शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मतदारांची विकासावर दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:05 IST

Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत आहे.

महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत आहे. भाजप व सेनेने ही निवडणूक आपल्या संपूर्ण बळानिशी व भक्कम अर्थबळानिशी लढविली आहे. तर काँग्रेसने तीत आपले सारे बळ व नेतृत्व उतरविलेले दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपले सर्व नेते या निवडणुकीत पुरेशा जिद्दीने उतरविले.

प्रत्यक्ष शरद पवार वयाची ७८ वर्षे उलटल्यानंतरही या निवडणुकीत एखाद्या तरुणाच्या जोमाने लढताना दिसले. त्यांच्या पक्षातील अनेकांनी ऐनवेळी भाजपचा व सेनेचा आश्रय घेतला तरी पवारांची जिद्द त्यामुळे जराही कमी झाल्याचे दिसले नाही. याउलट काँग्रेस पक्षातच या निवडणुकीविषयीचा जोम कमी आढळला. राहुल गांधीच तेवढे काही मतदारसंघांत प्रचाराची भाषणे करून गेले. त्या पक्षाला आपले उमेदवारही अखेरच्या क्षणापर्यंत सर्वसंमतीने निवडता आले नाहीत. परिणामी प्रत्येक जिल्ह्यात वादावादी व भांडणे होताना दिसली. बाकीचे पक्षही त्यापासून दूर राहिले नसले तरी त्यांच्यातली भांडणे फार उघड झाली नाहीत. भाजप व शिवसेना ही निवडणूक आपल्या मागील पाच वर्षांच्या कामगिरीच्या बळावर व नरेंद्र मोदींविषयीच्या आदराच्या बळावर लढवीत आहे. ही युती सत्तेवर आहे आणि तिला सत्ता व प्रशासन या दोहोंचेही पाठबळ आपोआपच लाभले आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यावर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. प्रथम अवर्षण व नंतर अतिवृष्टीचा तडाखा राज्याला बसला. या आपत्तींनी सरकारची अक्षरश: परीक्षा घेतली. देवेंद्र फडणवीसांचे सरकार या परीक्षेत बऱ्यापैकी यश मिळविताना दिसले. या प्रमुख पक्षांखेरीज वंचित बहुजन आघाडीसारखे अन्य पक्ष व संघटना या निवडणुकीत उतरल्या आहेत. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यात आहे. मात्र या छोट्या पक्षांना फारसे भवितव्य नाही आणि त्यांचे म्हणावे तेवढे उमेदवार निवडूनही येणार नाहीत. जाणकारांच्या व लोकमानसाचा अभ्यास करणाºया संघटनांच्या मते या घटकेला भाजप-सेना ही युती विजयाच्या अधिक जवळ आहे. मात्र तिला पूर्वीएवढे मोठे बहुमत मिळणार नाही. उलट काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या या वेळी वाढलेली दिसेल. भाजपने शिवसेनेशी केलेली युती सेनेला लाभाची ठरली तरी ती भाजपला फारशी आशादायक असणार नाही. सेनेचे बरेच उमेदवार या निवडणुकीत पराभूत होतील असेच सध्याचे चित्र आहे. उमेदवार निवडताना निवडून येणारा उमेदवार प्रत्येक ठिकाणी पाहिला गेलाच असे नाही.

 

पुन्हा एकवार जात हाच निकष उमेदवाराच्या निवडीसाठी महत्त्वाचा ठरला. काही पक्षांत तर नेत्यांची घराणेशाहीही महत्त्वाची झालेली दिसली. अशा निवडणुकीत कार्यक्रम पत्रिका हरवते. पक्षांच्या ध्येयधोरणांना महत्त्व उरत नाही. महत्त्व असते ते उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांना. त्यामुळे या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधील एकाहून अधिक पुढारी यांनाच महत्त्व असेल व ही निवडणूकही त्याच बळावर लढविली जाईल. दोन गोष्टी मात्र ठळकपणे जाणवाव्या अशा आहेत. त्यातील पहिली बाब या निवडणुकीत संघाचा पुढाकार कुठे दिसला नाही.

त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य राष्ट्रीय नेते या निवडणुकीपासून दूर राहिलेले आढळले. त्यामुळे प्रत्यक्षात ही निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे. तीत नेत्यांहून मतदार महत्त्वाचा ठरण्याची शक्यता मोठी आहे व ते चांगल्या लोकशाहीचे लक्षण आहे. नाही म्हणायला नरेंद्र मोदी व अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय नेते या निवडणुकीत ठिकठिकाणी सभा घेताना आढळले. परंतु त्यांची भाषणे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर न होता काश्मीर व देशाच्या इतर प्रश्नांवरच अधिक झालेली दिसली. राष्ट्रीय प्रश्न व प्रादेशिक प्रश्न यातला फरक देशाच्या वरिष्ठ नेत्यांच्याही ध्यानात पुरेसा आला नाही याचाच हा पुरावा मानावा लागेल. स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र ती त्रुटी भरून काढली. सत्तेवर कुणीही येवो त्याची दृष्टी राज्याच्या व जनतेच्या विकासावर असावी, अशीच अपेक्षा या वेळी साºया मतदारांच्या मनात असेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकVotingमतदान