक न्या. व्ही. आर. कृष्ण अय्यर, ‘पीआयएल’ संकल्पना मुख्य प्रवाहात आणणारे व न्यायपालिकेच्या स्वायत्ततेचा आग्रह धरणारे न्या. पी. एन. भगवती, ‘विशाखा गाइडलाइन्स’च्या रूपाने लैंगिक छळाविरुद्ध मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणारे न्या. जे. एस. वर्मा किंवा सामाजिक सर्वसमावेशकतेवर भर देणारे पहिले दलित सरन्यायाधीश के. जी. बालकृष्णन आदींचा वारसा न्या. भूषण गवई पुढे नेणार आहेत. यासाठी त्यांना शुभेच्छा !

 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय