शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
2
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; शाहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल...
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
6
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
7
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
8
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
9
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
10
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
11
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
12
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
13
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
14
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
15
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
16
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
17
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
18
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
19
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
20
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट

Maharashtra Election 2019: मतदारांची विकासावर दृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:05 IST

Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत आहे.

महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत आहे. भाजप व सेनेने ही निवडणूक आपल्या संपूर्ण बळानिशी व भक्कम अर्थबळानिशी लढविली आहे. तर काँग्रेसने तीत आपले सारे बळ व नेतृत्व उतरविलेले दिसले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र आपले सर्व नेते या निवडणुकीत पुरेशा जिद्दीने उतरविले.

प्रत्यक्ष शरद पवार वयाची ७८ वर्षे उलटल्यानंतरही या निवडणुकीत एखाद्या तरुणाच्या जोमाने लढताना दिसले. त्यांच्या पक्षातील अनेकांनी ऐनवेळी भाजपचा व सेनेचा आश्रय घेतला तरी पवारांची जिद्द त्यामुळे जराही कमी झाल्याचे दिसले नाही. याउलट काँग्रेस पक्षातच या निवडणुकीविषयीचा जोम कमी आढळला. राहुल गांधीच तेवढे काही मतदारसंघांत प्रचाराची भाषणे करून गेले. त्या पक्षाला आपले उमेदवारही अखेरच्या क्षणापर्यंत सर्वसंमतीने निवडता आले नाहीत. परिणामी प्रत्येक जिल्ह्यात वादावादी व भांडणे होताना दिसली. बाकीचे पक्षही त्यापासून दूर राहिले नसले तरी त्यांच्यातली भांडणे फार उघड झाली नाहीत. भाजप व शिवसेना ही निवडणूक आपल्या मागील पाच वर्षांच्या कामगिरीच्या बळावर व नरेंद्र मोदींविषयीच्या आदराच्या बळावर लढवीत आहे. ही युती सत्तेवर आहे आणि तिला सत्ता व प्रशासन या दोहोंचेही पाठबळ आपोआपच लाभले आहे.

गेल्या पाच वर्षांत राज्यावर अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. प्रथम अवर्षण व नंतर अतिवृष्टीचा तडाखा राज्याला बसला. या आपत्तींनी सरकारची अक्षरश: परीक्षा घेतली. देवेंद्र फडणवीसांचे सरकार या परीक्षेत बऱ्यापैकी यश मिळविताना दिसले. या प्रमुख पक्षांखेरीज वंचित बहुजन आघाडीसारखे अन्य पक्ष व संघटना या निवडणुकीत उतरल्या आहेत. राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही त्यात आहे. मात्र या छोट्या पक्षांना फारसे भवितव्य नाही आणि त्यांचे म्हणावे तेवढे उमेदवार निवडूनही येणार नाहीत. जाणकारांच्या व लोकमानसाचा अभ्यास करणाºया संघटनांच्या मते या घटकेला भाजप-सेना ही युती विजयाच्या अधिक जवळ आहे. मात्र तिला पूर्वीएवढे मोठे बहुमत मिळणार नाही. उलट काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या या वेळी वाढलेली दिसेल. भाजपने शिवसेनेशी केलेली युती सेनेला लाभाची ठरली तरी ती भाजपला फारशी आशादायक असणार नाही. सेनेचे बरेच उमेदवार या निवडणुकीत पराभूत होतील असेच सध्याचे चित्र आहे. उमेदवार निवडताना निवडून येणारा उमेदवार प्रत्येक ठिकाणी पाहिला गेलाच असे नाही.

 

पुन्हा एकवार जात हाच निकष उमेदवाराच्या निवडीसाठी महत्त्वाचा ठरला. काही पक्षांत तर नेत्यांची घराणेशाहीही महत्त्वाची झालेली दिसली. अशा निवडणुकीत कार्यक्रम पत्रिका हरवते. पक्षांच्या ध्येयधोरणांना महत्त्व उरत नाही. महत्त्व असते ते उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांना. त्यामुळे या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधील एकाहून अधिक पुढारी यांनाच महत्त्व असेल व ही निवडणूकही त्याच बळावर लढविली जाईल. दोन गोष्टी मात्र ठळकपणे जाणवाव्या अशा आहेत. त्यातील पहिली बाब या निवडणुकीत संघाचा पुढाकार कुठे दिसला नाही.

त्याचवेळी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य राष्ट्रीय नेते या निवडणुकीपासून दूर राहिलेले आढळले. त्यामुळे प्रत्यक्षात ही निवडणूक जनतेच्या हाती गेली आहे. तीत नेत्यांहून मतदार महत्त्वाचा ठरण्याची शक्यता मोठी आहे व ते चांगल्या लोकशाहीचे लक्षण आहे. नाही म्हणायला नरेंद्र मोदी व अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय नेते या निवडणुकीत ठिकठिकाणी सभा घेताना आढळले. परंतु त्यांची भाषणे महाराष्ट्राच्या प्रश्नांवर न होता काश्मीर व देशाच्या इतर प्रश्नांवरच अधिक झालेली दिसली. राष्ट्रीय प्रश्न व प्रादेशिक प्रश्न यातला फरक देशाच्या वरिष्ठ नेत्यांच्याही ध्यानात पुरेसा आला नाही याचाच हा पुरावा मानावा लागेल. स्थानिक पुढाऱ्यांनी मात्र ती त्रुटी भरून काढली. सत्तेवर कुणीही येवो त्याची दृष्टी राज्याच्या व जनतेच्या विकासावर असावी, अशीच अपेक्षा या वेळी साºया मतदारांच्या मनात असेल.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019ElectionनिवडणूकVotingमतदान